Home Search
नामदेव - search results
If you're not happy with the results, please do another search
संभाजीराजांचा मृत्यू गुढीपाडव्यास झाला? (Did Aurangjeb Kill Sambhaji Maharaj On Auspicious GudhiPadwa Day)
संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मनुस्मृतीतील संकेतांनुसार 11 मार्च 1689 या दिवशी केली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी, मुख्यतः विरोधक ब्राह्मणांनी आनंदाच्या भरात गुढ्या उभारल्या अशा आशयाचे संदेश सोशल मीडियात अधुनमधून फिरतात.
चौगाव आमचा पारच बदलला! (Changing Face of Chaugaon Village)
माझे गाव चौगाव. चौगाव-गोताणे म्हटले, की लक्षात येते ते धुळे जिल्ह्याच्या, धुळे तालुक्यातील चौगाव. नाही तर सटाणा गावाजवळ एक चौगाव-रातीर आहे, चोपडा तालुक्यात एक चौगाव-लासूर आहे. माझे गाव मालेगावपासून साधारण चाळीस किलोमीटर उत्तरेला आणि नासिक जिल्ह्याच्या सीमेपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर आहे. ते ईराज नदीच्या काठावर डोंगरउतारावर वसले आहे.
तुकडोजी महाराजांची ग्रामगीता (Saint Tukdoji’s Gramgeeta)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला आणि महानिर्वाण 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा महाराजांच्या जीवनातील काळ होता.
कीर्तन परंपरा आणि अपेक्षा (Art Of Keertan – Maharashtra’s Rich Tradition)
कीर्तनपरंपरा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे वैभव होय. कीर्तन परंपरा म्हणजे रंजन आणि शिक्षण यांचा अपूर्व समन्वय आहे. महाराष्ट्रात नारदीय आणि वारकरी अशा दोन कीर्तन परंपरा आहेत. मात्र अलिकडे नारदीय कीर्तन परंपरा दुर्बल झाली आहे.
रामदासांची रामोपासनेतून बलोपासना (Saint Ramdas & His Work)
समर्थ रामदास स्वामी हे संत पंचायतनातील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या मालिकेतील त्यांच्याच तोडीचे समर्थ रामदास स्वामी हे संत होत. रामदास हे रामाचे दास होते. ते समर्थ होते, म्हणजे ते बलवान, प्रभावी, शक्तिशाली, कर्तृत्ववान असे पुरुषार्थी होते.
शिरूर-हवेली परिसर स्मृतिवनांनी हिरवागार! (Tree Plantation Spreads in Shirur Industrial Belt)
पुण्याच्या शिरूर व हवेली या तालुक्यांतील काही मंडळींनी देशी पद्धतीची झाडे लावण्याचा आणि ती कोणत्याही परिस्थितीत जगवण्याचा प्रयत्न गेली पाच वर्षे चालवला आहे. त्यामधून पर्यावरणप्रेमींना मार्गदर्शक ठरेल असेच काम उभे राहिले आहे.
मंगळवेढा, भूमी संतांची (Mangalvedha Saintly Land)
मंगळवेढा हे गाव संतभूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. ते आहे सोलापूर जिल्ह्यात; पंढरीच्या विठुरायापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर, दक्षिणेला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समन्वय तेथे साधला जातो. मंगळवेढा तालुक्याची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे.
शिक्षणक्षेत्रातील अग्रेसर शहाबाज (Shahabaj – Village With Long Educational Tradition)
शहाबाजहे रायगड जिल्ह्यातील तीनचार हजार लोकवस्तीचे छोटे गाव, पण ते शिक्षणक्षेत्रातील प्रसिद्धीने खूप मोठे झाले. त्या खेड्याने रायगड जिल्ह्याला शिक्षकांचा पुरवठा सतत केला. शहाबाज गावाने त्याचे वेगळे स्थान आगरी समाजाच्या चळवळीचे व सुधारणांचे उगमस्थान म्हणूनही निर्माण केले आहे.
संत गोरोबाकाका, तेर आणि साहित्यसंमेलन (Saint Goroba & Literary Event)
उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दोन नावांत सामावलेली आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगदंबा तुळजाभवानी आणि दुसरे नाव म्हणजे तेर गावचे ‘वैराग्यमहामेरु संत गोरोबाकाका'. गोरोबांच्या अभंगाशिवाय संतवाङ्मय पूर्ण होत नाही
शिक्षक विनीत पद्मावारचे आदिवासी स्वप्न (Teacher Changes Face of Adivasi Village)
विनीत पद्मावार गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोयनगुडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापक आहेत. भामरागड हा आदिवासीबहुल तालुका. तेथील आदिवासीपाड्यांत माडिया ही बोलीभाषा बोलली जाते. मुलांना प्रमाणभाषा समजत नाही. त्यामुळे शिक्षणात मुख्य अडसर भाषेचा येतो.