Home मराठी भाषा विस्मरणात गेलेली पुस्तके

विस्मरणात गेलेली पुस्तके

ना. धों. ताम्हनकर यांचे नाटक – उसना नवरा (Usana Navara – Na Dho Tamhankar’s...

1
‘गोट्या’ या मुलांसाठीच्या लोकप्रिय कथामालिकेचे लेखक ना.धों. ताम्हनकर हे बालवाङ्मय लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी ‘गोट्या’व्यतिरिक्त लिहिलेले बालवाङ्मय... चिंगी, दाजी, खडकावरील अंकुर, अंकुश, बहीणभाऊ, नीलांगी, अविक्षित, मणी, रत्नाकर, नारो महादेव अशी भलीमोठी यादी आहे.

एव्हीलीन कोब्बोल्ड – स्वेच्छेने केलेले इस्लाम धर्मांतर

0
धर्मांतर म्हटले, की हिंदुस्तानातील वाचकांच्या मनात प्रथम नापसंतीची लहर उमटते. त्याचे कारण म्हणजे धर्मांतर हे पोर्तुगीजांनी गोव्यात घडवलेले माहीत असते किंवा मुस्लिम धर्मात जबरदस्तीने झालेल्या धर्मांतराच्या गोष्टी माहीत असतात. मात्र ख्रिस्ती धर्मातून इस्लामचा स्वीकार करून मुस्लिम झालेले पुरुष आणि स्त्रियाही अनेक होत्या आणि ते सारेजण ब्रिटिशांची सत्ता सर्व जगात पसरलेली असताना, धर्मांतर करून मुस्लिम झाले होते ! तशाच एका धर्मांतरित महिलेची आणि तिच्या लेखनाची ही ओळख...

धर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)

1
‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ हा गेल्या शतकात भारतात निर्माण झालेला पंच खंडात्मक महान ग्रंथ आहे. तो महामहोपाध्याय पा.वा. काणे यांनी सिद्ध केला. त्या ग्रंथाचा आधार जगभरातील विद्वान भारतीय धर्म, नीती व तदनुषंगिक विषयांवरील अधिकृत प्रमाणग्रंथ म्हणून घेत असतात. भारतीय संसदेनेही धार्मिक, सामाजिक, नागरी कायदे बनवताना मार्गदर्शक म्हणून त्याचा आधार वेळोवेळी घेतला आहे...

अठराव्या शतकातील सुंता विधी! (Sunta Ritual Eighteenth Century)

1
अल्तापहुसेन रमजान नबाब यांचा सुंता विधीबाबतचा लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर वाचून एक किस्सा लिहावासा वाटला. हिंदुस्थानी माणसाने इंग्रजीत लिहिलेले पहिले पुस्तक आयर्लंडमध्ये अठराव्या शतकाअखेरीस प्रकाशित झाले (1794). साके दीन महोमेत या भारतीय माणसाने ते पुस्तक लिहिले होते. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत कॅम्प फॉलोअर या हुद्यावर काम करत होता. ते पुस्तक पत्ररूपात आहे.

आपण इतिहास जपतो का? (Do Indians understand value of the history)

0
मला माझ्या प्रवासवर्णने वाचण्याच्या आवडीमुळे काही शोध लागले. जसे, की -मराठीतील पहिले प्रवासलेखन गोडसे गुरुजींचे ‘माझा प्रवास’ हे नाही; -राघोबादादा यांनी त्यांच्या हणमंतराव नावाच्या कारभाऱ्यांना इंग्रजांची मदत मिळते का ते पाहण्यासाठी इंग्लंडला 1761 मध्ये पाठवले होते. इतर देशांतील प्रवासी हिंदुस्थानात त्याआधी काही शतकांपासून येत होते. त्यांनी ते सिद्ध करणारी प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत...

टांकांच्या फेकी (व्यंगचित्रे)- स्वतंत्र विचारांचा अंकुश (Takanchya feki- Book of old cartoons makes one...

0
वृत्तपत्रांतील टिकाटिप्पणीचा अग्रलेखांइतकाच महत्त्वाचा विभाग म्हणजे व्यंगचित्रांचा. अनेक वाचक तर अग्रलेख वाचत नाहीत, पण ते ‘आम्ही व्यंगचित्र बघतो’ असे सांगतात. व्यंगचित्रांची वर्तमानपत्रांतील परंपरा किती जुनी आहे असे कुतूहल जागे झाले ते ‘टांकाच्या फेकी’ या व्यंगचित्रांच्या पुस्तकामुळे.

मार्सेलिसची मासीया – रशियन तरुणीचे भारतप्रेम (Massia Bibikoff’s book on an Indian in first...

0
मार्सेलिस हे फ्रान्सच्या किनाऱ्यावरील बंदर म्हणजे सावरकरभक्तांचे तीर्थस्थान आहे. सावरकर यांनी 1910 साली त्याच ठिकाणी समुद्रात उडी घेतली आणि ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न केला. त्या मार्सेलिसमध्ये, सावरकर यांच्या उडीनंतर चारेक वर्षांनी रशियन रेखाटनकार आणि भारतीय संस्थानिक यांच्या मैत्रीची कथा आश्चर्यजनक अशी जन्मली व फुलली. ती कथा शब्दांत तर मांडली गेलीच, पण त्याहीपेक्षा ती चित्रांतून- रेखाचित्रांतून व्यक्त झाली. ते स्वाभाविकपणे घडून आले...

नूरजहान – महत्त्वाकांक्षी आणि लावण्यवती (Noorjahan – As Marathi writers saw her over hundred...

0
मोगल साम्राज्यातील जहांगीर आणि नूरजहान यांची माहिती त्या नावांपलीकडे इतिहासात फारशी नसते, पण नूरजहानचे चित्र मात्र क्रमिक पुस्तकात हमखास असायचे. नूरजहान म्हणजे अनारकली आणि ‘मोगल- ए- आझम’ या चित्रपटाची नायिका हा समज सार्वत्रिक म्हणता येईल एवढा मोठ्या प्रमाणावर दिसतो.

ताम्हनकर यांचा खेळगडी – गोट्या (Tamhankar’s literary character Gotya becomes popular TV serial)

'गोट्या' नावाची मालिका मुंबई दूरदर्शनवर सुमारे तीस वर्षांपूर्वी गाजून गेली. ती मालिका पाहताना त्या काळातील लहान मुलेच नव्हे तर मोठी माणसेही एका वेगळ्याच विश्वात दंग होऊन जात !

रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र

हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...