Home Search

प्राचीन - search results

If you're not happy with the results, please do another search

नाणेघाट (Naneghat)

सातवाहन हे इसवी सन पूर्व 222 ते इसवी सन 228 या काळातील महाराष्‍ट्रातले पहिले ज्ञात ऐतिहासिक राजघराणे. त्‍यापूर्वीचा महाराष्‍ट्राचा इतिहास फारसा उजेडात आलेला नाही. कल्याण-जुन्नर मार्गावरील नाणेघाटाच्‍या परिसरात सातवाहनांच्या राज्‍यांची प्रथम स्‍थापना झाली. नाणेघाट हा तेव्‍हा उत्‍तरेकडून कोकणात उतरण्‍याचा मुख्‍य मार्ग होता. जुन्‍नर हे सातवाहनांचे राजधानीचे शहर आणि व्‍यापारी केंद्र असल्‍यामुळे तेथे अनेक रोमन, ग्रीक व्‍यापाऱ्यांनी वस्‍ती केल्याचे पुरावे सापडतात...

श्रीमंत नाना फडणीस यांचा वाडा (Nana Phadnis’s famous Menavali-Wai palace)

1
नाना फडणीस यांनी बांधलेला मेणवलीचा वाडा ही वाई येथील ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट. तो उत्कृष्ट कामाचा नमुना आहे. नानांचे वंशज तेथे राहत आहेत. त्यांनी नानांच्या मेणवली व बेलबाग या दोन्ही वास्तू उत्तम प्रकारे जतन केल्या आहेत. तो शांत परिसर नानांच्या एकांतप्रिय मनाला भावला असणार; म्हणून नानांनी तेथे वास्तव्यासाठी सुंदर वास्तूंची व अतिसुंदर अशा घाटाची निर्मिती केली...

वाडवळी बोली – अम्लान लेणे (Dictionary of Wadvali Dialect)

वाडवळी ही उत्तर कोकणपट्टीतली प्रचलित बोली. कोंकणी, पोर्तुगीज, लॅटीन, फारसी, अरबी आणि मराठी अशा विविध भाषांमधले शब्द सामावून घेणारी ही एक मनोज्ञ बोलीभाषा आहे. या बोलीभाषेचा शब्दकोश मूळचे वसईचे असलेले आणि सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले रिचर्ड नुनीस यांनी संपादित केला आहे. मराठीला कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे त्या परंपरेत हा शब्दकोश मोलाची भर घालेल. या शब्दकोशाला डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेतला हा संपादित अंश...

वृत्तबद्ध कविता- स्थिती आणि गती (Poetry Writing in Metre – Present Scenario)

मराठी कवितेच्या सर्वसाधारण वाचकाची अशी समजूत असते की वृत्तबद्ध कविता ही काहीतरी भूतकाळातली गोष्ट आहे. कवितेला वृत्तामध्ये बांधण्यामुळे आशयाला धक्का लागतो किंवा अभिव्यक्तीवर बंधने येतात. वृत्ताविषयी अशीही समजूत असते की व्याकरणाच्या पुस्तकात असतात तेवढीच वृत्ते अस्तित्वात आहेत. प्रत्यक्षात अनेक कवी आजही वृत्तबद्ध कविता लिहितात आणि तीही समर्थपणे लिहितात. नवीन वृत्ते जन्माला येत आहेत. तरुण कवी वृत्तांमध्ये कविता लिहित आहेत...

जोर्वे-नेवासे संस्कृती (Jorve-Newase Civilization)

महाराष्ट्रा तल्या आद्य मानवी वसाहतींची संस्कृवती 'जोर्वे-नेवासे' संस्कृेती म्हणून ओळखली जाते. ही दोन्ही गावे प्रवरा नदीच्या काठी आहेत. नेवाशाला जिथे उत्खनन झाले आहे ती जागा परतीच्या प्रवासात पाहावी असा विचार करून नकाशावर आधी जोर्वे गावाचा रस्ता शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात जोर्वेच्या आधी दायमाबाद अशी पाटी दिसली. दायमाबाद हा देखील त्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा पाडाव. मग आणखी पुढचे काहीच दिसेना. गाडी सरळ दायमाबादच्या दिशेने वळवली. दायमाबाद संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर...

ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...

वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...

कोल्हापूर-गगनबावड्याचे मोरजाई पठार !

मोरजाई परिसरातील भटकंती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा, पर्वतांचा, संस्कृतीचा, पाण्याचा, अरण्यांचा, स्थापत्यांचा अस्सल अनुभव ! तो अनुभव इतिहासातही जिवंत असण्याचा भाव निर्माण करू शकतो. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर आसळज गावापासून तीन-चार किलोमीटर डावीकडील बाजूस सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक ओढा आहे. मुख्य रस्ता सोडून थोडे आत... गर्द वनराई, निवळशंख पाणी आणि त्यासोबत काही हिनयान पंथीय छोटी, पण टुमदार लेणी असे ते विलक्षण नैसर्गिक पण माणसाचा यथायोग्य हस्तक्षेप झालेले ठिकाण आहे...

नवा मानुष वाद

एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...

प्रवास शब्दांचे आणि अर्थांचे

नंदिनी आत्मसिद्ध या बहुभाषाविद्वान आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर त्यांचा कन्नड, बांग्ला, उर्दू आणि फार्सी या भाषांचाही अभ्यास आहे. त्या ‘मोगरा फुलला’च्या वाचकांसाठी शब्दांच्या व्युत्पत्ती, त्यांचा प्रवास याविषयी लिहिणार आहेत. या मालिकेचे शीर्षक आहे ‘शहाणे शब्द’. त्यातील हा पहिला लेख...

श्रीरामवरदायिनी – श्री क्षेत्र पार्वतीपूर

श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) हे गाव प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. ते महाबळेश्वर-पार या रस्त्याने महाबळेश्वरपासून वीस मैलांवर लागते. ते महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. ते सातारा जिल्ह्यात येते. तो परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे, पण गावाला महात्म्य श्रीरामवरदायिनी देवीच्या सुंदर, पुरातन अशा मंदिराने लाभले आहे...