Home Tags सद्भावनेचे व्यासपीठ

Tag: सद्भावनेचे व्यासपीठ

सुचेता-राजेंद्र धामणे डॉक्टर दांपत्याचे मनगाव

राजेंद्र आणि सुचेता धामणे ह्या डॉक्टर दांपत्याचे सहजीवन सुरू झाले तेच मुळी समाजासाठी काहीतरी करावे या समविचाराने. दोघेही एकत्र होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच गरजूंना मदत करत असत. वैद्यकीय पदवी पंचवीस वर्षापूर्वी 1998 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून लगेच माऊली या संस्थेची स्थापना केली. त्यांनी शिंगवे तालुक्यात (जिल्हा नगर) मोबाईल क्लिनिक चालवले. वाड्यावस्त्यांवर, आदिवासी वस्त्यांवर जाऊन तेथील रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. दोघांनी वीस बेडचे रुग्णालयही सुरु केले. तेथे सगळ्या सोई सुविधा होत्या...

उषा बाळ यांची सोबती समवेत आव्हानांवर मात

0
मानसशास्त्रज्ञ डॉ.अल्बर्ट एलिस म्हणतात, ‘जेव्हा तुम्ही निर्णय घेता की मी माझ्या समस्यांची जबाबदारी स्वतः घेणार आहे. त्याबद्दल इतर माणसे किंवा परिस्थिती यांना दोष देणार नाही, तो क्षण साक्षात्काराचा असतो. तेथून तुमची प्रगती वेग घेते.’ अंध व बहुविकलांग मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या 'सोबती पालक संघटने'च्या संस्थापक उषा बाळ यांच्या जीवनाकडे बघताना या वचनाची प्रचिती येते. असंख्य आव्हानांना पुरून उरलेल्या या दुर्गेची ही प्रेरक कहाणी...

निरागसपणाचा मंत्र

मी आजी सात वर्षांपूर्वी झाले आणि आजीपणाचा सांस्कृतिक वारसा नातीकडे पोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे हळूहळू आली; ती म्हणजे गोष्ट सांगणे ! गोष्ट सांगणे, ही ‘गोष्ट’ वाटते तितकी सोपी नाही ! कोरोनाच्या काळात मुक्ता - माझी लेक - घरातून ‘ऑनलाईन’ काम करत असताना, माझ्याकडे नातीला गोष्ट सांगण्याची जबाबदारी अधूनमधून आली. साडेचार-पाच वर्षांच्या नातीला -अनाहिताला- व्हिडिओ कॉल करून गोष्ट ऐकण्यात गुंतवणे हे आव्हानच होते...

पियूची वही : गोष्टीमागची गोष्ट… (Piyu’s journal: The story behind a story...

आईनस्टाईन यांनी लिहिलेले एक सुपरिचित वाक्य आहे ‘जर तुमची मुले बुद्धिमान व्हावीत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना परीकथा वाचायला द्या… जर तुम्हाला ती आणखी बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना आणखी परीकथा वाचायला द्या’. त्यामुळे छोट्या मुलांचे अवकाश वाढीला लागते, कल्पनाशक्ती विकसित होते, अनुभव घेण्याची उर्मी वाढते. संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या ‘पियूच्या वही’ने छोट्यांच्या विश्वात असाच अवचित प्रवेश केला आहे. त्यातल्या छोट्या पियूने जे जे केले ते ते करायला उत्सुक असणारी मुले. गोष्टी छोट्या पण आशयघन बदल घडवू शकणारे छोट्यांचे सगळे अनुभव. त्यातून त्यांच्या स्वतंत्र वह्या निर्माण झाल्या. असे सकस वाचन वाऱ्याच्या वेगाने फैलावले तर मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकून कोसळणारे लहानांचे बाल्य सावरायला नक्की मदत होईल...

तू सिंगल आहेस?…

1
एकटेपणा ही संकल्पना ‘इंटरेस्टिंग’ आहे. एकट्या व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन, मानसिकता याचा क्वचित त्रास होऊ शकतो; तो एकटे असल्यामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात दुसरे कोणी लुडबुड करत आहे या गोष्टीचा. ‘तू सिंगल आहेस?’ या प्रश्नामागे असलेली उत्सुकता, कुतूहल, आकर्षण किंवा बोटचेपेपणाची वृत्ती, या साऱ्याला समोर ठेवून ऋता बावडेकर यांनी केलेला विचारांचा उहापोह...

अखंड कार्यरत हसरे चेहरे

बालपणात चांगले संस्कार व्हायला हवेत असे नेहमी म्हटले जाते. पण ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, शिक्षण नाही आणि जे सगळ्या जगापासून लांब, दुर्गम भागात राहत आहेत असे आदिवासी लोक त्यांच्या मुलांना कोणते आणि कसे संस्कार देणार? तशा मुलांना मध्य प्रदेशातील नर्मदालय येथे त्यांच्या नकळत कसे मोलाचे संस्कार मिळत आहेत हे सांगणारा उज्ज्वला बर्वे यांचा लेख...

उमटू दे एखादी स्मितरेषा ! (Let there be smile !)

माणसाला एकटा असताना, त्याच्या मनाला, मनापासून जे करायला आवडते तो त्याचा छंद. समाज माध्यमांचे अधिराज्य असलेल्या सध्याच्या काळात मनोरंजनाची समीकरणे बदलली आहेत. व्यक्तीला काय आवडायला पाहिजे याचा विचार करायला वाव न ठेवता, त्याच्यावर तथाकथित ‘मनोरंजन’ आदळले जाते. काळाच्या ओघात, आम जनता त्याच्या अधीन झालेली दिसते. या सध्याच्या ‘हलक्या फुलक्या’ मनोरंजनाबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे...

विनोबा- स्वरूपातून विश्वरूप !

2
अहिंसा आणि मानवी हक्क यावर नितांत विश्वास असलेले विनोबा भावे. त्यांना लोकांनी आचार्य ही पदवी दिली. ते त्यांच्या लेखणातून त्यांच्या जीवनाचे, आयुष्याचे त्यातील अनेक अंगाचे स्वरूप दाखवून आपल्याला विचारमग्न करतात, विचारांचा रस्ता दाखवतात. त्यांचे विचार आजच्या काळातही सोप्या भाषेत, उदाहरणे देऊन आपल्याला शिकवण देतात. विनोबाजींच्या विचारांचा मागोवा हेमंत मोने यांनी त्यांच्याबरोबर पत्ररूप संवादाने घेतला आहे...

सोशल मीडिया : वरदान की बुमरँग ? (Social Media : a...

संवाद माध्यमांच्या विपुलतेनंतर माणसे जोडली जाण्याऐवजी दुरावत चालली आहेत. संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत दिवसभराच्या घटना एकमेकांना सांगणारे कुटुंबीय त्यांच्या त्यांच्या खोल्यांत ज्याचा त्याचा हँडसेट हातात घेऊन किंवा पीसीवर बसलेले आढळतात. लोकांतील परस्परसंवाद वाढला आहे. मात्र त्याच वेळी माणूस टोकाचा आत्मकेंद्री, प्रसंगी स्वार्थी आणि एकलकोंडाही झालेला दिसतो. सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम विवेकीपणे टाळून केवळ सकारात्मक लाभ घेणे शक्य आहे...

कटिबद्ध कोणाशी ? कशासाठी ?

एखाद्या विचाराने भारावून जाऊन, कामाला सुरुवात करणे, आरंभशूर असणे आणि कालांतराने त्या कामातले स्वारस्य जाऊन तिकडे दुर्लक्ष करणे ही स्वाभाविकपणे दिसणारी घटना. मात्र स्वतः स्वतःच्या कामाशी, निर्णयाशी, वेळेशी आणि शब्दाशी बांधील राहून ते काम, तो विचार तडीस नेणे म्हणजे कटिबद्ध असणे. परिणीता पोटे यांनी त्यांच्या कामातून ‘कमिटमेंट’ ही जाणीव कशी पक्व होत गेली याबद्दल लिहिलेले अनुभव वाचूया...