Home Search

छंद - search results

If you're not happy with the results, please do another search

बुद्धीसवे भावना ! (Emotional quotient is necessary part of logical thinking)

0
सद्भाव मनात असणे ही सहज प्रक्रिया आहे. तो शोधण्यासाठी काहीतरी अद्वितीय करण्याची किंवा त्याचा पाठलाग करण्याची आवश्यकता मुळीच नसते. अवतीभवती घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगांतूनदेखील व्यक्तीवर सद्भावनेचा सखोल परिणाम होत असतो. प्रवासात भेटणारी माणसे, प्राणी-पक्षी-वनस्पती यांना समजून घेण्यासाठी किंवा प्रसंग सहृदयतेने टिपण्यासाठी हवे संवेदनशील मन. त्या मनाला समानानुभूतीने विचार करण्याची क्षमता हवी, जागरूकता हवी आणि समजून घेण्याची कुवतही हवी. तसे संवेदनक्षम मन आणि घटना व व्यवहार यांच्याकडे बघण्याची सजगता असेल, तर कितीतरी गोष्टी शिकवल्या जातात असे सांगणारा स्वप्रचीतीने प्रकट झालेला नीलिमा खरे यांचा हा लेख...

बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील कागदपत्रांचा संग्रह (Ambedkar’s handwritten diaries and other material preserved in...

बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहातील दुर्मीळ कागदपत्रे रासायनिक प्रक्रियेने सुरक्षित करून जतन करण्याची योजना सिद्धार्थ महाविद्यालयाने हाती घेतली आहे. त्यामध्ये बाबासाहेबांच्या टिपाटिप्पणी, नोंदी, प्रदीर्घ लेखन अशा विविध गोष्टींचा समावेश आहे; बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील या टिपणी कशा कशाच्या असाव्यात ! ‘रिपब्लिक’ शब्दाच्या अर्थच्छेदापासून व्हायोलिन वाद्याची स्वरलिपी... एवढेच काय, पत्नीच्या बाळंतपणानिमित्ताने केलेल्या ‘मॅटर्निटी नोट्स’ असे विविध तऱ्हेचे साहित्य त्यात आहे. सिद्धार्थ कॉलेजला हे शक्य झाले ते श्रीपाद हळबे या अर्थ व विधी क्षेत्रातील व्यावसायिकाने दिलेल्या देणगीमुळे...

बदनापूर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचे ध्येय…! (Devesh Pathrikar aims to have Badnapur cataract free)

0
देवेश पाथ्रीकर हे आहेत बदनापूर येथे मानसशास्त्राचे प्राध्यापक, पण त्यांनी वसा घेतला आहे तालुका मोतिबिंदू मुक्त करण्याचा. ते तालुक्यातील गावोगावी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून राहिले आहेत. डोळ्यांचा रोगी सापडला, की ते त्याला जरुरीप्रमाणे ‘औषधी-ड्रॉप्स’चे विनामूल्य वाटप करतात अथवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलात नेतात. त्यांचा प्रत्येक आठवड्याचा कार्यक्रम लागलेला असतो. त्यात मोतिबिंदूचे निदान असलेल्या रूग्णांवर थेट मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना घरपोच सोडले जाते...

महेश लाडणे : नाणीसंग्रह; अभ्यास अभी बाकी है !

शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावच्या महेश लाडणे याच्या नाणीसंग्रहाची सुरुवात कुतूहलातून झाली. तो इयत्ता नववीत शिकत असताना घरात जुनी पितळी तांब्याची भांडी, वजनमापे अशा काही वस्तू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यात वजनमापे वाटतील अशा गोलाकार आणि जाडजूड तांबे धातूच्या काही गोष्टी होत्या. तो ते साहित्य जमवत गेला. त्यातून त्याचा नाणेसंग्रह आकारास आला. त्याच्या संग्रहात आठशे नाणी आहेत. ती विविध धातूंची, विविध आकारांची, विविध किंमतीची, विविध लिपींतील आहेत...

प्रशांत परांजपे : समाजभान जपणारा बहुरूपी

प्रशांत परांजपे पाक्षिक ‘सर्वांगीण निवेदिता’ आणि ऑनलाईन पत्रकारितेतील ‘निवेदिता फास्ट न्यूज’ अशी दोन नियतकालिके चालवतात. त्याशिवाय ते इतर वृत्तपत्रांसाठी वेळोवेळी लेखन करत असतात. त्यांनी प्लास्टिकविरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे आणि प्रदूषण व अस्वच्छता यांना विरोध केला आहे. वृक्षतोड थांबावी म्हणून मोहिमा आखल्या आहेत. खासगी स्वयंसेवा हे तर त्यांचे स्वत:चे खास क्षेत्र. प्रशांत व्याख्याने, लेख, बातम्या अशा माध्यमांतून कोकणासमोर सतत येत राहिले आहेत. त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची दापोली शाखा जालगावातून चालवली...

दापोलीतील साहित्यजीवन

‘श्यामची आई’, ‘गारंबीचा बापू’ या साहित्यकृतींमुळे दापोलीचा ठसा साहित्य क्षेत्रात उमटला. दापोली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. तेथील तरुण वर्ग मुंबई-पुण्याकडे ‘करिअर’साठी जात आहे. असे असतानाही दापोलीचा निसर्ग, तेथील जीवन बाहेरगावी गेलेल्या तरुणांच्या मनातून जात नाही. ती ते त्यांच्या साहित्यातून प्रकट करतात. खुद्द दापोलीत राहणारे साहित्यिकही त्यांच्या परीने त्या करता धडपडत असतात. त्यांचा आढावा...

अचलपूरचे एकशेतीस वर्षांचे वाचनालय (One hundred and thirty year old library of Achalpur)

बाबासाहेब देशमुख यांनी अचलपूर शहरात गेल्या शतकारंभी अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांतील पहिली ‘सार्वजनिक वाचनालय’ ही होय. त्या संस्थेचा स्थापना दिनांक उपलब्ध नाही. मात्र वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीची जागा स्थानिक नगरपालिकेने 1893 साली वाचनालयास दिल्याचा उल्लेख आहे. वाचनालयास शहराच्या मध्यभागात प्रशस्त जागा मिळाली, परंतु साजेशी इमारत नव्हती. त्याकरता बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः बरीच वर्षे वाचनालयाचे काम पाहिले...

तपस : आई-बाबांचे दुसरे घर (Tapas : My Parents’ Second Home)

आई-वडील वृद्ध झाले आणि ती दोघेच राहत असतील तर त्यांच्या काळजीने मुलींचा जीव व्याकूळ होणारच ! पण त्यांना त्यांचा संसार असतो, संसारातील चढउतार पार करताना, आई-बाबांकडे जसे लक्ष देण्यास हवे तसे लक्ष मुलगा-मुलगी देऊ शकत नसल्याने त्यांच्याही मनाची उलघाल होत असते. त्यांना घर सोडून दुसरीकडे ठेवावे का? या अनुच्चारित प्रश्नामुळेदेखील मन अपराधाने खात राहते. अशा प्रसंगी निर्णय काय घ्यावा? कसा घ्यावा? याबाबत ममता महाजन यांनी लिहिलेला त्यांचा हा अनुभव द्विधा मनस्थितीत असलेल्या अनेकांना विचार करण्यास मदत करेल...

नाण्यांच्या माध्यमातून अर्थसाक्षरता – जयवंत जालगावकर (Jaywant Jalgaonkar – Bankman loves coins and liquor...

दापोलीचे जयवंत जालगावकर हे जवळजवळ गेली तीस वर्षे स्थानिक अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या व कधी कधी राज्य बँकेच्या जबाबदाऱ्याही असतात. तरीसुद्धा जयवंत हे केव्हाही दिलखुलास असतात. जयवंत यांना दोन महत्त्वाचे छंद आहेत. पहिला विविध वस्तू, विशेषतः नाणी जमवण्याचा. त्यांच्याकडे सत्तावीस देशांची चलनातील नाणी आहेत. जयवंत यांचा दुसरा छंद अनोखा आहे. ते दारूच्या भरलेल्या बाटल्या जमा करतात. विविध आकारांच्या, विविध शैलींच्या, विविध देशांच्या अशा पाचशेदहा बाटल्या त्यांच्या संग्रही आहेत...

एक यशोगाथा! (Yasho’s Story)

यशोदा वाकणकर ही स्वतःला असलेल्या व्याधीचे दुष्परिणाम सोसल्यावर एपिलेप्सी रुग्णांच्या बाबतीत मोलाचे, विधायक काम करते आहे. तिने अपस्माराच्या आजारातून बरी झाल्यावर 2004 मध्ये पुण्यात ‘संवेदना फाउंडेशन’ हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप सुरु केला. आनंदी राहण्यासाठी कितीतरी लहान मोठी कारणे असतात. पण कारणाशिवाय आनंदी राहण्याचा एक मोठा धडा स्वानुभवाने ती सोपा करून सांगते. तिचे काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले आहे...