Home Tags Jalna

Tag: Jalna

किन्होळा गावचा स्वामी विवेकानंद आश्रम

चाळीस वर्षांचे जालन्याचे शिक्षक नारायण कौतिकराव भुजंग हे विवेकानंदांचे वाङ्मय वाचून प्रेरित झाले आणि त्यांनी त्यांच्या किन्होळा या गावी स्वामी विवेकानंद आश्रम काढला. त्यासाठी स्वत:ची तीन एकर जमीन दिली आणि केंद्र चालवण्यासाठी ते दरवर्षी पस्तीस-चाळीस हजार रुपये खर्च करतात. किन्होळा हे गाव बदनापूर तालुक्यात आहे...

अशोक ढवण – कुणबी कुळातील कुलगुरू

अशोक ढवण हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून विद्यापीठाचे कुलुगुरू झाले. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक व शेती क्षेत्रांत संशोधनापासून उपयोजनापर्यंतची अनेकविध कामगिरी करत असताना माणसामाणसातील जिव्हाळा जपला, साहित्याचे प्रेम राखले आणि सभोवतालच्या समाजजीवनाचा एकूण स्तर उंचावला...

दावलवाडी : जालना-बदनापूर जवळची संपन्नता

दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे...

बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्राची वाटचाल

बदनापूर संशोधन केंद्र हे अखिल भारतीय कडधान्य सुधार प्रकल्पातील एक प्रमुख केंद्र आहे. हे केंद्र जालना जिल्ह्यात येते. त्याचा कारभार मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालतो. तेथे महाराष्ट्रातील महत्त्वाची कडधान्ये, विशेषत: तूर, मूग, उडीद आणि हरभरा या पिकांवर संशोधन केले जाते...

कडधान्य संशोधन : बदनापूर कृषी संशोधन केंद्रातील कामगिरी

0
कडधान्य पिकांचे मानवी आहारात महत्त्वाचे स्थान आहे. कडधान्य हा प्रथिने पुरवणारा मुख्य व स्वस्त स्रोत आहे. कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वीस ते पंचवीस टक्के आहे. शरीराची होणारी झिज भरून काढण्यासाठी प्रथिनांची नितांत आवश्यकता असते. कडधान्य पिकांमध्ये खनिजे व जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असल्याने समतोल आणि पौष्टिक आहार म्हणून उपयोग होतो...

महिको बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ – बारवाले

0
बद्रिनारायण बारवाले यांनी उच्च शिक्षित नसतानाही स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात समाजाची गरज अचूक हेरली आणि महिको ही बीज उत्पादनाची कंपनी नावारूपाला आणली. त्यांनी शेतीत विविध प्रयोग केले. ते शेतकऱ्यांशी शेअर केले व त्यांचे उत्पन्न वाढवले. त्यांचे कार्य केवळ कृषी क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही; तर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रांतही मोलाचे योगदान दिले आहे...