Tag: आदरांजली
बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)
महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...
पिनकोडचे जनक : श्रीराम वेलणकर (Shriram Velankar – Father of Pincode System)
श्रीराम भिकाजी वेलणकर हे ‘पिनकोड’चे जनक म्हणून ओळखले जातात. ‘पिनकोड’शी प्रत्येक भारतीयाचे नाते घट्ट जोडलेलेआहे. त्याच्या नावासमोर नुसता पिनकोड नंबर लिहिला, तरी ती व्यक्ती देशाच्या कोणत्या भागात राहते हे कळून येते.
शंकरदेव आसाममधील वैष्णव चळवळीचा प्रणेता (Shakardev – Vaishnav Saint In Assam)
विष्णूच्या भक्तीचे कार्य ईशान्येकडील राज्यांत करणारे महापुरुष म्हणजे श्री शंकरदेव. त्यांची वैष्णव चळवळ आसाम राज्यात ‘महापुरुषीय धर्म' या नावाने प्रसारित झाली. विष्णुभक्ती भारताच्या विविध प्रांतांत चैतन्य महाप्रभु, संत कबीर, बसवेश्वर, रामानंद यांनी नेली;
महात्मा गांधीजी आणि व्यंगचित्रे (Gandhi in World Cartoons)
भारतीय गूढ तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला नेहमीच भारून टाकले आहे; तसेच, कुतूहल भारतीय जादूटोणा, तांत्रिक-मांत्रिक, साधू-फकीर यांनी तेथे निर्माण केले आहे. अखिल आधुनिक पाश्चिमात्य जगावर मोहिनी घालणारा खराखुरा ‘नंगा फकीर’ म्हणजे मोहनदास करमचंद गांधी! महात्माजींना ‘नंगा फकीर’ ही पदवी दिली, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे अशा इंग्लंडच्या अत्यंत प्रभावी पंतप्रधानांनी, म्हणजे चर्चिल यांनी...
अहिल्याबाईंच्या गौरवार्थ इंग्रजी पोवाडा (English Ballad in Praise of Ahilyabai Holkar)
अहिल्याबाई होळकर ही मराठ्यांच्या आणि त्यामुळे भारताच्या इतिहासातील एक प्रमुख स्त्री. झाँसीची राणी लक्ष्मीबाई हिच्या बरीच अगोदर आणि बऱ्याच वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या त्या व्यक्तीबद्दल ब्रिटिश समाजातही आदर होता,
महेंद्र प्रताप हीदेखील हाथरसचीच ओळख (Freedom Fighter Mahendra Pratap Also Hails From Hathras)
काय योगायोग आहे, पाहा! काही योगायोग आवडू नये, असे असतात तशातीलच हा. पण त्यामधूनही दिलासा मिळतो! हाथरस नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गेला महिनाभर गाजत आहे.
बुद्धविहार संस्कृतीच्या शोधात… (Integration Of Buddhavihar Culture)
‘बुद्ध विहार समन्वय समिती’ने बुद्ध विहार संस्कृती निर्माण करण्यासाठी 2014 ते 2040 या काळादरम्यान सत्तावीस वर्षांचा कार्यक्रम आखला आहे. पैकी 2014 ते 2020 हा प्रथम चरण पूर्ण होत आला असून त्यात दहा हजार बुद्ध विहारांच्या
तुकडोजी महाराजांची ग्रामगीता (Saint Tukdoji’s Gramgeeta)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला आणि महानिर्वाण 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा महाराजांच्या जीवनातील काळ होता.
देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक बचित्तर सिंह (Memorial Needed For Marathwada War Hero)
बचित्तर सिंह हे देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी कामी आलेल्या शीख रेजिमेंटच्या हवालदार बचित्तर सिंह यांना अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग (Telang, Social Reformer)
काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1850 रोजी झाला. ते विविध पदांमुळे व त्यास अनुरूप कार्यामुळे ओळखले जातात - प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडित, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक,