Home Tags इतिहास

Tag: इतिहास

सचिन भगत – शेतकऱ्याचे चित्त नाण्यांच्या नवीनतेत ! (A farmer with a heart for...

फलटणच्या शिंदेवाडीचे सचिन भगत कसतात शेती. पण त्यांची एक बारीक नजर असते ती त्यांच्या नाणेसंग्रहावर ! मगध-देवगिरी-यादव-मोगल अशी, विविध साम्राज्यांची आणि विविध काळांची नाणी त्यांच्या संग्रही आहेत. त्यातील एक विभाग अर्थातच शिवराई नाण्यांचा - त्याबद्दल बोलताना सचिन भावुक होतात आणि क्षणात त्यांचे बोलणे मराठेशाहीबद्दलच्या अभिमानाने भरले जाते...

मराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी

1
इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...

आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य

0
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...

राहुल गांधी यांचे महत्त्व सद्यस्थितीत आहे काय?

राहुल गांधी यांनी त्यांच्या आयुष्याशी जोडलेले सारे गौरवास्पद संदर्भ त्यांच्या समर्थनासाठी किंवा प्रचारासाठी वापरण्यास कायम नकार दिला. ही एकच गोष्ट आत्ताच्या सत्तेसाठी भिंत बनून उभी आहे. हिंदुत्वाला उत्तरेत उधाण आलेले असताना दक्षिणेने सातत्याने प्रागतिक भारतीयत्वाला स्वीकारलेले दिसून येते...

दादांच्या स्मृतिग्रंथात शालिनीताई अनुपस्थित !

वसंतदादा हे असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतेच, पण शालिनीताई यांचेही कार्यकर्तृत्व स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागेल. त्या महाराष्ट्रातील एक माजी मंत्री, माजी खासदार व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकात असणे आवश्यकच होते...

पंचांग – टिळक की दाते (Lokmanya Tilak Reforms Indian Traditional Almanac)

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे...

निबंधमालेतील भविष्यवेध !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ सुरू केली ती बहुश्रुतता व योग्य पुस्तकांची लोकांना माहिती देऊन मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने. त्यांनी ‘निबंधमाले’तून सकस, वैचारिक आणि दर्जेदार लेखांचे सलग आठ वर्षे लेखन करून 1881 पर्यंत विविध छापखान्यांतून चौऱ्याऐंशी अंक छापून प्रसिद्ध केले. विष्णुशास्त्री यांनी ‘निबंधमाले’तून मनोरंजन न करता लोकजागृती, विचारक्रांती आणि मराठी भाषेची अभिव्यक्ती याची कास धरली...

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...

प्रवासवर्णनांचे भविष्य काय? (The Future Of Travelogues)

सूथबी या जगप्रसिद्ध लिलाव कंपनीने थॉमन व विलियम डॅनियल या काका-पुतण्यांच्या जोडीने लिहिलेल्या प्रवासवर्णनपर पुस्तकाची विक्री केली आणि लिलावात त्या पुस्तकाला तीन लाख सदतीस हजार पौंडांहून अधिक (भारतीय चलनात दोन कोटी सत्तर लाख रुपये) एवढी किंमत आली !...

आपण इतिहास जपतो का? (Do Indians understand value of the history)

मला माझ्या प्रवासवर्णने वाचण्याच्या आवडीमुळे काही शोध लागले. जसे, की -मराठीतील पहिले प्रवासलेखन गोडसे गुरुजींचे ‘माझा प्रवास’ हे नाही; -राघोबादादा यांनी त्यांच्या हणमंतराव नावाच्या कारभाऱ्यांना इंग्रजांची मदत मिळते का ते पाहण्यासाठी इंग्लंडला 1761 मध्ये पाठवले होते. इतर देशांतील प्रवासी हिंदुस्थानात त्याआधी काही शतकांपासून येत होते. त्यांनी ते सिद्ध करणारी प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत...