Home Search

%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5 - search results

If you're not happy with the results, please do another search

बालंबिका देवीचे बालमटाकळी

0
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...

यकृताचे प्रत्यारोपण – दिनेश झिरपे

डॉ. दिनेश कुंडलिक झिरपे हे सध्याचे देशातील आघाडीचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत ! ते शेवगावसारख्या ग्रामीण भागातून आले. त्यांनी Gastro Intestinal Surgery या विषयातील सुपर स्पेशॅलिटी विषयात राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक पटकावला आहे...

तेजस्वी सातपुते – अंधारातून आयपीएसच्या तेजाकडे (Young IPS Tejasvi Satpute)

शेवगाव तालुक्यातून थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी तेजस्वी बाळासाहेब सातपुते ही पहिली व्यक्ती ! ती पुणे येथे गुप्तचर विभागात आयपीएसपदी कार्यरत आहे. तिने तिच्या कारकिर्दीत तडकाफडकी अनेकदा करियरच्या वाटा बदलल्या व हव्या त्या क्षेत्रात यश मिळवले. त्याचीच ही कहाणी...

मंदार भारदे यांची झेप विमानाची !

मंदार अनंत भारदे नावाचा शेवगावकर तरुण विमाने आणि हेलिकॉप्टर्स भाड्याने देतो; त्याच्या स्वत:च्या मालकीची विमाने आणि विमान उड्डाण कंपनी आहे. त्याने ‘मंदार अनंत भारदे’ या त्याच्या नावातील आद्याक्षरे घेऊन कंपनी स्थापन केली आहे - Mab एव्हिएशन !

गिरगावची दिवाळी – फराळ, अंघोळ, आकाशकंदिल…

पाठारे प्रभू ज्ञातीचे वास्तव्य दक्षिण मुंबईत प्राधान्याने होते. ते स्वतःला अस्सल मुंबईकर मानतात. त्या ज्ञातीमध्ये वर्षभर सर्व सण धूमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आहे. दिवाळीत पाठारे प्रभू पद्धतीचे सुकडी, तवसे, शिंगडी, भानवले, पंगोजी, मुम्बरे, बुंदीचे कडक लाडू असे पदार्थ केले जात. त्यांच्या पारंपरिक पदार्थांबरोबरच तेथील विशिष्ट प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध होत्या. असे म्हणतात, की त्या रांगोळ्या बघण्यास त्या काळी ब्रिटिश अधिकारी घोडागाडीतून येत...

आसूद गावची पुरातन पाणी वाटप व्यवस्था

2
आसूद हे गाव डोंगरउतारावर आहे. त्या गावच्या भगिरथ-पुत्रांनी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा उपयोग करून ‘गंगा अंगणी’ आणली ! त्यामुळे गावात अष्टौप्रहर पाणीच पाणी झाले. ती अनोखी पाणी वाटप योजना तीनशे वर्षे चालू आहे. त्या पुरातन पाणी वाटप व्यवस्थेत फारसा बदल झालेला नाही. पाण्यावरून कोणी वाद करत नाहीत. कारण ती गोष्ट न्याय्य पद्धतीने चालवली जाते…

पाखाडी, पदपथ… कोकणचे फूटपाथ

4
पाखाडी हे पदपथ वा फूटपाथ यांचे एक रूप होय. सखल भागातून उंचावरच्या टेपाडावर जाण्या-येण्यासाठी दगडांनी बांधलेला रस्ता म्हणजे पाखाडी. त्या रस्त्याला फरसबंदी करण्यासाठी कोकणात मिळणाऱ्या जांभा दगडांचे चिरे वापरत. चार हजार वर्षांपूर्वी ग्रीकमधील नगररचनेत ते बांधण्याची पद्धत अवतरलेली दिसते. लंडनमध्ये सतराव्या शतकात रहदारीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी रस्त्यापासून किंचित उंच पदपथ बांधण्याची पद्धत रूढ झाली...

अचलपूर नगरी- ऐतिहासिक वास्तू

अचलपूर म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली आणि एकेकाळी विदर्भाची म्हणजेच वऱ्हाडची राजधानी हे बिरुद मिळवणारी नगरी ! त्यामुळे त्या नगरीत विविध वंशांच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात अनेक वास्तू बांधल्या. त्या शिल्प-स्थापत्यांमध्ये मंदिर स्थापत्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा अशी काही मंदिरे आहेत. त्यामध्ये केशव नारायण मंदिर, कार्तिकेय मंदिर, देवी मंदिर यांचा उल्लेख करता येईल...

आधुनिक अचलपूरचे शिल्पकार – बाबासाहेब देशमुख (Architect of Modern Achalpur – Babasaheb Deshmukh)

1
अचलपूरच्या सामाजिक-सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय या क्षेत्रांत देशमुख कुटुंबाचे योगदान मोलाचे आहे ! बाबासाहेबांनी इंग्रजीराजवटीत अचलपूरनगरीच्या प्रगतीसाठी आधुनिकतेचा ध्यासघेऊन सर्वात प्रथम अचलपूरमध्ये सार्वजनिकवाचनालय, विविध शिक्षण संस्था, कापड गिरणी, आयुर्वेदऔषधालय स्थापन करून अचलपूर नगरी अधिक विकसित केली…

यशोगाथा, पाणीदार धोंदलगावची…

0
वैजापूरमधील धोंदलगावाने गेली पंचेचाळीस वर्षे पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्या गावात आनंद असोलकर या जादूगाराने येऊन गावातील नागरिकांना पाणी अडवण्याचे महत्त्व समजावले आणि ते फक्त लोकसहभागातून शक्य आहे ही भावना त्यांच्या मनी बिंबवली...