Home Tags पुणे

Tag: पुणे

आल्फ्रेड गॅडने आणि त्यांचे दापोलीतील एकशेसदतीस वर्षांचे ए.जी. हायस्कूल

अल्फ्रेड गॅडने हे दापोलीला मिशनरी म्हणून 1875-76 साली आलेली स्कॉटिश व्यक्ती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. त्यांनी कोकणातील पहिल्या हायस्कूलची स्थापना दापोली येथे ए.जी. हायस्कूलच्या रूपात 1880 मध्ये केली. गॅडने यांनी प्राचार्य म्हणून जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षे ए.जी. हायस्कूलचे प्राचार्यपद सांभाळले. गॅडने अनाथ मुलांचेही वाली झाले…

देविका घोरपडे फलटणची सुवर्णकन्या (Phaltan’s Boxer Devika Ghorpade)

देविका घोरपडे बॉक्सिंग स्पर्धेत अकरा सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. देविका इतिहासप्रसिद्ध संताजी घोरपडे यांची वंशज. वारसाहक्काने मिळालेले धाडस व मेहनती वृत्ती हे या सुवर्णकन्येच्या यशाचे गमक आहे...

श्रीक्षेत्र नारायणपूर – नारायणेश्वराचे मंदिर (Narayaneshwar Temple of Narayanpur)

नारायणपूरचे नारायणेश्वर मंदिर यादवकालीन आहे. सहसा मंदिरे पूर्वाभिमुख असतात, पण ते पश्चिमाभिमुख मंदिर आहे. तेथे गर्भागृहात स्वयंभू शिवलिंग आहे. इतिहासाची साक्ष देणारे शिलालेख मंदिर परिसरात दृष्टीस पडतात. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर शिल्पकला व नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे...

मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत

0
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...

जगताप सरांचा भर प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर! (Educationist H.N. Jagtap Emphasizes on the Quality Training in...

ह.ना. जगताप हे शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांचा भर अध्यापक महाविद्यालये शिक्षक निर्मितीचे कारखाने न बनता, त्यातून धडपड्या विद्यार्थी हे दैवत मानणारे आणि अभ्यास व वाचन प्रचंड असणारे शिक्षक घडले पाहिजेत, त्यासाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व शिक्षणपद्धत यावर आहे. जगताप यांनी शिक्षक-प्रशिक्षणातील सूक्ष्म अध्यापन, मूल्यमापन पद्धत, मानसशास्त्र व संशोधन पद्धत यांकडे वेळोवेळी लक्ष वेधले आहे…

प्रमोद झिंजाडे – विधवा प्रथा निर्मूलनाचे प्रवर्तक (Pramod Zinjade – Modern day social reformer)

प्रमोद झिंजाडे ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती. ते परिवर्तनवादी आहेत. त्यांनी समाजातील अनिष्टतेवर दंड उगारला आणि न्याय्य गोष्टी घडवून आणल्या. त्यांच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या संकल्पनेने विधवा महिलांना आनंदी जीवनासाठी आशेचा किरण दाखवला आहे...

विधवा स्त्रियांची उपेक्षा – दोनशे वर्षांचा प्रतिकार! (History of social reforms against ill treatment...

विधवा स्त्रीला समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. त्या या विधवा प्रथेला बळी पडल्या आहेत. त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केले, चळवळीही उभारल्या. परंतु एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी व प्रगतशील समाजात विधवा प्रथेसारख्या जोखडात स्त्री भरडली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे...

रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर

न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...

कल्याण इनामदार यांच्या बहुविध कविता (Pune Poet Kalyan Inamdar)

कल्याण इनामदार आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मान्यताप्राप्त कवी होते. त्यांच्या कवितेतून रचना, अभिव्यक्ती, आशय-विषय यांची विविधता आणि नादमयता यांचा सुखद प्रत्यय येतो. इनामदार यांची पाऊणशे पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना ‘कवितेचा ध्यास आणि कविताच त्यांची श्वास’ बनली...

एकेचाळीसावे साहित्य संमेलन (Forty-first Marathi Literary Meet 1959)

श्री.के. क्षीरसागर म्हणजेच श्रीकेक्षी हे निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचे समीक्षक होते. ते सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने प्रकाशात आले. त्यांनी भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवरही टीका केली...