सिन्नरचा उद्धार सहकारी औद्योगिक वसाहतीत!
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळी तालुका. सरकारने 1970 च्या दशकात महाराष्ट्रातील एकशेचोवीस तालुके अतिदुष्काळी म्हणून घोषित केले होते. त्यांपैकीच एक सिन्नर होता. तालुका भौगोलिक दृष्ट्या तिन्ही बाजूंनी उंचावर, घाटमाथ्यावर आहे. नद्या तालुक्यात व तालुक्याशेजारून घाटमाथ्याच्या खालच्या बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यामुळे त्या बारमाही वाहत असल्या तरी त्यांचे पाणी नैसर्गिकरीत्या तालुक्यात येणे अशक्यप्राय. तालुक्याच्या शेतीसाठी जलसिंचनाचा एकही प्रकल्प उभारणे अशक्य असल्याने शेतीचे उत्पन्न अत्यल्प असायचे. विडी कारखाने हे मजुरी मिळवण्याचे एकमेव साधन. सिन्नरची अशी परिस्थिती 1983 पूर्वी होती.