Home Search

समाजकार्य - search results

If you're not happy with the results, please do another search

मी आणि माझे समाजकार्य

मी आणि माझे समाजकार्य 'नीरजा'; माझे पहिले पाऊल! - यशवंत मराठे काही वर्षांपूर्वी, आमचा कौटुंबिक व्यवसाय नाशिकला स्थलांतरित झाला आणि मग मी विचार करू लागलो, की...

हमीद सय्यद : भारूडांमधून जनजागृतीचा वसा! (Hamid Sayyad- Muslim Divotee Sings Hindu Bhajans)

हमीद सय्यद हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगावचे. छोट्या गावातून आलेला हा मुसलमान मुलगा वयाची चाळिशी ओलांडित असताना राष्ट्रीय भारूडकार होऊन गेला आहे. आकाशवाणी कलावंत तर तो आहेच. तो वारकरी सांप्रदायिक पारंपरिक भारुड सादर करून प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच हुकूमत गाजवू शकतो. त्याची ती ताकद हेरून त्याचा अनेकविध प्रचारकार्यात उपयोग मुख्यत: केंद्र व राज्य शासनाच्या आणि अन्य संस्थांकडून करून घेतला जातो. हमीद सय्यद यांच्या स्वरचित भारूडांमध्ये गायन, नृत्याभिनय व चटपटीत-उद्बोधक संवाद हे वैशिष्ट्य असते...

विलास रबडे – हरहुन्नरी विज्ञानयात्री (Rabde, the man with scientific temper and action)

विलास रबडे सत्याहत्तर वर्षांचा झाला, पण त्याचा दिवस चोवीस तासांपेक्षा आणि आठवडा सात दिवसांपेक्षा मोठा आहे ! तो इतक्या गोष्टी करत असतो, की ईश्वराने या माणसाला अतिरिक्त ‘काल’ देऊन या जगात पाठवले आहे की काय असे वाटावे ! मात्र तो अतिरिक्त बहुतेक वेळ समाजासाठी खर्च करतो. तो कोठे शाळेत विज्ञानविषयक कार्यक्रम घडवून आणतो, त्याने कोठे शाळेचे विज्ञानविषयक रेडिओ स्टेशन सुरू केलेले असते, शाळेत रिपेअर कॅफे सुरू केलेला असतो -त्यात मुलांना त्यांच्या घरच्या नादुरुस्त वस्तू आणून त्या दुरुस्त करण्याचे मार्गदर्शन मिळते. त्याने हॅम रेडिओ सेट मिळवून पुण्यात प्रदीप दळवी आणि अरविंद आठवले यांच्याबरोबर हॅम क्लब सुरू केला...

भारतरत्न नानाजी देशमुख यांच्यावर संकेतस्थळ (Bharatratna Nanaji Deshmukh Website)

समाजकार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे संकेतस्थळ मंगळवारी, ८ जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने जन्मशताब्दीवीरांच्या प्रकल्पांतर्गत तयार केले आहे. वेबसाइटचे लेखन ललिता घोटीकर यांनी केले आहे आणि संपादन गिरीश घाटे यांनी. नानाजी देशमुख यांचे मूळ नाव चंडिकादास अमृतराव देशमुख. त्यांचा सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून मोठा लौकिक होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या तीन क्षेत्रांत मुख्यत: काम केले...

विद्यानिकेतन – चांगल्या मूल्यांचा आग्रह (Dombivali’s Vidyaniketan – insistence for values)

‘विद्यानिकेतन’ ही डोंबिवलीमधील इंग्रजी माध्यमातील शाळा. समाजकार्याची आवड म्हणून विवेक पंडित यांनी ती सुरू केली. शाळेला चाळीस वर्षे झाली. मराठी माणसाने ध्येयवृत्तीने चालवलेली शाळा म्हणून तिचे डोंबिवलीच्या शैक्षणिक आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. वास्तविक विवेक पंडित यांचे शिक्षण वाणिज्य व व्यवस्थापन ह्या क्षेत्रांमधील आणि त्यांचा कामाचा अनुभव इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, केमिकल, एण्टरटेनमेंट अशा क्षेत्रांमधील. ते तेथे आघाड्यांच्या कंपन्यांचे प्रकल्प सल्लागार होते. त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असे, पण त्यांना त्यांची समाजधारणा स्वस्थ बसू देत नव्हती. त्या अस्वस्थतेतूनच ‘राजेंद्र शिक्षण संस्था’ ह्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘विद्यानिकेतन’ ह्या शाळेचा जन्म 16 जून 1985 रोजी झाला...

जनआरोग्य योद्धा – डॉ.अनंत फडके

पुण्याचे डॉ.अनंत फडके म्हणजे एके काळच्या मागोवा गटात सहभाग असलेला, शहादा श्रमिक-संघटनेच्या चळवळीचा पाठीराखा. त्यांनी लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य चळवळ यांच्यासाठी आरोग्य व आरोग्य-सेवेसंदर्भात आमूलाग्र सुधारणा करण्याकरता शास्त्रीय भूमिका मांडली. त्यांनी 15 एप्रिल 2025 रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत पदार्पण केले. सारे जग पैशांच्या मागे धावत असताना डॉ. फडके यांनी स्वत:ला ‘जनआरोग्य चळवळी’त झोकून दिले आहे. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला नाही. ते ज्या निष्ठेने प्रस्थापित वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींच्या विरुद्ध ठामपणे उभे ठाकले; ते पाहिले, की ते ‘जनआरोग्य योद्धा’ म्हणण्यास खऱ्या अर्थाने पात्र ठरतात...

लिबरल आर्ट्सचा अभ्यास – नवे आव्हान

0
लिबरल आर्ट्स ही शाखा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नव्याने उदयास आली आहे आणि फोफावत आहे. प्रतिष्ठाप्राप्त महाविद्यालये, विद्यापीठे आणि नव्याने उदयास आलेली खाजगी विद्यापीठे यांनी लिबरल आर्ट्स हा मुक्त अभ्यासक्रम दशकभरापूर्वी सुरू केला. ज्ञानशाखांची नावे काळाप्रमाणे बदलत राहतात. पूर्वी या शाखेस ढोबळपणाने कला (आर्ट्स) किंवा काही ठिकाणी मानव्यविद्या शाखा असे म्हटले जाई. त्यात फरक होता - त्या शिक्षणक्रमास मर्यादा होती. पण आता, त्यांच्याऐवजी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लिबरल आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा दिसू लागला आहे. गेल्या दशकभरात प्रथम वर्ष पदवीला नव्वद टक्के गुणांना प्रवेश बंद होत आहेत. बदलत्या काळात ज्ञानशाखांच्या कक्षा रुंदावल्या. पालकांच्या व मुलांच्या दृष्टिकोनात बदल झाला...

अवनि – उपेक्षित बाल-स्त्रियाचा आधार !

संघर्षाशिवाय तरणोपाय नाही हे अनुराधा भोसले यांच्या लक्षात लहानपणीच आले ! कष्ट हे जणू त्यांच्या पाचवीला पुजले होते. त्यांनी अकरावी-बारावीचे शिक्षण घेत असताना शौचालयाच्या साफसफाईचे कामदेखील केले आहे ! पण त्यांची पुढील आयुष्यातील कामगिरी फार मोठी आहे. अनुराधा भोसले यांनी ‘अवनि’ संस्थेमार्फत कोल्हापूर वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सत्तावन ‘वीटभट्टी’ शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वंचित, निराधार मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. अनुराधा यांनी एकल स्त्रियांसाठी ‘एकटी’ ही संस्था सुरू करून त्या स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे. अनुराधा भोसले यांच्या नावावर कोल्हापूरात अनेक कामांच्या नोंदी आहेत...

ताराबेन मश्रुवाला – माधानच्या दीपशिखा (Taraben Mashruwala changed the face of Madhan village)

ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले...

सीताफळांचे वैभव – खेमजई

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील खेमजई गावामध्ये निराळाच प्रयोग राबवण्यात येत आहे. खेमजई हे गाव सीताफळांसाठी प्रसिद्ध होते. त्या गावातील सीताफळाच्या झाडाचे जे फळ असे त्याची चव लोकांना फार आवडायची. तरुण ग्रामपंचायत सदस्यांच्या सूत्रसंचालनाखाली गाव एकत्र आले. सीताफळ लागवडीचा कार्यक्रम आखला, रोपवाटिका निर्माण केली, ‘मनरेगा’शी जोडून महिलांना लागवडीचे काम दिले गेले. त्यामुळे सीताफळांचे वन पुन्हा साकारण्याची आशा तयार झाली आहे. त्याच बरोबर ‘सीडबॉल’ची कल्पना राबवून साऱ्या गावकऱ्यांनी गावाभोवतीच्या पडिक, उजाड जमिनीत वृक्षराजीचा संकल्प सोडला आहे...