Home Tags मंथन

Tag: मंथन

हेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले! (Herwad Village is charged with reforms for better treatment...

समाजाच्या चौकटी मोडणे सहजशक्य नसते परंतु संपूर्ण गाव एकत्र आले तर काय करू शकते, याचा आदर्श हेरवाडच्या ग्रामस्थांनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव संमत करून घालून दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे. ‘गाव करेल ते राव काय करील’ ही उक्ती हेरवाडकरांनी सार्थ ठरवली आहे...

आयत्या बिळावरील जातीय संस्था !

जे वर्षानुवर्षे चालू आहे ते जातीचे मोठेपण आपण कधी घालवणार? ओबीसी, मराठा, कुणबी, धनगर, ब्राह्मण या सर्वांना त्यांच्या त्यांच्या जातींच्या पंखांखाली राहून सरकारी फायदे व राजकारणातील जागांवर डोळा ठेवणेच आवडते. त्यासाठी मोर्चे, धरणे करण्यावर त्यांचा भर जास्त असतो. निदान शिक्षणाच्या बाबतीत तरी सर्व जाती-धर्मांतील मुलांनी या व्याधीपासून दूर राहून स्पर्धात्मक परीक्षांत पुढे येण्यास पाहिजे...

माकडं मजा बघतायत ! (Mahesh Keluskar’s poem symbolizes the present social circumstances)

0
जे न देखे रवी, ते देखे कवी. खरंच आहे ते. कधी कधी कवी जे लिहितो त्यातील दाहक वास्तवदर्शनाने डोळ्यांपुढे सूर्य, चंद्र तारे चमकू लागतात ! प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर यांनी एक कविता लिहिली आहे, ‘माकडं मजा बघत आहेत !’ समाजात जे विचित्र वातावरण तयार झालं आहे त्याचं अतिशय भेदक वर्णन त्या कवितेत आहे...

जातीच्या आधारावर आरक्षण हे देशहिताचेच! (Reservation to Benefit Nation)

चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र असे वर्ग आहेत. शूद्रांचे वर्णन शुद्रातिशूद्र असेही केले जाते. कारण त्यांची दयनीय अवस्था. त्यांच्यावर काम सोपवले ते त्रिवर्णाची सेवा करण्याचे. म्हणून ते  गुलाम, दास, अस्पृश्य, वेशीबाहेरचे अस्पर्श्य ठरले.

पुन्हा एकदा शिक्षणाच्या नावाने शासनाची लूट (Misappropriation Once Again In State Education Department)

लोकमत या वृत्तपत्राने एक बातमी 16 सप्टेंबर रोजी दिली. बातमीत असे म्हटले आहे, की राज्यामध्ये एकशेएक शाळांना मान्यताच नसताना तेथे शासनाच्या योजना राबवल्याचे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान देण्यात आले! केंद्र शासनाने हे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सदाचार – नीतिमत्ता हे शब्दच खोटे! (Corruption Has Perveded Social Life)

भ्रष्टाचार हा विषय नवा नाही; पण चिंता आता अधिक वाटते. त्याचे कारण भ्रष्टाचाराशिवाय समाजव्यवहार अवघड झाला आहे. गावापासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराशिवाय सर्वसामान्य माणसांची कामे होत नाहीत.

नवाश्मयुग (Navashmayug)

मानवी जीवनातील उत्क्रांतीच्या टप्प्यातील पाषाणयुगाचा कालखंड हा सर्वात मोठा कालखंड आहे.  पाषाणयुगाची विभागणी केली असता पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन टप्पे पडतात. नवाश्मयुग हा अश्मयुगाचा उत्तरार्ध होय. 

बेरोजगारी हटवण्यासाठी शेतीक्षेत्र खुले करा…! (Agriculture as Business will Reduce Unemployment)

भारतातील जमिनीची सुपीकता व विविधता आणि त्यासाठी लागणारे नैसर्गिक पोषक वातावरण जगात अन्य कोणत्याही देशात नाही. म्हणून भारतभूमीत गेल्या पाच हजार वर्षांत साऱ्या जगातून लोक येत गेले आणि तेथे सहिष्णू अशी संमिश्र संस्कृती विकसित झाली.

हिजड्यांच्या टाळीला समाजाची हाळी! (Transgender Community and Social Reaction)

मुलं पहिली-दुसरीच्या वर्गात अक्षरओळख शिकत असताना ‘छ’ अक्षर आलं की दोन शब्द हमखास सांगतात ‘छत्री’ आणि ‘छक्का’. छक्का म्हणत असताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या चोरट्या हसण्यात त्यांचा ‘छक्का’ या शब्दाबद्दलचा, तो शब्द धारण करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा भाव लपलेला असतो.

लिंगभावाची समानता आणि संवेदनशीलता (Gender Equality and Sensitivity)

मुल जन्माला आले, की त्याची ओळख स्त्री, पुरूष अशी होत असते. मात्र मानवी सजीवाला त्याची/तिची लिंग ओळख अकरा ते चौदा या वयात होते. त्यांच्यात त्या वयात शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. त्याच वेळी एकाद्या मुलग्याला त्यांच्यात ‘तो’ नाही याची जाणीव होते.