कोल्हापूर
Tag: कोल्हापूर
विधवा स्त्रियांची उपेक्षा – दोनशे वर्षांचा प्रतिकार! (History of social reforms against ill treatment...
विधवा स्त्रीला समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. त्या या विधवा प्रथेला बळी पडल्या आहेत. त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केले, चळवळीही उभारल्या. परंतु एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी व प्रगतशील समाजात विधवा प्रथेसारख्या जोखडात स्त्री भरडली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे...
कोल्हापूरची शतमानपत्रे : शतकभराचा इतिहास
जी.पी. माळी यांचे ‘कोल्हापूरची शतपत्रे’ हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. गेल्या शतकभरातील 101 मानपत्रे ‘जशी होती तशी’ दिल्याने त्या त्या काळची शब्दकळ व मानपत्रांतील बदलत गेलेली भाषा लक्षात येते. ती मानपत्रे तो सगळा काळ वाचकापुढे उभा करतील. अभ्यासकांना तो फारच मोठा फायदा आहे...
लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)
वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...
केळशी महालक्ष्मी मंदिर – मोगलकालीन प्रभाव(Mahalaxmi Temple at Kelshi)
रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील महालक्ष्मी मंदिराची जी इमारत आहे, तिच्यावर दाक्षिणात्य आणि मोगलकालीन कलेचा ठसा आढळतो. तेथील ध्वनीवर्धन, उगवतीच्या व मावळतीच्या सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना होणारा स्पर्श, झरी, पोळी या आगळ्यावेगळ्या गोष्टी मंदिराचे सौंदर्य वाढवतात...
वाल्मिकीचे पठार – पानेरी
वाल्मिकी पठार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या पठारावर वाल्मिकी ऋषींनी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. तेथील वाल्मिकी मंदिर पूर्वाभिमुख असून, वाल्मिकींची मूर्ती गर्भगृहात आहे. त्या भागाचे आणखी महत्त्वाचे आकर्षण म्हणजे वन्य जीवांचा अधिवास असलेले घनदाट जंगल…
महालक्ष्मी मंदिर कांबीचे (Mahalakshmi Temple at Kambi)
कांबी गावचे महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. गाभाऱ्यात छतावर कोरलेली महालक्ष्मीची मूर्ती हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर कांबीच्या महालक्ष्मीची महती सांगितली जाते…
सखा कलाल – एका कथाकाराची अखेर
सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. त्यांचे ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले...
शालेय शिक्षणक्रमात नैतिक मूल्ये !
समाजात गुन्हेगारी वाढू नये याकरता मुलांना शालेय वयापासून नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे असे म्हणणे कोल्हापूर येथील कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांचे आहे. ते राष्ट्रपती पदकाने तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित अधिकारी आहेत...
… बेडेकर मोठे साहित्यिक का? (Why Bedekar is a great writer?)
‘रणांगण’ या एकमेव कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर कोल्हापूरला आले होते. त्यांना विचारलेला एक प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर...
पस्तिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fifth Marathi Literary Meet 1952)
पस्तिसावे साहित्य संमेलन अंमळनेर येथे 1952 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष भाषाशास्त्रज्ञ आणि व्याकरणकार कृष्णाजी पांडुरंग (कृ.पां.) कुलकर्णी हे होते. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील ओंड हे होय. ते भाषेच्या व्युत्पत्तिशास्त्राचे प्रकांडपंडित मानले जातात...