Home Search
व्यक्ती - search results
If you're not happy with the results, please do another search
व्यक्ती
सर्वसामान्य माणसे त्यांच्या कर्तृत्वाने समाज घडवत असतात. परंतु अशा माणसांकडे दुर्लक्ष होते आणि लता मंगेशकर, शरद पवार, माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची नावे समाजाचे कर्तृत्ववान प्रतिनिधी म्हणून...
गोपाळकृष्ण गोखले- व्यक्ती व संस्थापक (Gopal Krishna Gokhale – Thinker among freedom fighters)
गोपाळकृष्ण गोखले यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान बहुमुल्य आहे. ते बहुविध गुणांनी नावाजले गेले होते - भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे नेमस्तवादी पुढारी, उत्कृष्ट संसदपटू, देशभक्त राजकारणी, तर्कशुद्ध मांडणी शांतपणे करणारे अभ्यासू अर्थतज्ञ,
वसईतील मराठी भाषक ख्रिस्ती व्यक्तींची चरित्रे आणि आत्मचरित्रे (Biographies and Autobiographies of Marathi Speaking...
मराठी भाषक ख्रिस्ती समाजात चरित्र आणि आत्मचरित्र यांचे प्रमाण अगदी कमी होते. कॅथॉलिक पंथीय ख्रिस्ती समाजात तर संत चरित्र आणि अनुवादित (इंग्रजीतून) अशी धर्मगुरुंची आत्मचरित्रे लिहिण्यावरच भर अधिक होता.
जन्मशताब्दी साजरी होत असलेल्या व्यक्ती (Janmashatabdiveer)
मी, माझा सहकारी राजेंद्र शिंदे आणि विनय नेवाळकर, आम्ही त्या तिघांच्या जन्मशताब्दीचा विचार करताना वेगळीच कल्पना लढवली. गेल्या शतकातील व या शतकाच्या पहिल्या काही दशकांत सामाजिक-सांस्कृतिक जीवन घडले गेले ते ढोबळपणे 1900 ते 1930 या काळात जन्मलेल्या महनीय व्यक्तींच्या संस्कारांतून. त्यांच्याच जन्माची शंभर वर्षे विद्यमान ज्येष्ठ जनांना महत्त्वाची वाटत आहेत व तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जावा असेही वाटत आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्राईस टॅग असतोच!
प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नावर सार्वमत घ्यावे असे म्हणून देशात खळबळ उडवून दिली आहे.
श्रीराम सेनेनेही आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून भूषण यांना मारहाण केली, ते...
वसंत जोशीचा मृत्यू – जो आवडे सर्वांना… (Vasant Joshi, Yogic Man Liked by All)
वसंत जोशी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी शांतपणे झोपेत मरण पावला. तो त्या आधी चार दिवस थोडा अस्वस्थ होता. तसे तर, त्याने त्याचे सार्वजनिक कार्य वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी थांबवले होते. वयोमानाने शरीर थकत होते. त्याच्या पत्नीचे, सुनीताचे देहावसान त्या आधी, तीन वर्षांपूर्वी झाले. त्या काळात, त्याला काही व्याधींनी घेरले, विस्मृती जाणवू लागली होती, पण गंभीर असे काही नव्हते. त्यात सोसायटी पुनर्विकासानंतर मिळालेला फ्लॅट मोठा; अपत्याविना जीवन एकाकी होते. त्याचे पुतणे रविंद्र जोशी व सूनबाई अश्विनी यांनी त्याच्या नाश्ता-जेवणाची व्यवस्था केली होती. पुतणी ज्योती पानसे जाऊन-येऊन लक्ष ठेवायची. तो स्वतः उठून शनिवार, रविवार पुतण्या व पुतणीकडे जाई. वसंतचा स्वभाव ‘सोशल’; सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा, हसतमुख राहण्याचा होता. त्याने जीवनाबद्दल तक्रार कधीही, अगदी शेवटच्या काळातही केली नाही. परंतु घरात तो एकटा असे. सोसायटीतील काही परिवारांचा त्याला आधार होता...
वृद्धाश्रमी… – स्वाभाविक, अपरिहार्य जीवनावस्था
माणसे वृद्धत्वाकडे सरकू लागतात तेव्हा त्यांना अनेक धक्के बसू लागतात. आयुष्याच्या संध्याकाळी अधिक भय वाटते ते मृत्यूचे आणि परावलंबित्वाचे. वार्धक्य म्हणजे दुसरे बालपण. शरीराच्या अवयवांची शक्ती मंदावत जाते, रिकामपण खाण्यास उठते. त्यातून नैराश्य येऊ लागते. व्यक्तीचे सामाजिक व कौटुंबिक जीवन हेदेखील सामूहिक न राहता वैयक्तिक बनले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य दीनवाणे झाले आहे. पण वृद्धत्व हे स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे. त्यामुळे ते तशाच पूर्वतयारीने स्वीकारले पाहिजे. ही तयारी मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर असते. शारीरिक हालचाली मंदावत जात असतात. त्यासाठी आवश्यक तो व्यायाम, आहार आणि औषधे घ्यावी लागतात; तर मानसिक पातळीवर वृद्धांना सहवास आणि प्रेम यांची गरज असते...
एस.एम. जोशी यांच्या नावे संकेतस्थळ (VMF’s website released to cover S M Joshi’s life...
प्रख्यात समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्या नावाचे संकेतस्थळ ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल आणि गिरीश घाटे यांनी ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’साठी पुण्यामध्ये एका बैठकीत खुले केले. त्यामुळे एस.एम. जोशी यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे विचारकार्य जगभरच्या लोकांना एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. एस.एम. यांचे संकेतस्थळ हा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘महाभूषण’ प्रकल्पाचा एक भाग आहे. यापूर्वी साने गुरूजी आणि रामानंद तीर्थ यांची संकेतस्थळे तयार केली आहेत. अनेक संकेतस्थळे निर्माण करून ती सार्वजनिक रीत्या लोकांना दृश्यमान होतील अशी सायबरस्पेसमध्ये ठेवण्याचा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चा संकल्प आहे...
गौडमल्हार म्हणजे प्रेमाचा पाऊस ! (Classical Gaud Malhar Is Full of Love !)
गौडमल्हारचा परिचय तसा उशिराच झाला ; पण पहिल्या श्रवणापासून जिवाभावाचा बनलेला तो खास आवडता राग ! किशोरी यांची स्वरचित ‘बरखा बैरी भयो’ ही रचना माझ्या सर्वाधिक प्रिय रचनांपैकी एक ! त्यातील ‘जाने ना देत मोहे पी की नगरिया’ या ओळीतील भाव थेट हृदयाला भिडणारा आहे. त्यामधून प्रत्येकाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यातील असा क्षण आठवेल, की प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकली नाही याची हुरहूर मनाला लागून राहील. भावनांचे किती असे नाजूक पदर ...
विलास शिंदे यांची हाक, निसर्गासाठी ! (Vilas Shinde’s Efforts for Environment)
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास शिंदे हे शैक्षणिक पात्रतेनुसार व्हायचे मातब्बर प्राध्यापक; परंतु वास्तवात ते शिरले विद्यापीठ प्रशासनात आणि झाले कुलसचिव. अर्थात, त्याआधी उप, प्रभारी अशी कुलसचिवपदे त्यांना निभावावी लागलीच. एका अर्थाने तेही बरे झाले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठास उत्तम, अनुभवी प्रशासक लाभला, विद्यापीठाच्या टेकडीवर निसर्गसृष्टी बहरली, विद्यापीठ हे पाण्याने मालेमाल झाले; तेवढेच नव्हे तर संकटसमयी विद्यापीठ साऱ्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवू लागले ! विलास शिंदे यांच्यात एकाच वेळी शिक्षणप्रेमी प्राध्यापक, कुशल व्यवस्थापक, हाडाचा निसर्गवेडा आणि लेखनकुशल विज्ञानप्रसारक अशी चार व्यक्तिमत्त्वे लपली आहेत. मात्र लोकांच्या लेखी ते ‘पाणीवाला बाबा’ किंवा इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या कविमनाच्या व्यक्तीस ‘झाड कवेत घेणारा माणूस’ असतात...