Home Tags वसंतराव नाईक

Tag: वसंतराव नाईक

दापोलीचे लोकनेते : बाबुराव बेलोसे (Baburao Belose – The man who shaped Dapoli’s tourism...

कोकणच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया ज्यांनी रचला, अशा महनीय व्यक्तींमध्ये रामचंद्र विठ्ठल तथा बाबुराव बेलोसे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते लोकनेते म्हणूनच गणले जातात- लोकांमध्ये मिसळून गेलेला असा पुढारी विरळाच. कोकणच्या समस्या बाबुरावांनी धाडसाने व तडफदारपणे विधानसभेत मांडल्या – त्यांचा पाठपुरावा केला. म्हणून त्यांना त्यांचे सहकारी ‘कोकणची सिंहगर्जना’, ‘कोकणची धडाडणारी तोफ’ असे म्हणत असत...

आनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास ! (Appropriate Technology Man – Anand Karve)

आनंद दिनकर कर्वे हे भारतीय बहुआयामी संशोधक आहेत. त्यांनी आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे ‘ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी’ या विषयावर काम केले. ते पुण्यातील ‘अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ (आरती) या संस्थेचे प्रवर्तक. त्या संस्थेला ब्रिटनमधून ‘ग्रीन ऑस्कर’ समजला जाणारा ‘अॅश्डेन पुरस्कार’ 2002 आणि 2006 साली, असा दोन वेळा मिळाला आहे. तो पुरस्कार चिरंतन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील नावीन्यपूर्ण व लोकोपयोगी प्रकल्पांना दिला जातो...

अचलपूरचे जिंदादिल राजकारणी माधवराव पाटील

अचलपूरचे माधवराव भगवंतराव पाटील हे महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात कमी वयाचे आमदार होते. ही गोष्ट 1957 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र विधानसभेची. त्यांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे होते. व्यासंग प्रचंड होता. त्यांची बुद्धिमत्ता चतुरस्र चाले. त्यांचे वर्णन त्यांचे समकालीन ‘प्रेमळ हृदयाचे धनी’ असे करत...

विदर्भ मिल्स – अचलपूरचे गतवैभव (How Vidarbh Mill lost its existence)

अचलपूरची ‘विदर्भ मिल्स’ ही जुन्या कापड गिरण्यांपैकी एक. अन्य दोन गिरण्या सोलापूर व अंमळनेर येथे होत्या. विदर्भ मिल त्या प्रदेशातील कापसाचे पिक ध्यानी घेऊन बाबासाहेब देशमुख यांनी सुरू केली आणि ती एका वैभवाला पोचलीदेखील. पण सरकारी हस्तक्षेपामुळे तिची पडझड झाली, तेथे ‘फिनले मिल्स’ सुरू करण्यात आली. तीही बंद पडली आहे... विदर्भ मिलची दु:खद कहाणी !...

लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)

वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...