Home Search

फलटण - search results

If you're not happy with the results, please do another search

मॅक्सिन बर्नसन – शिक्षणातील दीपस्तंभ (Maxine Berntsen – Life long efforts for model school)

मॅक्सिन बर्नसन या नॉर्वेजिअन अमेरिकन विदुषी तरुण वयात भारतात आल्या आणि भारताच्याच झाल्या. त्यांचे शिक्षण क्षेत्रात काम मोलाचे समजले जाते. मॅक्सिन बर्नसन या त्यांच्या पीएच डी च्या अभ्यासाची तयारी करत असताना त्यांच्या कॉलेजमध्ये इरावती कर्वे व्याख्यान दौऱ्यावर आल्या होत्या. इरावती कर्वे यांनी त्यांना फलटणला जाण्यास सुचवले. तेथे त्यांची मुलगी जाई निंबकर राहत असे. म्हणून त्या फलटण या गावी 1966 साली आल्या. तीच मॅक्सिनबाईंची कार्यभूमीही झाली !

किल्ले संतोषगड : शिवकालीन वैभव मिळेल?

फलटण तालुक्यात असलेला एकमेव ऐतिहासिक किल्ला म्हणजे ताथवडे गावातील ‘ताथवडा ऊर्फ संतोषगड’. ताथवडा हा डोंगरी किल्ला दहीवडीच्या वायव्येस बत्तीस किलोमीटर, तर फलटणच्या नैऋत्येस एकोणीस किलोमीटरवर आहे. सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे- शंभू महादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग. त्यांपैकी महादेव डोंगररांगेतील कमी उंचीच्या एका टेकडीवर तो किल्ला उभा आहे...

वटवाघळांचे डॉक्टर – महेश गायकवाड

डॉ. महेश गायकवाड हा एक झपाटलेला तरुण ! त्या अवलियाने भीतीचा आणि अंधश्रद्धेचा विषय असलेल्या वटवाघळांवर पीएच डी केली आणि निसर्गात राहून निसर्गाशी संवाद साधला. तो निसर्ग संवाद लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. लोक त्यांना ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणून ओळखतात...

उपेक्षित सीतामाईचा डोंगर

मकरसंक्रातीचा सण फलटण आणि माण तालुक्यांच्या सीमेवरील सीतेच्या मंदिरात साजरा करण्याची पद्धत न्यारीच आहे ! महिला सीतेची आरती करून, मकर संक्रांतीचे सुगड तिच्या पायाशी अर्पण करून मकर संक्रातीचा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो महिला सीतेला सौभाग्याचे वाण देण्यासाठी तेथे येतात. ते सीतामाई देवस्थान सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये आहे. तो डोंगर सीतामाईचा डोंगर म्हणूनच ओळखला जातो...

सर्व जातिधर्माचा एकोपा जपणारा श्रीराम रथोत्सव

एकोपा हे फलटणच्या श्रीराम रथोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तो सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी, संस्थान काळात फलटण संस्थानच्या अधिपती श्रीमंत सगुणामाता यांनी सुरू केला. फलटणच्या या रथोत्सवातून भारतातील धर्म सहिष्णुतेचे दर्शन घडते. रथयात्रेचे स्वरूप सुरुवातीपासूनच मोठे भव्यदिव्य असे आहे. यात्रा जवळपास दहा दिवस चालते...

चंदा निंबकर यांचे मेंढीचे नवे वाण

चंदा निंबकर यांनी ‘निंबकर कृषी संशोधन संस्थे’च्या पशू संवर्धन विभागात कामाला 1990 पासून सुरुवात केली. त्यांना मेंढीच्या जातीचा शोध घेत असताना पश्चिम बंगालमधील सुंदरबन भागातील मेंढीची जात ‘गरोळ’ ही सापडली. त्यांनी गरोळ मेंढ्यांचा कळप फलटण येथे आणून त्यांची पैदास व संवर्धन केले. त्यांनी 1998 पासून वीस वर्षे सातत्याने संशोधन करून जुळी कोकरे देणाऱ्या ‘नारी सुवर्णा’ या मेंढीच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे...

चाकोरीबाहेरचा पैदासशास्त्रातील मार्ग – चंदा निंबकर

चंदा निंबकर यांनी त्यांची कारकीर्द कशी घडली तो अनुभव लेखाद्वारे मांडला आहे. त्या म्हणतात, माझा विज्ञानातील प्रवेश हा तथाकथित मागच्या दाराने झाला असताना मी ‘लीलावतीची मुलगी’ कशी काय झाले? त्यांनी 1976 मध्ये विज्ञान नव्हे तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. आता मात्र त्या अनुवंश शास्त्राची तत्त्वे ह्या विज्ञानक्षेत्रात आकंठ बुडाल्या आहेत. त्या शास्त्राचा वापर करून तळागाळातील शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्यांचे उत्पन्न व जीवनमान सुधारणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे !

भाषादूत मॅक्सिन बर्नसन

2
मॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे...

अवलिया कलावंत- वसीमबारी मणेर

0
फलटणचा वसीमबार्री मणेर हा अवलिया कलावंत आहे ! कला हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे. तो चित्रपट दिग्दर्शक-निर्माता, लेखक, चित्रकार, चलचित्रकार, शिक्षक, प्रकाशक, बालसाहित्यिक, स्थापत्य विशारद अशा विविध क्षेत्रांत, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मुशाफिरी करतो; सिनेनिर्मिती आणि लेखन कार्यशाळा घेतो...

कृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर

0
बनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती...