Home Tags विदर्भ

Tag: विदर्भ

अचलपूरच्या नाम्याची भजी आणि…

2
अचलपूरची म्हणून म्हणता येतील अशी मोजकी चार-पाच हॉटेल्सच आहेत/ होती ! एरवी प्रत्येक शहरात हॉटेले आणि खाण्याच्या जागा असतात, तशा त्या अचलपुरातही आहेत. त्यांचा दर्जादेखील टपरीपासून ‘फाइव्ह स्टार’पर्यंत आहे. दुल्हा गेटने अचलपुरात प्रवेश केल्याबरोबर चावलमंडीमध्ये ‘बिना’ नावाचे हॉटेल कनकुरे यांच्या नावाने, थोडेसे अंतर चालून गेले, कीपुन्हा ‘बिन’ नावाचे हॉटेल लागे. ते भुरूमल यांच्या नावाने ओळखले जाई. श्री टॉकीजच्या टेकडीवर हॉटेलवजा एक टपरी होती ती ‘नाम्याचे भजे’ या नावाने ओळखली जाई...

वक्ता दशसहस्रेषु… प्राचार्य राम शेवाळकर

राम बाळकृष्ण ऊर्फ ‘राम शेवाळकर’. ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातकीर्त वक्ते, अध्ययन-अध्यापन-शैक्षणिक प्रशासन यांशी निगडित; तसेच, कला-साहित्य-संस्कृतीविषयक अशासकीय स्वायत्त विविध मंडळांचे सदस्य, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ...

अचलपूरचे लोकनेते भाई सुदाम देशमुख

विदर्भ प्रदेश हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जाई. काँग्रेस पक्षाने कोणत्याही जागेवर कोठलाही उमेदवार उभा करावा, उमेदवार नसेल तर दगड उभा करावा- त्यालाही लोक निवडून देतील असे बोलले जाई ! पण काँग्रेसच्या त्या अभेद्य बालेकिल्ल्याला जणू सुरुंग लागल्याचे वातावरण लोकसभेच्या 1989 च्या निवडणुकीत निर्माण झाले होते. त्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे झुंजार नेते भाई सुदाम देशमुख ...

सातपुड्यातील लोकउत्सव – बहिरम यात्रा

बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी व मराठी भाषिक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे ! यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवर भरते. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेचा लौकिक सर्वदूर आहे. यात्रेला पौराणिक महात्म्य आहे. बहिरम (भैरवनाथ) हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनासोबत अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्य संस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशी सर्व गोष्टींची रेलचेल राहते...

विदर्भ मिल्सचे सांस्कृतिक वैभव हरवले ! (Rich Family of Vidarbh Mills Staff & Workers)

अचलपूरची विदर्भ मिल केव्हाच बंद पडली. तेथे आणलेली ‘फिनले मिल्स’ही टिकू शकली नाही. परंतु ‘विदर्भ मिल्स’चे कामगार व कर्मचारी यांच्यासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने बांधलेल्या वसाहतीतील सांस्कृतिक जीवन हा कित्येक दशकांसाठी तेथील रहिवाशांकरता ठेवा होऊन राहिला आहे. त्या कामगार-कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सवापासून क्रिडास्पर्धेपर्यंत अनेकानेक ‘इव्हेण्टस’ होत. त्या प्रत्येक घटनेमधून मुलामाणसांसाठी नवा संस्कार प्रस्थापित होई. तेच तर त्या रहिवाशांचे ‘धन’ होते. त्यामुळे मिल चालू असणे वा बंद असणे याचा परिणाम त्यांच्या जीवनावर क्वचितच जाणवला असेल...

वऱ्हाडची राजधानी अचलपूर

अचलपूर ही वऱ्हाडची जुनी राजधानी. त्या परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एलिचपूर हे त्याचे जुने नाव. त्या गावाला लष्करी डावपेचाच्या दृष्टीने इतिहासात फार महत्त्व होते. भारताच्या उत्तरेतून दक्षिण प्रदेशात प्रवेश करण्याचे प्रवेशद्वारच ते ! बराणीने अचलपूरचा भारताच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचे शहर म्हणून तेराव्या शतकात उल्लेख केलेला आहे...

बहिरम – व्यापाऱ्यांची जत्रा (Bahiram Festival – Different Perspective)

बहिरम यात्रेला विदर्भात मोठे ऐतिहासिक स्थान आहे. ते बैतुल-होशंगाबाद या जुन्या राजमार्गावर येते. तेथील यात्रेचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे येतो. कॅप्टन मेडोज टेलरच्या ‘कन्फेशन ऑफ ए ठग’ या पुस्तकामध्ये त्याचे काही संदर्भ सापडतात. बहिरमचे दगडी मंदिर, त्याशी जोडलेली मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांची नावे हे सारे भारतीय संस्कृतीचा वेगळ्याच दृष्टीने विचार आणि तत्संबंधी संशोधन करण्यास भाग पाडते...

बहिरमचं झगमग स्वप्न

ऋणमोचन आणि बहिरम या जत्रा वऱ्हाडीतील प्रसिद्ध म्हणाव्या अशा आहेत. लेखक मधुकर केचे यांनी बहिरमच्या यात्रेचे वेधक असे चित्रण त्यांच्या लेखनातून केले आहे. त्यांनी या जत्रेचे वर्णन सातपुड्याच्या पायथ्याशी महिनाभर मुक्कामाला येणारे एक झगमग स्वप्न असे केले आहे...

गुणाकर मुळे- शिंदी ते दिल्ली

0
अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक या गावी जन्मलेले आणि गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले गुणाकर मुळे यांनी विज्ञान लेखन साहित्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी मराठी भाषिक असूनही दिल्लीत हिंदी आणि इंग्रजीतून लेखन केले आहे...

अचलपुरात जयपूरच्या राजा मानसिंग यांची समाधी

माणसाचे आयुष्य त्याला कोठे घेऊन जाईल, काहीच सांगता येत नाही. सम्राट अकबराच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यात ज्या राजा मानसिंग यांचा सिंहाचा वाटा होता, त्या मानसिंग यांच्या आयुष्याची अखेर विदर्भातील अचलपूर या एका छोट्या शहरात झाली. मानसिंग अकबराच्या नवरत्नांपैकी एक मानले जात...