Home Tags संस्था

Tag: संस्था

कस्तुरबा ट्रस्टच्या ग्रामसेविकांचे त्यागमय जग (Kasturba Trust’s Platinum Year)

कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट' त्यांचा अमृत महोत्सव 2020 साली साजरा करत आहे. महात्मा गांधींनी 'कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट' या संस्थेची स्थापना 1945 साली केली. जनतेने स्वयंस्फूर्तीने कस्तुरबांच्या स्मरणार्थ निधी गोळा करून, तो गांधीजींना अर्पण केला. त्यातून तो ट्रस्ट निर्माण झाला.

कलारसिकतेची बहुविधता: संकेत-मधुरा ओक (Art and Entertainment : Dombivali’s VEDH)

मी संकेत आणि मधुरा ओक यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि मला, माझ्या गेली पंधरा-वीस वर्षें छळणाऱ्या प्रश्नाला उत्तर मिळाल्यासारखे वाटले. ती दोघे डोंबिवली-ठाणे-कल्याण येथे वेध अॅक्टिंग अकॅडमी चालवतात. अभिनय व इतर कलाविष्कार शिकवणारे अनेक भुरटे अभ्यासक्रम, कार्यशाळा, शिबिरे यांच्याबाबत लोकांनी ऐकलेले असते.

निसर्गसखी आरती कुलकर्णी (Arti’s Environment Career)

आरती कुलकर्णी या पर्यावरण विषयातील पत्रकार-कार्यकर्त्या आहेत. त्यांनी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता डिजिटल मीडिया असे, पत्रकारितेतील तिन्ही टप्पे पाहिले आहेत; तसेच, त्या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीतील टप्पेही लेखनाच्या अंगाने सांगतात.

लॉकडाऊन काळातील आगळेवेगळे शिक्षण!

राज्यातील ग्रामीण भागांत शाळा बंद, पण शिक्षण सुरू आहे! कोरोनामुळे सर्वत्र शाळांना सुट्ट्या आहेत. परंतु दीक्षा अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचत आहे. दीक्षा अॅपमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे नऊ हजार सातशेहून अधिक व्हिडिओज व स्वाध्याय उपलब्ध आहेत.

देवाघरची बाळे (Gifted Children)

ठाण्याचे रंजन जोशी यांचे घरच चित्रकलेचे आहे. ते स्वतः, त्यांच्या पत्नी विद्या, दोघेही जे.जे. इंस्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा मुलगा आदित्य, सून गौरी; ती दोघेही चित्रकलेचे शिक्षण घेऊन जाहिरातक्षेत्रात कामे करतात. आदित्य-गौरी यांची आठ वर्षांची छोटी मुलगी इरा हिला तिच्या खोलीत चित्रे काढण्यास एक भिंतच्या भिंत आहे

लॉकडाऊनने दिला ‘उमंग’ला जन्म! (Worldwide Art Competition during Lockdown Period)

लॉकडाऊनअजून दोन-पाच महिने तरी मागेपुढे होत राहील -कधी असेल, कधी नसेल- पण जगभरच्या नागरिकांच्या नशिबी घरी बसणे -घरकाम लवकर सुटेल असे वाटत नाही; त्याचबरोबर अशा एकांतवासात, बंदिवासात - वर्णन कसेही करावे - लोकांनी करण्याच्या विविध गोष्टीदेखील चुकणार नाहीत.

संविदानंदांची संजीवन चिकित्सा आजही प्रचलित (Sanvidananda’s Sanjivan Chikitsa)

वैद्य यशवंत काशिनाथ परांजपे हे योगी संन्यासी व जीवन्मुक्त असे संतमहात्मा होते. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी ‘संजीवन चिकित्सा’ ही भारतीय वैद्यक पद्धत शोधून काढली. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी समाधी घेतली! ती समाधी त्यांच्या मावळंगे येथील घराच्या आवारात पाहण्यास मिळते.

अजित कुलकर्णी याचे ‘अनामप्रेम’ (Ajit Kulkarni and Anamprem)

नगरच्या अजित कुलकर्णीला सिनेनट आमीरखान याच्याबरोबर अर्धा-पाऊण तास घालवण्यास मिळाला होता. अजितला आमीरखानचे उमदेपण आवडले, तो सभोवतालचे जीवन जिव्हाळ्याने पाहतो व उत्सुकतेने प्रश्न विचारतो हेही जाणवले. त्याला आमीरखान आवडला, परंतु तो आमीरखानच्या भेटीमुळे एक्साईट झाला नाही.

जलसंवर्धनाचे एकात्म व सुदृढ प्रयत्न हवेत! (Water Scarcity: Integrated Efforts Needed)

स्टॉकहोम जलपुरस्कार माधव चितळे यांना 1993 मध्ये मिळाला. तो नोबेल पुरस्कारच मानला जातो. तो भारतात प्रथमच मिळत होता, तोही मराठी माणसाला! त्यामुळे आम्ही 'विज्ञानग्रंथाली'तर्फे त्यांचा सत्कार व त्यांची मुलाखत असा कार्यक्रम मुंबईत योजला. भा.ल.महाबळ व मीना देवल यांनी मुलाखत घेतली.

संदीप – निराधारांचा आधार (Sandip’s Home for Destitutes)

इतिहास-पुराणकथांत वर्णन केलेली माणसे असतात तशी माणसे सभोवताली दिसली, की प्रत्येक वेळी अचंबित व्हायला होते. कुडाळच्या संदीप परबची गोष्ट तशीच आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याचा गुणसमुच्चय वाढवतच गेलेली आहे. तो शालेय वयात असताना त्याने शेजारच्या बालविधवेची पीडा जाणली. ती माहेरी आलेली होती.