Home Authors Posts by विद्यालंकार घारपुरे

विद्यालंकार घारपुरे

19 POSTS 0 COMMENTS
विद्यालंकार घारपुरे यांचा जन्म 26 सप्टेंबर 1960 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बी. कॉम. झाले आहे. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून उपप्रबंधक (डेप्युटी मॅनेजर) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती 2007 साली घेतली. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे सक्रिय कार्यकर्ता म्हणून 1986 ते 1997 या काळात काम करत होते. त्यांना बालसाहित्यात विशेष रुची आहे. त्यांचे 'बबडूच्या गोष्टी' 'वनशाहीच्या कथा' व 'बेटू आणि इतर कथा' हे बालकथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसेच 'छोटा डॉन' आणि 'लिंबू तिंबू' हे बालकविता संग्रह आणि 'बदल' ही बालकादंबरीही प्रकाशित झाली आहे. त्यांना 'चालनाकार अरविंद राऊत पुरस्कार' 2015 सालासाठी मिळाला आहे. सध्या त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ हा लेखन व सामाजिक कामासाठी दिलेला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9420850360

नास्तिक आहे… म्हणूनच मस्त जगतो !

ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल स्पष्ट भूमिका घेणारे लोक जगात फार थोडे असतात; परंतु देव आहे की नाही याबाबत विचार करणारे लोक भरपूर असतात. किंबहुना, अगदीच भाविकभाबडे लोक वगळले तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी ‘देव मदतीला येईल का ? पण देव असेल तरच ना !’ असा प्रश्न उद्भवत असतो. त्याचे प्रमुख कारण माणसाची दुर्बलता व म्हणून हतबलता हेच असते. तथापि काही कणखर माणसे कोणत्याही संकटप्रसंगी मनाचा निर्धार कायम ठेवून केवळ बुद्धीने विचार करून निर्णय घेतात. अशाच बुद्धिनिष्ठ, तार्किक विचार करण्याची शक्ती कमावलेल्या लेखकाने तो नास्तिक कसा बनत गेला याची कहाणी येथे सांगितली आहे...

देगावच्या विवेकवादी समाजसेविका: स्मिता जोशी

स्मिता जोशी या सर्वसामान्य शिक्षिकेने तळागाळातील वंचित आदिवासी समाजासाठी अठ्ठावीस वर्षे सातत्याने काम केले, ही त्यांची ओळख. त्यांनी 15 ऑगस्ट 1981 रोजी कर्जतजवळील कोंदिवडे या गावी ‘बांधिलकी’ ही सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यांनी ‘बांधिलकी’चे काम स्त्रीला शिक्षित करणे, तिचे वैचारिक प्रबोधन करणे व तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या त्रिसूत्रीवर उभे केले, स्थिर केले व फुलवले...

आसोंडमाळावरील उद्योजक – ज्योती रेडीज (Jyoti Redis-Lady with industry in moorlands of Dapoli)

ज्योती रेडीज या सर्वसामान्य स्त्रीने आसोंडमाळावर बागायती व इतर उद्योगव्यवसाय यांचे नंदनवन उभे केले, त्याची ही कहाणी. आसोंड हे गाव दापोली तालुक्यातील दाभीळ या गावापासून अठरा किलोमीटर दूर आहे...

जाणता राजा अशोक (King Ashoka The Emperor)

भारतातील मौर्य साम्राज्यातील काही कर्तबगार राजांपैकी अशोकाची राजवट प्रदीर्घ व अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पण अशोक इतिहासात खूप काळ दुर्लक्षित राहून विस्मृतीत फेकला गेला होता. आधुनिक इतिहासकारांचेत्याच्याकडे लक्ष गेले.

कल्हणाची राजतरंगिणी – कवितेची लज्जत

कल्हणाच्या राजतरंगिणी या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे, की तो इतिहासग्रंथ आहेच, पण त्यातील काव्याचा आस्वाद घेता येतो! ग्रंथात काव्य दोन प्रकारे विकसित होते –...

कल्हणाची राजतरंगिणी – लेखनाचा इतिहास!

कल्हणाचा ‘राजतरंगिणी’ हा भारतात उपलब्ध झालेला, इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा सर्वात जुना एकमेव ग्रंथ आहे. तो ग्रंथ सुमारे साडेआठशे वर्षांपूर्वी खंडकाव्याच्या स्वरूपात संस्कृत...

राजतरंगिणी – काश्मीरच्या इतिहासाचा लेखाजोखा

अरूणा ढेरे व प्रशांत तळणीकर यांनी ‘कल्हण पंडित यांच्या ‘राजतरंगिणी’ या नावाच्या मूळ संस्कृत भाषेतील ग्रंथाचा मराठीत केलेला अनुवाद सरहद (संजय नहार), खडके फाऊंडेशन...

अस्तित्वाच्या प्रश्नांना विज्ञानाची उत्तरे

कराडच्या सुलभा ब्रह्मनाळकर या एक विज्ञानवादी लेखक आहेत. मी सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘गोफ जन्मांतरीचे’हे पुस्तक वाचून खूपच प्रभावित झालो. विज्ञान विषय इतका सोपा करून...

दापोली तालुक्याचा त्रिकोण व त्याची महत्ता (Dapoli Tehsil)

दापोली परिसरात भेट द्यावी अशी पालगड, मुरुड, वणंद व जालगाव ही चार गावे आहेत. दापोली हे गाव ब्रिटिशांनी त्यांच्या कारभाराच्या सोयीसाठी वसवले. दापोली गावाचा...

दापोली तालुक्यातील बुद्धिवैभव!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (23 जुलै 1856 – 1 ऑगस्ट 1920) - टिळकांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील ‘चिखलगाव’. टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे...