कला

महाराष्‍ट्रातील कलात्‍मक प्रतिभा, त्‍याचा इतिहास आणि वर्तमान!

तोरू दत्त – पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार (Toru Dutt – First Indian Novelist in...

तोरू दत्त ही पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार. तिचे काव्यही युरोपात अठराव्या शतकात गाजले. तिने फ्रेंच भाषेतही लेखन केले. तिचे एकूण दत्त कुटुंब हेच लोकविलक्षण होते. त्यांनी विल्यम कॅरे या इंग्रजी धर्मप्रसारकास आश्रय दिला; स्वत: ख्रिश्चन धर्म स्वीकारला, इंग्लंडला स्वत:ची मातृभूमी मानले आणि प्रेम मात्र हिंदुस्थानवर केले व हिंदुस्थानी जनतेची काळजी वाहिली...

स्मिता पाटील – मूड आणि स्विंग्स !

स्मिता पाटील हिला केवळ एकतीस वर्षांचे आयुष्य लाभले होते; त्यात तिची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जेमतेम अकरा वर्षांची. परंतु त्या काळात तिने निर्माण केलेले अभिनयविश्व व त्यापलीकडे जाऊन तयार केलेले माणसांचे भावबंध विलक्षण आहेत. तिचे व्यक्तिमत्त्व तिच्या भावविश्वात आलेल्या व्यक्तींच्या अंतरंगात मिसळून जात असे, त्या व्यक्तीच्याही नकळत...

वृत्त माध्यमाचा रुतबा ! – ऑन द फील्ड

प्रगती बाणखेले यांचे ‘ऑन द फील्ड’ हे पुस्तक ‘वास्तवाच्या जमिनीवर ठाम उभे आहे आणि ते मनात खोलवर उतरत जाते. वाचक पुस्तकाच्या सोबतीने वाहत राहणे ही अपरिहार्यता सहजपणे स्वीकारतो. ऑन द फील्ड’ या पुस्तकाने मोठा अवकाश व्यापला आहे, इतका की एकेका प्रकरणाचे स्वतंत्र पुस्तक व्हावे...

वऱ्हाडातील वास्तूंची बुरूजसाद

वऱ्हाड प्रांतातील पुरातत्त्वीय स्थानांचा परिचय विवेक चांदूरकर या युवा संशोधकाने ‘उद्ध्वस्त वास्तू - समृद्ध इतिहास’ या पुस्तकात करून दिला आहे. या पुस्तकातील प्रत्येक नोंद ही ऐतिहासिक दस्तावेज ठरावा इतके मूल्य असलेली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे...

उमर खय्यामची फिर्याद

‘उमर खय्यामची फिर्याद’ हे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर ऊर्फ ‘श्रीकेक्षी’ यांचे गाजलेले पुस्तक. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेख महाराष्ट्राबाहेरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ यासंबंधित आहेत. पुस्तकात एकूण बारा लेख असून सर्व लेख दीर्घ आहेत. ते लेख एवढे सखोल चिंतन करून लिहिले आहेत, की टीकात्मक लेखन कसे करावे याचा वस्तुपाठच ते पुस्तक वाचकांना देते…

आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी

योगीराज बागूल यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी ‘डॉ.बाबासाहेब विचार मंचा’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारांचे एकवीस जिवंत वारस शोधून काढून त्यांचा मुंबईत भव्य सत्कार घडवून आणला ! त्यावेळी तेथे जमलेल्या त्या सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेची भावना ही योगीराज यांच्या त्या अथक परिश्रमांची पावती होती...

बाळकोबा नाटेकर – शाकुंतलातील कण्व (Veteran Stage Actor Balkoba Natekar)

0
अण्णासाहेब किर्लोस्कर यांना लाभलेले एक ज्येष्ठ गायक नट म्हणजे बाळकोबा नाटेकर. ते पदांना सानुकूल चाली लावण्यासाठी प्रसिद्ध होते. साक्या-दिंड्यांना वेगवेगळ्या चाली लावण्याचा पहिला मान बाळकोबा यांचा होता. तल्लख स्मरणशक्ती आणि विलक्षण ग्रहणशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये होती…

चाळिसावे साहित्य संमेलन (Fortyth Marathi Literary Meet 1958)

कवी अनिल यांना मुक्तछंदाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांनी ‘दशपदी’ या नव्या काव्यप्रकाराचा आविष्कार केला. साधी, सरळ, भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे त्यांच्या कवितेचे वेगळेपण. मात्र, त्यांची कारकीर्द विविधतापूर्ण आहे…

एकोणचाळिसावे साहित्य संमेलन (Thirty Nineth Marathi Literary Meet 1957)

आधुनिक मराठी कवी व चतुरस्त्र लेखक अशी अनंत काणेकर यांची ओळख आहे. विषयाची ओटोपशीर, आकर्षक, ठसठशीत मांडणी व परखड विचारसरणी हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य. काणेकर यांचे व्यक्तिमत्त्व लौकिक जीवनाशी समन्वय साधणारे होते. ते ‘चांदरात’ या संग्रहामुळे मराठी काव्याच्या इतिहासात अजरामर झाले…

छत्तीसावे साहित्य संमेलन (Thirty Sixth Marathi Literary Meet-1953)

वि.द. घाटे यांचे पुष्कळसे लेखन स्वान्त सुखाय झालेले आहे. त्यांच्या लेखनात त्यांचे उत्कट, पण दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ आणि अभिजात रसिकता यांचा मिलाफ झालेला दिसतो. घाटे यांच्या सुटसुटीत, रसपूर्ण आणि लयदार लेखनशैलीच्या साहित्याने स्वतःचा वेगळा ठसा मराठी साहित्यात उमटवला…