Home Search

चिपळूण - search results

If you're not happy with the results, please do another search

दाभोळचा इतिहास – मक्केचा दरवाजा !

दाभोळ हे दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. कोकणातील बंदरे सातवाहन काळात भरभराटीस आली. तेथून रोम, इजिप्त, अरेबिया, इराण या देशांशी व्यापार चालत असे. दाभोळचा तेराव्या शतकापर्यंतचा इतिहास चालुक्य, शिलाहार, यादव यांसारख्या हिंदू राजवटींचा इतिहास आहे...

भारतरत्न पां.वा. काणे (BharatRatna P.V. Kane)

भारतरत्न पांडुरंग वामन अर्थात पां.वा. काणे हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी एका मानवी आयुष्यात विविध तऱ्हांचे ज्ञानसंशोधनात्मक व संघटनात्मक अफाट कार्य केले. त्यांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी ‘भारतीय धर्मशास्त्राचा कोश’ आधुनिक काळात संकलित केला. तो पाच खंडांत व काही हजार पृष्ठांत आहे...

पालगड किल्ला – चोरवाटा व दुर्गम कड्याकपारी

दापोली व खेड यांच्या सीमेवर पालगड हा दुर्गम किल्ला आहे. तो पोर्तुगीज, डच, इंग्रज या परकीय सत्तांबरोबरच शिवशाही व पेशवाई या राजवटींतील स्थित्यंतराचाही साक्षीदार आहे. पालगड हा मुख्य किल्ल्यांना रसद, दारूगोळा, तोफखाना पुरवण्यासाठी; तसेच, टेहळणी करण्याकरता बांधला गेलेला छोटेखानी किल्ला आहे. त्यामुळे त्यावर लढाईच्या फारशा खाणाखुणा नाहीत...

ब्राह्मण कोण ?

0
इंग्रजांनी ब्राह्मण वर्ग कर्मकांडामध्ये रुळलेला, तात्त्विक विवेचन करणारा व केवळ बौद्धिक गोष्टी करणारा असतो, असा गैरसमज पसरवला. पण वास्तवात स्वतः अग्रेसरत्व करणारा असा माणूस ब्राह्मण म्हणून ओळखला जातो. तो सर्व क्षेत्रांमध्ये आहे. प्रत्यक्ष त्या त्या जीवनाच्या अंगाचे धुरीणत्व करणे, त्या क्षेत्राला दिशा देणे, प्रत्यक्ष ते आचरून इतरांना मार्गदर्शन करणे ही ब्राह्मण वर्गाची वैशिष्ट्ये होती...

रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर

न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...

केळशीच्या रमलखुणा

पूर्वीच्या काळी गाव, गावाकडची संस्कृती, गावची अर्थव्यवस्था कशी होती याचे प्रातिनिधिक रूप म्हणजे केळशी. गावाकडचे निसर्गसौंदर्य, तेथील लोकजीवन आणि त्यातील वेगळेपण हे सगळेच भूरळ घालणारे होते. आज गावे शहरीकरणामुळे सुधारली. पूर्वीच्या गावांबाबत अनभिज्ञ असलेल्या आजच्या पिढीला जुन्या गावची सैर केळशी या गावातून घडेल...

निबंधमालेतील भविष्यवेध !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ सुरू केली ती बहुश्रुतता व योग्य पुस्तकांची लोकांना माहिती देऊन मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने. त्यांनी ‘निबंधमाले’तून सकस, वैचारिक आणि दर्जेदार लेखांचे सलग आठ वर्षे लेखन करून 1881 पर्यंत विविध छापखान्यांतून चौऱ्याऐंशी अंक छापून प्रसिद्ध केले. विष्णुशास्त्री यांनी ‘निबंधमाले’तून मनोरंजन न करता लोकजागृती, विचारक्रांती आणि मराठी भाषेची अभिव्यक्ती याची कास धरली...

मराठी आणि बंगाली रंगभूमी : आरंभीचा इतिहास

भारतीय रंगभूमीचे अभ्यासक गिरीशचंद्र घोष यांना बंगाली रंगभूमीचे जनक म्हणतात. चेतनानंद यांच्यासारख्या रामकृष्ण मिशनमधील मोठ्या व्यक्तीने गिरीशचंद्र यांचे चरित्र लिहिले, ते कुतूहलाने वाचले आणि बंगाली रंगभूमीचा इतिहास डोळ्यांसमोर उलगडत गेला. बंगाली रंगभूमी आणि मराठी रंगभूमी यांच्या सामाजिक पार्श्वभूमीत काही साधर्म्य आढळली. स्त्रियांनी नाटकात काम करण्याला दोन्ही रंगभूमीवर तितकाच विरोध आणि उपहासात्मक टीका झाली...

स्वागत थोरात – अंधांच्या आयुष्यातील प्रकाश (Eye Opener Swagat Thorat)

स्वागत थोरात अंधांचे जगणे सुकर व्हावे, त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी द्यावी यासाठी जेथे गरज असेल, तेथे समुपदेशनासाठी जातात. अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करून त्यांच्याकडून प्रत्यक्ष सराव करून घेतात. स्वागत यांनी त्या अंध बांधवांच्या मनात शिरून त्यांची प्रतिभा, बुद्धीची क्षमता ओळखून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची तिरीप दाखवली आहे…

अंजनवेलचे निसर्गसौंदर्य (Anjanvel the Beautiful natural Konkan Town)

निसर्गसौंदर्याने नटलेले अंजनवेल गाव पर्यटकांना जास्त आकर्षित करते, ते गावातील गोपाळगड, दीपगृह व श्री टाळकेश्वर मंदिर या स्थळांमुळे ! गावाला लाभलेला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, मनाला भुरळ घालणारा समुद्र व आजुबाजूचा विलोभनीय परिसर शब्दातीत आहे…