Home Search
node - search results
If you're not happy with the results, please do another search
एकोणिसावे साहित्य संमेलन – Nineteenth Marathi Literary Meet 1933)
एकोणिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे होते. ते संमेलन नागपूर येथे 1933 साली भरले होते. खाडिलकर यांची ख्याती थोर नाटककार, झुंझार पत्रकार आणि लोकमान्य टिळक यांचे अनुयायी व देशभक्त अशी होती.
अठरावे साहित्य संमेलन (Eighteenth Marathi Literary Meet 1932)
अठराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे होते. ते संमेलन कोल्हापूर येथे 1932 साली भरले होते. मात्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सयाजीराव गायकवाड संमेलनाला हजरच राहू शकले नाहीत !
चंद्रपूरचे सृजन- सांस्कृतिक यज्ञाचे तप ! (Srujan – Unique Cultural Platform From Chandrapur)
नाशिकचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 26-27-28 मार्चला होऊ शकले नाही, परंतु त्याच तारखांना नाशिकहूनच एका आभासी साहित्य संमेलनाची सूत्रे हलवली गेली आणि ते तिन्ही दिवस एक झकास मराठी साहित्य संमेलन घडून आले ! ते योजले होते चंद्रपूरच्या ‘सृजन’ संस्थेने आणि त्याचे सूत्रसंचालन केले होते मृणाल पात्रीकर-धर्माधिकारी यांनी, नाशिकहूनच...
तानुबाई बिर्जे – पहिल्या भारतीय महिला संपादक (Tanubai Birje – The First Indian Woman...
तानुबाई बिर्जे यांनी ‘दीनबंधू’ या वृत्तपत्राचे संपादकपद एकशेवीस वर्षांपूर्वी यशस्वीपणे भूषवले होते ! महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, "त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल !"
सतरावे साहित्य संमेलन (Seventeenth Marathi Literary Meet – 1931)
हैदराबाद येथे भरलेल्या सतराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर हे होते. केतकर हे मराठी भाषेतील कोशयुगाचे प्रवर्तक होत. त्यांचे आयुष्य ज्ञानाच्या उपासनेतच व्यतित झाले. त्यांनी ‘गोविंदपौत्र’ या टोपणनावाने कविता लिहिल्या...
अंध मनोहर वास्वानी यांची शैक्षणिक दृष्टी (Manohar Vaswani Defeats Blindness and Succeeds in Higher...
मनोहर सन्मुखदास वास्वानी यांनी त्यांच्या अंधत्वावर मात करून मिळवलेले यश हे स्तुत्य असे आहे. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबात 1975 साली नागपूर शहरात झाला.
सोळावे साहित्यसंमेलन (Sixteenth Marathi Literary Meet – 1930)
मडगाव (गोवे) येथे भरलेल्या सोळाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘रागिणी’कार वामन मल्हार जोशी. कादंबरीकार वि.स.खांडेकर यांनी वामन मल्हार यांचा ‘नैतिक उंचीचा आदर्श’ असा उल्लेख केला होता. वामन मल्हार यांचे सर्व साहित्य हे सजीव ध्येयवादाने भारलेले आणि विचारांना प्रेरणा देणारे होते. त्यांच्या कादंबऱ्यांतून नवी स्त्री आणि स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाली आहे...
वि.स. खांडेकर यांचे तरुणांना आवाहन (V.S. Khandekar’s Appeal to the Youth)
वि.स. खांडेकर (भाऊसाहेब) यांनी मराठी भाषेला पहिले ज्ञानपीठ मिळवून दिले. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 चा आणि त्यांचे निधन झाले 2 सप्टेंबर 1976 रोजी. भाऊसाहेबांनी विविध प्रकारचे लेखन केले.
पंधरावे साहित्य संमेलन (Fifteenth Marathi Literary Meet – 1929)
बेळगाव येथे भरलेल्या पंधराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘काळ’कर्ते शिवराम महादेव परांजपे हे होते. ते स्वातंत्र्याच्या चळवळीतील आघाडीचे वक्ते, तरुण पिढीला आकर्षित करणारी लेखनशैली असलेले स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होते.
कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)
"ज्या वेळी संग्रहाचं, जतनाचं हे काम तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटेल तेव्हा मला कळवा." लंडन युनिव्हर्सिटीचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी मला आश्वासक सुरात पाठिंबा दिला...