Home Search

समाजसेवक - search results

If you're not happy with the results, please do another search

मी पाहिलेले दैनिकांचे संपादक

रवींद्र पिंगे यांचा दैनिकांच्या संपादकांबद्दलचा जुना लेख. त्यात ते म्हणतात, दैनिकांची वाट पाहणाऱ्यांपैकी मी नव्हेच नव्हे. दैनिके चार दिवस दिसली नाहीत तर माझे मन बिलकुल अस्वस्थ होणार नाही. अनेकदा, वर्तमानपत्र घरात येऊनही मी इतर व्यापांमुळे त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. गेल्या अर्धशतकात मी जी काही वर्तमानपत्रे वाचली, त्यात तीन संपादकांची शैली मला अप्रतिम वाटली: फ्रँक मोराईस, रावसाहेब पटवर्धन आणि ग. प्र. प्रधान. त्यांच्यात अभिजात असा खानदानीपणा आहे. भाषाप्रभुत्व असामान्य आहे. विचारांना नैतिक अधिष्ठान आहे. आविष्कार सौम्य आहे. आवाहन आहे. आव्हान नाहीच आणि आग्रहाचे नावच नाही. तसे घरंदाज लेखन मला भुरळ घालते...

ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)

उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...

ठाणे कट्ट्याचे इवलेसे रोप… (Thane Park Discussion Group grows bigger along with the time)

संपदा वागळे आणि त्यांच्या मैत्रिणी यांनी एकत्र येऊन ठाण्यात ‘आचार्य अत्रे कट्टा’ सुरू केला. त्यांनाही त्यांच्यातील अनभिज्ञ असलेल्या विचारांची, क्षमतेची ओळख त्या कट्ट्याने करून दिली. त्या कट्ट्याने त्यांना नवे विचार दिले, माणसे दिली, मैत्र दिले, अनुभव दिले आणि प्रसिद्धीही दिली. अशा त्या सुसंस्कृत कट्ट्याची ओळख लेखाद्वारे करून घेणार आहोत...

खुर्चीची चाके आणि मनाचे पंख (Wheels of Chair and Wings of Mind)

कधीतरी, कसलीशी दुखापत होते आणि अनपेक्षितपणे आयुष्याचा सुकाणू पुढच्या दिवसांची वेगळीच दिशा दाखवतो. चालत्या-फिरत्या राजश्री पाटील या तरुण मुलीच्या आयुष्यात एका अपघातामुळे चाकाच्या खुर्चीला खिळून बसण्याचे दिवस आले, तरी मनाच्या पंखांना आकाश दिसत होतेच ! त्या एका बारीकशा धाग्याला घट्ट पकडून त्याचे सक्षम विचारप्रणालीमध्ये रूपांतर करण्याचे, काम करण्याचे धारिष्ट्य आणि धमक या चमक गावातील मुलीत कशी आली असेल? वाचणाऱ्या वाचकांना सकारात्मकतेकडे घेऊन जाणाऱ्या तिच्या कामाची ओळख...

खो-खो खेळासाठी शेवगाव स्पोर्ट्स क्लब

0
क्रिकेट, बॅटमिंटन, टेनिस, स्केटिंग अशा खेळांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील विविध क्लब आपल्याला माहिती आहेत. पण आपल्या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देणारे क्लब विरळच! असाच एक वेगळ्या वाटेवरुन यशोदायी प्रवास करणारा महाराष्ट्रातील एक क्लब म्हणजे ‘शेवगाव स्पोर्ट्स क्लब’. या क्लबने शालेय पातळीवर असणारा खो-खो हा खेळ राष्ट्रीय पातळीवर पोहचवला…

बी एम एम चे अधिवेशन : सोहळा अस्तित्वाचा

उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांना एका छत्राखाली आणण्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळ (बी एम एम). ती संस्था दर दोन वर्षांनी एखाद्या सबळ मंडळाला यजमानपद देऊन अधिवेशन म्हणजे सर्व मराठी मंडळांचे संमेलन घडवून आणते. तो सोहळा यावर्षी न्यू जर्सी येथील ‘मराठी विश्व’ या संयोजक संस्थेच्या वतीने साजरा होत आहे. प्रशांत कोल्हटकर हे अधिवेशनाचे निमंत्रक आहेत...

इंदापूर – इतिहासातच राहिलेले शहर (Indapur Still Lives in History)

इंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव. ते ऐतिहासिक महत्त्व असलेले पुणे जिल्ह्यातील सुंदर शहर. बालुशाहीसारखा दिसणारा खाजा, तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी आणि उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील मासे हे या शहराचे आकर्षण...

About

Think Maharashtra : A project by 'Vision Maharashtra Foundation’ It is basically a documentation program of the treasure of Maharashtra. The project envisages presentation of...

सोलापूरचे मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू (Ramkrishna Jaju- Solapur’s martial in Freedom Struggle)

‘मार्शल’ हे खरे तर लष्करी संबोधन, परंतु तेच संबोधन महात्माजींना दैवत मानून ज्याने अहिंसेची व अनात्याचाराची शपथ घेतलेली आहे अशा जाजू नावाच्या सोलापूरातील गांधीवादी समाजसेवकाच्या नावापुढे पाहून मोठा विरोधाभास वाटतो. रामकृष्ण गणेशराम जाजू !

अठ्ठाविसावे साहित्य संमेलन (Twenty Eighth Marathi Literary Meet – 1943)

श्रीपाद महादेव माटे हे सांगली येथे 1943साली भरलेल्या अठ्ठाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. श्री. म. माटे यांचे नाव उच्चारता क्षणीच, त्यांनी त्यांचे आयुष्य पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी झोकून दिले होते त्याची आठवण होते. जणू ह्या दलितेतर माणसाने दलित चळवळीची सुरूवातच केली !