Home Search

चित्रपट - search results

If you're not happy with the results, please do another search

सुचेता-राजेंद्र धामणे डॉक्टर दांपत्याचे मनगाव

राजेंद्र आणि सुचेता धामणे ह्या डॉक्टर दांपत्याचे सहजीवन सुरू झाले तेच मुळी समाजासाठी काहीतरी करावे या समविचाराने. दोघेही एकत्र होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच गरजूंना मदत करत असत. वैद्यकीय पदवी पंचवीस वर्षापूर्वी 1998 मध्ये घेतल्यानंतर त्यांनी दोघांनी मिळून लगेच माऊली या संस्थेची स्थापना केली. त्यांनी शिंगवे तालुक्यात (जिल्हा नगर) मोबाईल क्लिनिक चालवले. वाड्यावस्त्यांवर, आदिवासी वस्त्यांवर जाऊन तेथील रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले. दोघांनी वीस बेडचे रुग्णालयही सुरु केले. तेथे सगळ्या सोई सुविधा होत्या...

पैठणीचे गाव- येवला (Yeola)

महाराष्ट्रातील अनेक गावांना वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. तेथे विशेष उद्योग व्यवसाय आहेत. या गावांच्या अंतरंगात शिरले की त्यांच्या भरजरी पोताची जाणीव होते. असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातले – येवला. ते महाराष्ट्रातीलच नाही तर देश-विदेशातील महिलांच्या जिव्हाळ्याचे गाव. स्वातंत्र्य चळवळीत या गावाचा महत्त्वाचा सहभाग होता. माधव सावरगावकर हे प्रथितयश लेखक मुळचे येवल्याचे. त्यांनी त्यांच्या गावाचा इतिहास आणि वर्तमान जिव्हाळ्याने या लेखात सांगितला आहे...

माझी मुंबई (My Mumbai)

0
मुंबई शहराच्या पोटात अनेक मुंबई आहेत. संध्याकाळच्या समुद्रावर दिव्याच्या लखलखटाने उजळलेली मुंबई, उदास काळोखात तेवणारी मुंबई आणि अंधारात बुडून गेलेली भयावह मंबई यांची प्रतिबिंबे तरंगत असतात. त्यांची आपापसात सरमिसळ होत असते. अशी ही मायारूपिणी मुंबई हेच अनेकांचे ‘गाव’ असते. त्याचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान प्रत्येकाला आपापल्या नजरेतून दिसतो. अशा या ‘गावाची’ विविध रूपे एकत्र करून एक कोलाज तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी मानस आहे...

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)

म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...

मैं वो झेलम नहीं हूँ (I am not that Zelum)

‘मोगरा फुलला’ या दालनाचे उद्दिष्ट आहे, जाणीव जागृती आणि संवेदनशीलतेचा जागर. आज भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांकडे ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘माझा काय संबंध’ असे म्हणत दुर्लक्ष केले जाते. हे वाईट घटनांच्या बाबतीतच घडते असे नाही तर अनेक चांगल्या, सकारात्मक घटनाही दुर्लक्षिल्या जातात. आजचा लेख ‘मैं वो झेलम नहीं हूँ | ‘ हेच घटीत अधोरेखीत करत आहे...

मनकर्णिका ऊर्फ मनू – झाशीची राणी (Queen of Zhansi was Manu before she was...

झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न, द.ब. पारसनीस यांनी लिहिलेले पहिले चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील शेसव्वाशे वर्षांत अनेक लोकांनी विविध अंगांनी केला आहे, त्या सर्वांमध्ये प्रतिभा रानडे यांचे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा चरित्र ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्या वेळच्या लोकांच्या भावना; तसेच, आजूबाजूची परिस्थिती याचे उत्तम दर्शन त्या पुस्तकामधून घडते...

उमटू दे एखादी स्मितरेषा ! (Let there be smile !)

माणसाला एकटा असताना, त्याच्या मनाला, मनापासून जे करायला आवडते तो त्याचा छंद. समाज माध्यमांचे अधिराज्य असलेल्या सध्याच्या काळात मनोरंजनाची समीकरणे बदलली आहेत. व्यक्तीला काय आवडायला पाहिजे याचा विचार करायला वाव न ठेवता, त्याच्यावर तथाकथित ‘मनोरंजन’ आदळले जाते. काळाच्या ओघात, आम जनता त्याच्या अधीन झालेली दिसते. या सध्याच्या ‘हलक्या फुलक्या’ मनोरंजनाबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे...

कहीं ये वो तो नहीं ?… भाग दोन (Musings)

ज्या प्रेक्षकाकडे पूर्वानुभव असतो त्याच्यापर्यंत दृश्यात सूचित होणाऱ्या या संवेदना दृश्य आणि ध्वनीतून पोचतात. चंद्रमल्लिकेचा, चंदनाचा गंध, चाफ्याच्या रंगाच्या साडीचा रंग, जवळिकीतून होणारा अस्पष्ट स्पर्श, येणारा अंगगंध या संवेदना दृश्यातल्या संवादातून आणि दृश्याच्या रचनेतून प्रेक्षकापर्यंत पोचतात. त्यातून संयत शृंगार रसाची निष्पत्ती होते. विविध कलांचा अनुभव देणाऱ्या संवेदनांचा अनुभव देणारा सिनेमा. आज विश्वाच्या संवेदनांना व्यापून राहिलेल्या ‘सिनेमा’तले हे काही सुंदर क्षण. किती वेचावेत, किती मोजावेत...

कहीं ये वो तो नहीं?… (Musings)

हिंदी सिनेमाचे सगळ्यांच्याच मनात एक आढळ असे स्थान आहे. त्यातही हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातील गाणी आणि संवेदन हे जणु हातात हात घालून प्रकटते. जसा पावसाआधी मातीचा सुगंध येतो आणि मग पाऊस प्रकटतो तसे एखाद्या खास गाण्याचे सूर काहीतरी आठवण मनात प्रकट करुन जातात आणि असे एखादे गाणे प्रत्येक संवेदनशील मनकोपऱ्यात असतेच असते... ‘ओ रात के मुसाफिर’मधल्या लता-रफी यांच्या सुरांना चांदण्याचा रंग असतो. गुरुदत्तच्या ‘जाल’मधलं ‘ये रात ये चांदनी फिर कहाँ’ ऐकताना चांदण्याला उधाणलेल्या समुद्राचा खारा वास येतो...

फिटे अंधाराचे जाळे ! – मनोबाधेसाठी एकलव्य (Eklavya vanishes the web of depression !)

माणसांना मन मोकळे करण्याची इच्छा बऱ्याचदा असते, पण त्यांना त्यांचे म्हणणे नीट, शांतपणे ऐकून घेतले जाईल याची खात्री नसते. शिवाय, त्यांना त्यांनी कोणाला काही सांगितले तर ते ‘जज’ करतील, नावे ठेवतील अशी भीतीही वाटते. मी भावना व्यक्त करता न आल्याने कोंडमारा सहन करत जगणारी माणसे आजुबाजूला बघितली होती. त्यामुळे मला मानसिक आरोग्य हा विषय किती गंभीर आहे याची कल्पना होती. म्हणूनच, माझी इच्छा त्या विषयाशी संबंधित क्षेत्रात काम करण्याची होती...