Home Search
सामाजिक स्थळ - search results
If you're not happy with the results, please do another search
सामाजिक उद्योजक ज्योती म्हापसेकर
ज्योती ही जगन्मैत्रीण आहे. इंटरनेट दोन दशकांपूर्वी नव्हते, तेव्हाही ज्योतीचा लोकसंग्रह प्रत्यक्ष भेटी आणि टेलिफोन ह्यांच्या द्वारे अफाट होता. तिच्या लोकसंग्रहाला तेव्हा भारताच्या सीमांची...
रमेश जोशी – वृक्षसावलीने दिला जीवनाला आयाम !
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धामणगाव गढी येथे सर्व लोक आकर्षित होतात ते तेथील रमेश जोशी यांच्या रोपवाटिकेबाबत ऐकून. धामणगाव गढी येथील साधा अल्पशिक्षित मोटर मेकॅनिक ते जोशी रोपवाटिकेचे संचालक रमेश जोशी या भन्नाट व्यक्तिमत्त्वाची ती किमया आहे. त्यांनी लाख-दीड लाख रोपट्यांची वाटिका तयार केली आहे ! त्यांच्या रोपवाटिकेमध्ये क्वचितच एखादे असे रोपटे असेल जे तुम्हाला मिळणार नाही...
जोर्वे-नेवासे संस्कृती (Jorve-Newase Civilization)
महाराष्ट्रा तल्या आद्य मानवी वसाहतींची संस्कृवती 'जोर्वे-नेवासे' संस्कृेती म्हणून ओळखली जाते. ही दोन्ही गावे प्रवरा नदीच्या काठी आहेत. नेवाशाला जिथे उत्खनन झाले आहे ती जागा परतीच्या प्रवासात पाहावी असा विचार करून नकाशावर आधी जोर्वे गावाचा रस्ता शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात जोर्वेच्या आधी दायमाबाद अशी पाटी दिसली. दायमाबाद हा देखील त्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा पाडाव. मग आणखी पुढचे काहीच दिसेना. गाडी सरळ दायमाबादच्या दिशेने वळवली. दायमाबाद संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर...
प्रवास शब्दांचे आणि अर्थांचे
नंदिनी आत्मसिद्ध या बहुभाषाविद्वान आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर त्यांचा कन्नड, बांग्ला, उर्दू आणि फार्सी या भाषांचाही अभ्यास आहे. त्या ‘मोगरा फुलला’च्या वाचकांसाठी शब्दांच्या व्युत्पत्ती, त्यांचा प्रवास याविषयी लिहिणार आहेत. या मालिकेचे शीर्षक आहे ‘शहाणे शब्द’. त्यातील हा पहिला लेख...
एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध
जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती व प्रपाती स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही...
दापोलीच्या रेखा बागूल – कर्णबधिरांना आसरा ! (Rekha Bagul works mainly for deaf children...
रेखा बागूल या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षणाकडे अपघाताने वळल्या, पण हळूहळू त्यांच्या कामाचे महत्त्व इतके वाढत गेले, की त्यांचे काम फक्त कर्णबधिरांपर्यंत मर्यादित न राहता गतिमंद आणि त्याही पुढे जाऊन बहुविकलांग मुलांपर्यंत पोचले आहे. त्या सुरुवातीला डोंबिवलीत आणि, आता दापोलीत ‘गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ ही निवासी शाळा चालवत आहेत. ‘आनंद फाउंडेशन ही त्यांची मूळ संस्था आहे. त्यांचे काम अन्य संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने वृद्ध निवासापर्यंत पोचले आहे...
एड्सग्रस्तांना जपणारी जाणीव ! (Couple recovered from Aids helps the Community to stand...
कोल्हापूरच्या सुषमा बटकडली आणि रघुनाथ पाटील या दोघांनी, ती दोघे स्वत: एड्ससह आयुष्य जगत असताना एकत्र येऊन ‘जाणीव’ या संस्थेची स्थापना केली. ती दोघे एच.आय.व्ही. बाधित रुग्णांना औषधोपचाराविषयी मार्गदर्शन आणि महाविद्यालयांमधून एड्सविषयी जनजागृती असे काम करत आहेत. त्याखेरीज त्यांनी एड्स रुग्णांसाठी तात्पुरते आसरा स्थळ चालवले आहे...
ठाणे कट्ट्याचे इवलेसे रोप… (Thane Park Discussion Group grows bigger along with the time)
संपदा वागळे आणि त्यांच्या मैत्रिणी यांनी एकत्र येऊन ठाण्यात ‘आचार्य अत्रे कट्टा’ सुरू केला. त्यांनाही त्यांच्यातील अनभिज्ञ असलेल्या विचारांची, क्षमतेची ओळख त्या कट्ट्याने करून दिली. त्या कट्ट्याने त्यांना नवे विचार दिले, माणसे दिली, मैत्र दिले, अनुभव दिले आणि प्रसिद्धीही दिली. अशा त्या सुसंस्कृत कट्ट्याची ओळख लेखाद्वारे करून घेणार आहोत...
प्रशांत परांजपे : समाजभान जपणारा बहुरूपी
प्रशांत परांजपे पाक्षिक ‘सर्वांगीण निवेदिता’ आणि ऑनलाईन पत्रकारितेतील ‘निवेदिता फास्ट न्यूज’ अशी दोन नियतकालिके चालवतात. त्याशिवाय ते इतर वृत्तपत्रांसाठी वेळोवेळी लेखन करत असतात. त्यांनी प्लास्टिकविरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे आणि प्रदूषण व अस्वच्छता यांना विरोध केला आहे. वृक्षतोड थांबावी म्हणून मोहिमा आखल्या आहेत. खासगी स्वयंसेवा हे तर त्यांचे स्वत:चे खास क्षेत्र. प्रशांत व्याख्याने, लेख, बातम्या अशा माध्यमांतून कोकणासमोर सतत येत राहिले आहेत. त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची दापोली शाखा जालगावातून चालवली...
दापोलीतील साहित्यजीवन
‘श्यामची आई’, ‘गारंबीचा बापू’ या साहित्यकृतींमुळे दापोलीचा ठसा साहित्य क्षेत्रात उमटला. दापोली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. तेथील तरुण वर्ग मुंबई-पुण्याकडे ‘करिअर’साठी जात आहे. असे असतानाही दापोलीचा निसर्ग, तेथील जीवन बाहेरगावी गेलेल्या तरुणांच्या मनातून जात नाही. ती ते त्यांच्या साहित्यातून प्रकट करतात. खुद्द दापोलीत राहणारे साहित्यिकही त्यांच्या परीने त्या करता धडपडत असतात. त्यांचा आढावा...