Home Search

शिक्षण - search results

If you're not happy with the results, please do another search

उच्च शिक्षण, संशोधन – काही प्रश्न काही उत्तरे…

देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट समजून घेतले जात नाही. शिक्षण हे पदवी-सर्टिफिकेट घेण्यासाठी अन् पर्यायाने नोकरीसाठी गरजेचे म्हणून घेतले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहते. त्यामुळे शिकवणारे, शिकणारे या सर्वांची दिशाभूल होते. सगळे लक्ष मार्क्स, श्रेणी, पर्सेंटेज यांकडे लागलेले. परीक्षांचे नियोजनदेखील त्या उद्दिष्टाने केले जाते. कोणतीही परीक्षा विद्यार्थी काय, कसे शिकला हे तपासत नाही...

शिक्षण कशासाठी- हे समजेल का?

शिकवण्याची नव्हे तर शिकण्यासंबंधीची आव्हाने या शतकात वाढत जाणार आहेत. भारतीय शिक्षणव्यवस्था ‘टीचिंग’चा विचार करते; सगळा भर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असतो. विद्यार्थी काय व किती शिकला याचा विचार फारसा नसतो. त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन ज्या परीक्षांद्वारे होते त्याही कुचकामाच्या आहेत. शास्त्र, विज्ञान समजून घेणे खूप कठीण नाही, पण ते तसे सोपेदेखील नाही ! शिकणे याचा अर्थ पुस्तकातून माहिती गोळा करणे, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नव्हे ...

मॅक्सिन बर्नसन – शिक्षणातील दीपस्तंभ (Maxine Berntsen – Life long efforts for model school)

मॅक्सिन बर्नसन या नॉर्वेजिअन अमेरिकन विदुषी तरुण वयात भारतात आल्या आणि भारताच्याच झाल्या. त्यांचे शिक्षण क्षेत्रात काम मोलाचे समजले जाते. मॅक्सिन बर्नसन या त्यांच्या पीएच डी च्या अभ्यासाची तयारी करत असताना त्यांच्या कॉलेजमध्ये इरावती कर्वे व्याख्यान दौऱ्यावर आल्या होत्या. इरावती कर्वे यांनी त्यांना फलटणला जाण्यास सुचवले. तेथे त्यांची मुलगी जाई निंबकर राहत असे. म्हणून त्या फलटण या गावी 1966 साली आल्या. तीच मॅक्सिनबाईंची कार्यभूमीही झाली !

माझी संस्था- आबासाहेब काकडे शिक्षण समूह, शेवगाव

शेवगावच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री आबासाहेब काकडे यांनी आणली. त्यांना विद्येचे, शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यांचे राहणे खेड्यातील पण दृष्टी आधुनिक जगाची होती. त्यांनी ‘माझी संस्था’ ची स्थापना 6 मार्च 1953 रोजी केली आणि तिचे जाळे सारा तालुका आणि जिल्ह्यात काही भागात विणले. साठ वर्षांत शिक्षणाच्या त्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे. ती संस्था आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह म्हणून ओळखली जाते...

नरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा

दापोली तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारी व्यक्ती म्हणजे नरहरी वराडकर.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वराडकर यांच्या मनात शिक्षणाविषयी तळमळ होती. त्याचप्रमाणे ते स्त्री-शिक्षणाविषयी आग्रही होते. त्यांची दूरदृष्टी व त्यांचे प्रयत्न यामुळे दापोली येथे उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.

जगताप सरांचा भर प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर! (Educationist H.N. Jagtap Emphasizes on the Quality Training in...

ह.ना. जगताप हे शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांचा भर अध्यापक महाविद्यालये शिक्षक निर्मितीचे कारखाने न बनता, त्यातून धडपड्या विद्यार्थी हे दैवत मानणारे आणि अभ्यास व वाचन प्रचंड असणारे शिक्षक घडले पाहिजेत, त्यासाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व शिक्षणपद्धत यावर आहे. जगताप यांनी शिक्षक-प्रशिक्षणातील सूक्ष्म अध्यापन, मूल्यमापन पद्धत, मानसशास्त्र व संशोधन पद्धत यांकडे वेळोवेळी लक्ष वेधले आहे…

नर्मदा जीवनशाळा – आगळा शिक्षणप्रवाह

स्वतःमधील क्षमतांचा परिचय करून घेणे, त्या दिशेने पुढे चालणे व जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण करणे म्हणजे शिक्षण ! ते शिक्षण नर्मदाघाटीत मेधा पाटकरांच्या जीवनशाळा देतात. त्यांच्या या उपक्रमामुळे मुले हातात शस्त्र न घेता जीवनशाळांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन कशा प्रकारे समाजाची उन्नती साधू शकते हे जीवनशाळेला भेट दिल्यावर जाणवते...

शालेय शिक्षणक्रमात नैतिक मूल्ये !

समाजात गुन्हेगारी वाढू नये याकरता मुलांना शालेय वयापासून नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे असे म्हणणे कोल्हापूर येथील कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांचे आहे. ते राष्ट्रपती पदकाने तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित अधिकारी आहेत...

स्थलांतरित मुलांचे शिक्षण – दौंडचा अनुभव (Education of Migrant Children -Daund’s Experience)

शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...

बालरक्षक चळवळ : शिक्षणास शासनाची चालना (Balrakshak – Campaign to bring children to schools)

0
शाळा प्रगत करण्याच्या असतील तर अगोदर शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले पाहिजेत, ते शाळा शाळांत टिकले पाहिजेत व शिकले पाहिजेत. लाखो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तपणे ‘बालरक्षक’ बनून कार्य केले तर मुलांना शाळा शाळांत आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश येऊ शकेल...