Home सांस्कृतिक नोंदी

सांस्कृतिक नोंदी

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची ‘निबंधमाला’(Vishnushastri Chiplunkar’s Nibandhamala)

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या ‘निबंधमाले’स महत्त्वाचे स्थान मराठी वाङ्मय व साहित्य यांच्या इतिहासात आणि एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विचारांच्या क्षेत्रात आहे. त्या ‘निबंधमाले’ने महाराष्ट्रातील विचारांना नवी दिशा व वळण दिले. ‘निबंधमाला’ नावाचे नियतकालिक होते. नियतकालिकांचा उदय ही त्या काळातील क्रांतिकारक घटना होय...

वसईच्या ख्रिस्ती समाजातील नावे/आडनावे (Christian Names and Surnames in Vasai)

वसईतील ख्रिस्ती समाज हा पोर्तुगीज राजवटीत धर्मांतरीत झाला. त्यांची नावे आणि आडनावे पोर्तुगीज धाटणीची. तेव्हाच्या धार्मिक पुरोहितांनी ती बाप्तिस्मा संस्कार करताना (नामविधी सोहळा) दिली.

फलटणचा संस्कृतिशोध !

0
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...

बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील कागदपत्रांचा संग्रह (Ambedkar’s handwritten diaries and other material preserved in...

बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहातील दुर्मीळ कागदपत्रे रासायनिक प्रक्रियेने सुरक्षित करून जतन करण्याची योजना सिद्धार्थ महाविद्यालयाने हाती घेतली आहे. त्यामध्ये बाबासाहेबांच्या टिपाटिप्पणी, नोंदी, प्रदीर्घ लेखन अशा विविध गोष्टींचा समावेश आहे; बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील या टिपणी कशा कशाच्या असाव्यात ! ‘रिपब्लिक’ शब्दाच्या अर्थच्छेदापासून व्हायोलिन वाद्याची स्वरलिपी... एवढेच काय, पत्नीच्या बाळंतपणानिमित्ताने केलेल्या ‘मॅटर्निटी नोट्स’ असे विविध तऱ्हेचे साहित्य त्यात आहे. सिद्धार्थ कॉलेजला हे शक्य झाले ते श्रीपाद हळबे या अर्थ व विधी क्षेत्रातील व्यावसायिकाने दिलेल्या देणगीमुळे...

कालिदासाचा यक्ष आणि यक्षांच्या अष्टसिद्धी (Kalidas’s Yaksha and Yaksha’s achievements)

अमरकोशानुसार, दहा देवयोनी आहेत- विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर, पिशाच्च, गुह्यक, सिद्ध आणि भूत. त्यांपैकी ‘यक्ष’ हा ‘मेघदूता’चा कथानायक होय. सर्वसाधारणपणे, यक्ष हा देखणा, ऐश्वर्यसंपन्न, सुखात आकंठ बुडालेला, पत्नीवर अत्यंत प्रेम असलेला आणि माणसांच्या दृष्टीने अतीन्द्रिय शक्ती ज्याच्यापाशी आहेत असा मानला जातो. सर्व यक्ष हे कुबेराचे सेवक. कुबेर हा त्यांचा स्वामी. यक्षांवर जबाबदारी कुबेराच्या उद्यानांचे आणि कोशाचे रक्षण करण्याची असे. कालिदासाच्या ‘मेघदुता’तील कथानायक यक्षाने त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या कामात कुचराई केली आणि त्याला कुबेराच्या क्रोधाला सामोरे जावे लागले...
_Dhammakathi_carasole

धर्मांतर सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेल्या धम्मकाठीची रंजक कहाणी

नागपूरकरांनी नागपुरातील दीक्षाभूमी व 14 ऑक्टोबर 1956 रोजी पार पडलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या काही स्मृती जपून ठेवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्या सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेली धम्मकाठी. ती कर्नलबागेतील मेंढे कुटुंबीयांकडे सुखरूप आहे. ती लोकांच्या दर्शनासाठी कर्नलबागेतील आंबेडकर वाचनालयात धम्मचक्र प्रवर्तन दिन, आंबेडकर जयंती वा अन्य तशा प्रसंगी ठेवली जाते...

अश्वारूढ गणेशांची साखरपा-कोंडगावची शतकोत्तर परंपरा (Ganapati tradition in Sakharpa One Hundred year old)

0
कोंडगाव-साखरपा गावातील अश्वारूढ गणेश मूर्तींची परंपरा प्रसिद्ध आहे. परंपरेला शतकभरापेक्षा जास्त इतिहास आहे. त्या परिसरात अभ्यंकर, केतकर, केळकर, जोगळेकर, सरदेशपांडे, पोंक्षे, रेमणे, नवाथे ही घराणी पूर्वापार वास्तव्य करून आहेत...

सांगली जिल्ह्यातील कलावंतीणीचे कोडे ! (The mystery design in Sangli district)

कोड्याबद्दल वेगवेगळ्या आख्यायिका ऐकण्यास मिळतात. मणेराजुरीत कलावंतीण राहण्यास आली. तिने तिची कला सादर करताना, तिच्या बुद्धीच्या जोरावर अनेक मातब्बरांना, राजे-रजवाड्यांना पराभूत केले. तिने तिच्या बुद्धिसामर्थ्याने माळरानावर लहानमोठ्या दगडगोट्यांचे कोडे मांडले.

निसर्गदत्त महाराज – आधुनिक उपनिषदकार

‘I AM THAT’ हा ग्रंथ जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसिद्धी पावला आहे. ग्रंथाचे भाषांतर त्या त्या देशातील भाषेतही झाले आहे. त्याची भाषांतरे विविध भारतीय भाषांमध्ये झाली आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील विद्वद्जनांनी त्या ग्रंथाला आधुनिक उपनिषद म्हणून गौरवले आहे. त्या ग्रंथामुळे जगातील कानाकोपऱ्यातून शेकडो अभ्यासू, पंडित, संशोधक यांची जणू रीघ भारतात आधुनिक काळात लागली ! या ग्रंथाचे कर्ते निसर्गदत्त महाराज या नावाने ओळखले जातात...

वंदे मातरम् – हैदराबाद मुक्ती संग्रामातील पहिली ठिणगी

1
‘वंदे मातरम’ या गीताला भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1876 मध्ये लिहिलेल्या ‘आनंद मठ’ या कादंबरीतील आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम देशापुढे आणले. त्या गीताला प्रसिद्ध संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केले आणि ते गीत अजरामर ठरले ! ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वाराणसी येथे 1905 साली स्वीकारले गेले...