Tag: चिखलदरा
निसर्गरम्य बेलकुंड – वनविश्रामगृहांचे सौंदर्य
मेळघाट सुंदर सुंदर वनविश्रामगृहांनी भरलेले आहे. रायपूर, चौराकुंड, रंगूबेली, कोकटू ... ही सर्व वनविश्रामगृहे इंग्रजांनी वनसंपत्तीच्या प्रशासनासाठी बांधली. त्यांतील विलायती झाक मोहक वाटते. त्या सगळ्यांत आगळेवेगळे दिसणारे विश्रामगृह म्हणजे बेलकुंडचे ! बेलकुंडच्या निसर्गरम्य परिसरातील पर्यटन म्हणजे साहसी आव्हानांचा एक रसरशीत अनुभव...
बहिरम – व्यापाऱ्यांची जत्रा (Bahiram Festival – Different Perspective)
बहिरम यात्रेला विदर्भात मोठे ऐतिहासिक स्थान आहे. ते बैतुल-होशंगाबाद या जुन्या राजमार्गावर येते. तेथील यात्रेचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे येतो. कॅप्टन मेडोज टेलरच्या ‘कन्फेशन ऑफ ए ठग’ या पुस्तकामध्ये त्याचे काही संदर्भ सापडतात. बहिरमचे दगडी मंदिर, त्याशी जोडलेली मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांची नावे हे सारे भारतीय संस्कृतीचा वेगळ्याच दृष्टीने विचार आणि तत्संबंधी संशोधन करण्यास भाग पाडते...
स्थित्यंतर अचलपूर : गतवैभवाची फक्त साक्ष !
‘अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’! या वचनात गावाचा शहराबद्दलचा अभिमान आहे. मात्र ते अचलपूर (आणि परतवाडा) हे शहर पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा फक्त शिल्लक आहेत ! शहराच्या गतकाळातील वैभवाची साक्ष ऐतिहासिक वास्तूंमुळे पटते हे मात्र खरे ...
गाईगोधन परंपरेचे हनवतखेडा
हनवतखेडा हे अचलपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान, नदीपलीकडे असणारे दत्तझिरी मंदिर प्रसिद्ध आहे. गावातील उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गार्इंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते...
रमेश जोशी – वृक्षसावलीने दिला जीवनाला आयाम !
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धामणगाव गढी येथे सर्व लोक आकर्षित होतात ते तेथील रमेश जोशी यांच्या रोपवाटिकेबाबत ऐकून. धामणगाव गढी येथील साधा अल्पशिक्षित मोटर मेकॅनिक ते जोशी रोपवाटिकेचे संचालक रमेश जोशी या भन्नाट व्यक्तिमत्त्वाची ती किमया आहे. त्यांनी लाख-दीड लाख रोपट्यांची वाटिका तयार केली आहे ! त्यांच्या रोपवाटिकेमध्ये क्वचितच एखादे असे रोपटे असेल जे तुम्हाला मिळणार नाही...
अचलपूर तालुका
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ही धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली प्राचीन भूमी ! अचलपूर शहरावर मोगल, मराठा आणि निजाम अशा तिघांनी राज्य केले. पूर्वी या शहराचे नाव नौबाग होते. ती नाग देवांची जन्मभूमी, म्हणून नौबाग नाव पडले अशी आख्यायिका आहे...
मैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी!
‘मेळघाट’ हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील संपूर्ण जंगल असलेला परिसर. मेळघाटात तीनशेवीस गावे आहेत. चार हजारपन्नास चौरस किलोमीटरचा तो प्रदेश चिखलदरा आणि धारणी या...