Home Search

छंद - search results

If you're not happy with the results, please do another search

मंगेश मुंबईकर घोगरे (Mangesh Mumbaikar Ghogre)

जगभरच्या देशांतून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा जारी केले जातात. त्यात EB-1A नावाची एक श्रेणी असते. त्याला ‘आइनस्टाईन व्हिसा’ म्हणतात. तो व्हिसा असामान्य क्षमता, कौशल्य असणाऱ्या गैर-अमेरिकनांना कायमस्वरूपी निवासासाठी दिला जातो. आइनस्टाईन व्हिसा मिळालेल्या मंगेश घोगरे यांच्याविषयी जाणून घेऊया...

उमटू दे एखादी स्मितरेषा ! (Let there be smile !)

माणसाला एकटा असताना, त्याच्या मनाला, मनापासून जे करायला आवडते तो त्याचा छंद. समाज माध्यमांचे अधिराज्य असलेल्या सध्याच्या काळात मनोरंजनाची समीकरणे बदलली आहेत. व्यक्तीला काय आवडायला पाहिजे याचा विचार करायला वाव न ठेवता, त्याच्यावर तथाकथित ‘मनोरंजन’ आदळले जाते. काळाच्या ओघात, आम जनता त्याच्या अधीन झालेली दिसते. या सध्याच्या ‘हलक्या फुलक्या’ मनोरंजनाबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे...

नाणेघाट (Naneghat)

सातवाहन हे इसवी सन पूर्व 222 ते इसवी सन 228 या काळातील महाराष्‍ट्रातले पहिले ज्ञात ऐतिहासिक राजघराणे. त्‍यापूर्वीचा महाराष्‍ट्राचा इतिहास फारसा उजेडात आलेला नाही. कल्याण-जुन्नर मार्गावरील नाणेघाटाच्‍या परिसरात सातवाहनांच्या राज्‍यांची प्रथम स्‍थापना झाली. नाणेघाट हा तेव्‍हा उत्‍तरेकडून कोकणात उतरण्‍याचा मुख्‍य मार्ग होता. जुन्‍नर हे सातवाहनांचे राजधानीचे शहर आणि व्‍यापारी केंद्र असल्‍यामुळे तेथे अनेक रोमन, ग्रीक व्‍यापाऱ्यांनी वस्‍ती केल्याचे पुरावे सापडतात...

वृत्तबद्ध कविता- स्थिती आणि गती (Poetry Writing in Metre – Present Scenario)

मराठी कवितेच्या सर्वसाधारण वाचकाची अशी समजूत असते की वृत्तबद्ध कविता ही काहीतरी भूतकाळातली गोष्ट आहे. कवितेला वृत्तामध्ये बांधण्यामुळे आशयाला धक्का लागतो किंवा अभिव्यक्तीवर बंधने येतात. वृत्ताविषयी अशीही समजूत असते की व्याकरणाच्या पुस्तकात असतात तेवढीच वृत्ते अस्तित्वात आहेत. प्रत्यक्षात अनेक कवी आजही वृत्तबद्ध कविता लिहितात आणि तीही समर्थपणे लिहितात. नवीन वृत्ते जन्माला येत आहेत. तरुण कवी वृत्तांमध्ये कविता लिहित आहेत...

ट्रेंडिंग काय? – लिव्ह इन रिलेशनशिप ! (Is Live In Relationship good alter active...

1
भारतात लग्नपद्धत अजून टिकून आहे, पण प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी पाहिले तर सत्य लक्षात येते. ते हे, की जोडप्यांमध्ये एकाची सहनशक्ती संपलेली आहे ! पती-पत्नींच्या नात्याचे नाविन्य टिकत नाही. लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज ही वैयक्तिक निवड आहे – प्रेम ही संकल्पना जुन्या काळापासून आहे. विवाहाचे रूपांतर प्रेमात आणि वैवाहिक संबंध म्हणजे दोन घरे एकत्र येणे हे लग्नात पूर्वी अपेक्षित असे. तरुणाईची मते बदलली आहेत- त्यांचा लग्नावर विश्वास राहिलेला नाही असे निरीक्षण आहे...

अठ्ठेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Eighth Marathi Literary Meet 1969)

वर्धा येथे 1969 साली झालेल्या अठ्ठेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कवी प्रा. पुरुषोत्तम शिवराम रेगे. ते नवकवितेत स्वतःचा वेगळा प्रवाह जपणारे तरल कवी, अल्पाक्षराच्या वाटेने जाणारे कादंबरीकार आणि समीक्षक-संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. रेगे यांनी ‘सुहृद चम्पा’ आणि ‘रूपकथ्थक’ या टोपणनावांनीही लिखाण केले आहे. रेगे हे मूलतः सर्जनशील कलावंत होते. त्यांनी त्यांच्या लेखनाला ‘बालमित्र’ नावाच्या हस्तलिखित मासिकातून सुरुवात केली...

नोरा रिचर्ड्स पंजाबी रंगभूमीची आयरिश आजी (Nora Richards – The Irish Mother of Punjab’s...

1
कबीर बेदीची आई फ्रेडा बेदी. फ्रेडावर दोन पुस्तके आहेत. ती जेव्हा कांगडा जिल्ह्यातील आंद्रेत्ता येथे राहण्यास गेली तेव्हा तिला नोरा रिचर्ड्स नावाच्या आयरिश अभिनेत्रीने मोकळी जमीन दिली. फ्रेडाने तिचे घर तेथे उभे केले. साहजिकच, उत्सुकता निर्माण झाली की ही नोरा कोण? ती हिंदुस्तानात का आणि केव्हा आली होती? आणि ती अभिनेत्री होती तर तिने कांगडासारख्या दूर, निसर्गरम्य जिल्ह्यात राहण्याचे का ठरवले ?

महादेवशास्त्री जोशी – संस्कारशील कथा

0
महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गोव्याच्या सत्तरी परगण्यामधील आंबेडे या गावी झाला. त्यांचे कथेच्या माध्यमातून मनुष्याच्या मनावर सद्भावनांचे संस्कार करणे हे उद्दिष्ट वाटे. त्यांचे जीवनविषयासंबंधीचे विचार, त्यांचे साहित्यिक कर्तृत्व व त्यांची आचरणशीलता यांमध्ये एकवाक्यता आढळते...

तीन पिढ्यांचे शिल्पकार (The teacher who shaped three generations)

चांगले शिक्षक आणि त्यांनी दिलेली शिकवण यांना मनातून कधी हद्दपार करता येत नाही. ते व्यक्तीच्या असण्याबरोबर, विचारांबरोबर असतातच. तीन पिढ्यांना शिकवणाऱ्या इनामदार सरांचे विद्यार्थी- आज तरुण ते वृद्ध वयातील त्यांच्या शिष्यांच्या मनात, घर करून आहेत. मंजूषा इनामदार-जाधव या त्यांच्या कन्या. त्यांच्या वडिलांना, वडील आणि गुरू या दोन भूमिकांमधून वावरताना त्यांच्या मनामध्ये उभे राहिलेले चित्र या लेखात आहे...

उपनयन- शैक्षणिक संस्कार

0
व्यक्तिविकासाचा विचार पाच प्रमुख पैलूंच्या संदर्भात केला जातो- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक. मुलांच्या घडणीच्या वयातील टप्प्याचे महत्त्व ओळखून प्राचीन अभ्यासकांनी उपनयन संस्काराची योजना केली असावी. मुले पूर्वी उपनयनानंतर गुरुच्या घरी ब्रह्मचारी म्हणून निवास करत आणि अभ्यास पूर्ण करून मग स्वत:च्या घरी परत येत असत. तो काळ ब्रह्मचारी म्हणून आयुष्य जगत असताना, अभ्यास करून स्वत:च्या भावी जीवनाची दिशा निश्चितपणे घडवण्याचा होय...