जॉन स्मिथ की वॉल्टर स्पिंक? (John Smith or Walter Spink)

भवताल व अभ्युदय या दोन संस्थांनी अजिंठा येथे शिबिरे आयोजित केली होती. शिबीर चालू असताना, शिबिरात सांगत असलेल्या संकल्पनांमुळे एक लहान शिबिरार्थी भांबावून गेला. त्याला बाहेर आलेला पाहून शिबीर संयोजक शुभा खांडेकर यांनी त्याला काही प्रश्न विचारले. त्यावर सृजन शाहू पाटोळे या विद्यार्थ्याने गंमतीशीर उत्तर दिले...

पां.वा. काणे यांच्या नावे टपाल तिकिट

मकरंद करंदीकर हे टपाल तिकिटे व अन्य संबंधित कागदपत्रे यांचे संग्राहक पंचावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना एक प्रश्न सतत टोचत असे. इतर भारतरत्नांवर टपाल तिकिटे अनेकदा प्रसिद्ध करणाऱ्या भारतीय टपाल खात्याने, डॉ.पां.वा. काणे यांच्यावर टपाल तिकिट एकदासुद्धा न काढण्याचे कारण काय ?...

राष्ट्रपतीपदाचे कलंदर उमेदवार कर्तारसिंग

1
काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली, की वर्तमानपत्रांत कर्तारसिंग यांचे नाव गाजत असे. कारण राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या निवडणुकीपासून पुढील अनेक निवडणुकांपर्यंत इच्छुक उमेदवारांत कर्तारसिंग थत्ते आघाडीवर असत. त्यांचे नाव कर्तारसिंग असे असले तरी ते होते महाराष्ट्रीयन... मराठी व्यक्ती... लक्ष्मण गणेश थत्ते !

जवाहरलाल नेहरू आणि सोलापूरचा मि. वेडी

जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवे’ अशी मागणी करणारा ठराव मांडला, तो लाहोर काँग्रेसमध्ये एकमताने मंजूर झाला. तेव्हा एकीकडे सविनय कायदेभंगाच्या च‌ळवळीने उग्ररूप धारण केले, तर दुसरीकडे जवाहरलाल यांना अटक झाली. जवाहरलाल कैदेत सापडल्याने देशभरातील तरुण वर्ग प्रक्षुब्ध झाला. त्यातूनच सोलापूरच्या हाजूभाई चौकात कलेक्टरला खुनाची धमकी देणारे पत्र चिकटवलेले सापडले. त्या पत्राखाली पत्रलेखक म्हणून ‘मि. वेडी’ अशी सही होती…

कोकणातील जलव्यवस्था

कोकणामध्ये कणकवली येथे भरलेल्या सिंचन विकास परिषदेतून गावाच्या परिसरात पूर्वी पाण्याच्या काय व्यवस्था असत ते स्पष्ट झाले. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार पाणवठे होते. काही ठिकाणी बोगदे काढून पलीकडच्या घळीमधील पाणी वळवले गेले होते. त्या सर्व पाण्याच्या व्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. पण त्यांच्या अवशेषांमधून एकंदर भारताच्या विविध भागांत समाजजीवनाची पाण्याच्या संदर्भातील व्यवस्था कशी होती याचे संकेत मिळतात...

दुर्गादेवीचा दुष्काळ ( Ill famous famine of Durgadevi in thirteenth century)

1
बाराव्या आणि तेराव्या शतकांच्या काठावर तेरा वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. त्या दुष्काळात लाखा वंजारींमधील दुर्गादेवी या कर्तबगार महिलेने त्या काळच्या बिहार या गंगेच्या काठच्या प्रदेशातून धान्य आणून महाराष्ट्रातील समाज तेरा वर्षे अखंड वाहतूक करून जगवला! ती लाखा बैलांची वाहतूक इकडून तिकडे उत्तरेत नेऊन करत असे. महाराष्ट्रात तिचा सर्वत्र उल्लेख त्या काळापासून ‘दुर्गादेवी’ असा होऊ लागला. त्या काळाच्या इतिहासात तो ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ असे म्हटले जाऊ लागले...

रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर

न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...

जीवनशैलीतील दूरदृष्टी

0
“भाषांतर म्हणजे जे आपल्या भाषेत नसतं, समाजात नसतं ते दुसरीकडून आणणं. तरच आपण त्यांच्यासारखे होतो,” भाषांतराविषयीचे असे चिंतन भवरलाल जैन यांनी साहित्य अकादमीच्या जैन हिल्स येथील भाषांतर कार्यशाळेत मांडले. भवरलाल एक कष्टाळू, निष्ठावंत शेतकरी, पण त्यांनी साहित्य व सामाजिक क्षेत्रात केलेले काम अजोड आहे...

दादा कोंडके आणि सेन्सॉरची कैची

दादा कोंडकेंच्या सिनेमांवर द्वयर्थी संवाद आणि गीते यांमुळे सेन्सॉरची कैची चालायची. त्यावर दादा अफलातून युक्तिवाद करून एकेक कट रद्द करून घेण्यासाठी तुफान आवेशाने लढायचे. दादांच्या युक्तिवादापुढे तत्कालीन सेन्सॉरवालेही नि:शब्द होत...

सुधीर गाडगीळ यांची पुंजी!

काळ सरतो, माणसे अंतरतात. पण, त्यांच्या आठवणी मात्र अजरामर राहतात. दादा कोंडके यांच्यासारख्या कसलेल्या, हजरजबाबी कलाकाराने घेतलेली फिरकी, केलेल्या कोट्या आयुष्यभराची पुंजी होऊन जातात.