Home Authors Posts by सुरेश लोटलीकर- वामन देशपांडे

सुरेश लोटलीकर- वामन देशपांडे

40 POSTS 0 COMMENTS
सुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम ‘कॅरिकेचरिस्ट’ ही आहेत. वामन देशपांडे हे ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची 109 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

अकरावे साहित्य संमेलन(Marathi Literary Meet 1921)

अकरावे साहित्य संमेलन 1921 साली बडोदे येथे भरले होते. त्याचे अध्यक्ष साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण ऊर्फ तात्यासाहेब केळकर हे होते. दहाव्या संमेलनानंतर चार वर्षांनी.

दहावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1917)

इंदूर येथे भरलेल्या दहाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश जनार्दन आगाशे हे व्युत्पन्न पंडित होते. त्यांचे प्रभुत्व मराठी, इंग्रजी आणि संस्कृत ह्या तिन्ही भाषांवर होते. त्यांनी त्या तिन्ही भाषांमध्ये कविता लिहिल्या होत्या...

नववे साहित्य संमेलन (Marathi Literature Meet 1915)

नववे साहित्य संमेलन 1915 साली मुंबई येथे मिरज संस्थानचे संस्थानिक श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. गंगाधरराव पटवर्धन हे तसे पाहिले तर साहित्यिक नव्हते.

आठवे साहित्य संमेलन (Marathi Literature Meet – 1912)

आठवे साहित्य संमेलन बडोदे येथील सातव्या संमेलनानंतर (1909) तीन वर्षांनी, 1912 साली विदर्भातील अकोला येथे श्रीराम नाटकगृहात भरले होते. कादंबरीकार आणि गुजगोष्टीकार हरी नारायण आपटे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

सातवे साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर पोचले! (Seventh Marathi Literary Meet – 1909)

पहिली सहा मराठी साहित्य संमेलने पुण्यात भरली होती. तिसरे साहित्य संमेलन मात्र साताऱ्यात 1905 साली झाले, तो अपवाद होता. सातवे साहित्य संमेलन प्रथमच महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आले!
sahitya_sanmelan

सहावे साहित्य संमेलन – 1908

पुणे येथेच पुन्हा 1908 साली भरलेल्या सहाव्या साहित्य संमेलनाला मात्र, ग्रंथकार संमेलन याऐवजी लेखकांचे संमेलन म्हणून संबोधण्यात आले. पहिल्या पाच साहित्य संमेलनांना ग्रंथकारांचे संमेलन...
chauthe_sahitya_sanmelan

चौथे साहित्य संमेलन – 1906

न्यायमूर्ती गोविंद वासुदेव कानिटकर हे चौथ्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते. ते संमेलन पुणे येथेच 1906 साली भरले. गोविंद वासुदेव कानिटकर यांचा नावलौकिक साहित्य, संगीत आणि विद्या या तिन्ही क्षेत्रांत होता. ते चित्रकलेचे चाहते होते. त्यांचा अभ्यास वेदांताचा व इंग्रजी वाङ्मयाचा होता. ते साक्षेपी विद्वान म्हणून ख्यातकीर्त होते...
_raghunatha_karandikar

तिसरे साहित्य संमेलन -1905

तिसरे साहित्य संमेलन सातारा येथे रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ते दुसऱ्या संमेलनानंतर तब्बल वीस वर्षांनी भरले होते. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या नावावर ग्रंथकार म्हणावे अशी ग्रंथसंपदा नव्हती. त्यांची फार मोठी साहित्यसेवाही नव्हती, तरीही ते तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले...
_krushnaji_rajwade

दुसरे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1885)

दुसरे ग्रंथकार संमेलन 1885 साली, म्हणजे पहिल्या ग्रंथकार संमेलनानंतर सात वर्षांनी भरले. मधील सहा वर्षें काहीही घडले नाही! दुसरे संमेलनही पुण्यात सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात भरले. ते पुण्यात 28 मे 1885 रोजी भरले. त्या संमेलनास अडीचशेच्यावर ग्रंथकार उपस्थित होते. त्या संमेलनासाठी पुन्हा पुढाकार घेतला तो महादेव गोविंद रानडे यांनीच...
_ranade

पहिले साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1878)

अखिल भारतीय साहित्य संमेलन हा साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांचा, साहित्यिकांचा आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा असतो. त्यानिमित्ताने लेखक, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते एकत्र येतात आणि व्याख्याने, परिसंवाद, कवीसंमेलन यांनी ते साहित्य संमेलन तीन दिवस विविध अंगांनी फुलत जाते...