Home Search
कथासंग्रह - search results
If you're not happy with the results, please do another search
नि:शब्द लघुकथासंग्रह – दिव्यांगांच्या व्यथा-वेदना
'नि:शब्द...' हा पल्लवी परुळेकर-बनसोडे यांचा छोट्या-छोट्या प्रसंगांचा काव्यात्म लघुकथासंग्रह. त्यांनी त्या संग्रहात त्यांच्या डोळ्यांसमोर आलेल्या आणि मनाला चटका लावून गेलेल्या अपंगांविषयी लिहिले आहे, त्याला...
बावन्नावे मराठी साहित्य संमेलन (Fifty Second Marathi Literary Meet 1977)
पुणे येथे 1977 साली झालेल्या बावन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते पुरुषोत्तम भास्कर भावे. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1910 रोजी धुळे येथे झाला. भावे हे मराठी नवकथेचे एक जनक मानले जातात. त्यांच्या नावावर सतरा कादंबऱ्या, सव्वीस कथासंग्रह, बारा लेखसंग्रह, आठ नाटके असे साहित्य आहे. त्यांनी इतर साहित्यिक कृतीही लिहिल्या व त्या एकूण साहित्यातून मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भावे यांना संपन्न घराण्यात जन्मास येऊनही जीवनातील खडतर अनुभव घ्यावे लागले. भावे यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले...
कवी द.रा. बेंद्रे : मातृभावातील दिव्यत्व (Strength of Motherhood : Marathi-Kannad bilingual Poet D...
दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांची मातृभाषा मराठी, पण त्यांनी ‘ज्ञानपीठ’ हा साहित्यातील अत्युच्य सन्मान कन्नड भाषेत लेखन करून मिळवला ! ते कवी होते. द.रा. बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार मिळून पन्नास वर्षे पूर्ण झाली. बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या वेळी जे प्रशस्तिपत्र देण्यात आले त्यात लिहिले आहे, की “पुरस्कारपात्र ‘नाकुतन्ती’ या कन्नड काव्यसंग्रहातून वर्तमानाचे उपहासात्मक रूप, सांस्कृतिक भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा सशक्त प्रतीकांद्वारे निष्कर्ष; तसेच, स्थायी व समग्रात्मक मूल्यांचे समर्थन प्रस्तुत केले गेले आहे. बेंद्रे यांच्या काव्यात एखाद्या गोष्टीचे प्रकटीकरण व रूपांतरण करण्याची क्षमता आहे. त्यात व्यक्तीपासून समष्टीपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.” बेंद्रे यांच्या नंतरच्या वर्षीचा 1974 चा पुरस्कार मराठी भाषेतील लेखक वि.स. खांडेकर यांना मिळालेला आहे...
आनंदप्रवासी रवींद्र पिंगे
रवींद्र पिंगे हे मराठीतील नेटाने, सातत्याने, उमाळ्याने लेखन करणारे साहित्यिक होत. त्यांनी मुख्यतः ललित लेखन केले. त्यांनी कथा-कादंबरी हे वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत; पण ते वाचकप्रिय ठरले ते त्यांच्या छोटेखानी, प्रसन्न, उत्कट ललित लेखनामुळे. पिंगे यांनी पन्नासहून अधिक वर्षे, कोऱ्या कागदाच्या हाका ऐकत लेखणीचे वल्हे डौलाने वल्हवले. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ हे समर्थ रामदासांचे सांगणे पिंगे यांच्याइतके कोणी मनावर घेतले नसेल. ते ‘लिहा, सतत लिहीत राहा’ असे ‘पेर्ते व्हा’च्या चालीवर सांगत असत आणि त्यांनी स्वतःही लिहिण्याचा तो वसा जपला...
हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ (Hamid Dalwai, the Founder Of Muslim Reformists Movement)
‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना पुण्यातील ‘साधना’ साप्ताहिकाच्या आंतरभारती सभागृहात 22 मार्च 1970 रोजी झाली. ‘साधना’ साप्ताहिक हमीद दलवाई आणि ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ यांच्या पाठीमागे सतत खंबीरपणे उभे राहिले आहे. हमीद दलवाई यांना ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’च्या स्थापनेनंतर कार्य करण्यासाठी मोजून पाच-सात वर्षे मिळाली. दलवाई यांचे निधन अकाली, 3 मे 1977 रोजी झाले. यदुनाथ थत्ते, ग.प्र. प्रधान, नरेंद्र दाभोळकर हे ‘साधने’चे जुने आणि विद्यमान संपादक विनोद शिरसाट यांनी दलवाई व मंडळ यांच्यासाठी गेल्या पाच दशकांत केलेले कार्य मोठे व महत्त्वपूर्ण आहे...
एकनाथ आव्हाड – दापूर ते दिल्ली…
एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ घोषित झाला. त्यांचा समावेश आघाडीच्या बाल साहित्यकारांमध्ये होतोच. पुरस्काराने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी त्यांचा जीवनप्रवास नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दापूर या छोट्या खेड्यातून सुरू केला. नरेंद्र पाठक यांनी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांच्याशी गप्पा मारण्याचे ठरवले. कायम शाळेत, पुस्तकात आणि मुलांमध्ये रमणारा हा सरस्वतीपुत्र; त्यांनी त्यांच्या बालपणापासूनची कथा सांगितली आहे...
मी पाहिलेले दैनिकांचे संपादक
रवींद्र पिंगे यांचा दैनिकांच्या संपादकांबद्दलचा जुना लेख. त्यात ते म्हणतात, दैनिकांची वाट पाहणाऱ्यांपैकी मी नव्हेच नव्हे. दैनिके चार दिवस दिसली नाहीत तर माझे मन बिलकुल अस्वस्थ होणार नाही. अनेकदा, वर्तमानपत्र घरात येऊनही मी इतर व्यापांमुळे त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. गेल्या अर्धशतकात मी जी काही वर्तमानपत्रे वाचली, त्यात तीन संपादकांची शैली मला अप्रतिम वाटली: फ्रँक मोराईस, रावसाहेब पटवर्धन आणि ग. प्र. प्रधान. त्यांच्यात अभिजात असा खानदानीपणा आहे. भाषाप्रभुत्व असामान्य आहे. विचारांना नैतिक अधिष्ठान आहे. आविष्कार सौम्य आहे. आवाहन आहे. आव्हान नाहीच आणि आग्रहाचे नावच नाही. तसे घरंदाज लेखन मला भुरळ घालते...
अठ्ठेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Eighth Marathi Literary Meet 1969)
वर्धा येथे 1969 साली झालेल्या अठ्ठेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कवी प्रा. पुरुषोत्तम शिवराम रेगे. ते नवकवितेत स्वतःचा वेगळा प्रवाह जपणारे तरल कवी, अल्पाक्षराच्या वाटेने जाणारे कादंबरीकार आणि समीक्षक-संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. रेगे यांनी ‘सुहृद चम्पा’ आणि ‘रूपकथ्थक’ या टोपणनावांनीही लिखाण केले आहे. रेगे हे मूलतः सर्जनशील कलावंत होते. त्यांनी त्यांच्या लेखनाला ‘बालमित्र’ नावाच्या हस्तलिखित मासिकातून सुरुवात केली...
महादेवशास्त्री जोशी – संस्कारशील कथा
महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गोव्याच्या सत्तरी परगण्यामधील आंबेडे या गावी झाला. त्यांचे कथेच्या माध्यमातून मनुष्याच्या मनावर सद्भावनांचे संस्कार करणे हे उद्दिष्ट वाटे. त्यांचे जीवनविषयासंबंधीचे विचार, त्यांचे साहित्यिक कर्तृत्व व त्यांची आचरणशीलता यांमध्ये एकवाक्यता आढळते...
परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक
चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...