Home Search

विरार - search results

If you're not happy with the results, please do another search

विराट विरार

विरार या एकेकाळी लहानशा असलेल्या गावाचे विराट नगरीत रूपांतर झाले आहे. हा लेख साधारणत: पाऊणशे वर्षांपूर्वीच्या विरारच्या गतस्मृतींमध्ये वाचकाला रमवतो. त्यावेळचे गावपण, परस्परांविषयीचा आपलेपणा व माणुसकीचा गहिवर, संस्कृतीच्या पाऊलखुणा झरझर डोळ्यांसमोरून तरळून जातात. भेदभावरहित अशी ती गावे शिक्षणाच्या विस्फोटाने, शहराच्या बंदिस्त जीवनशैलीने, आधुनिक सुविधा आणि श्रीमंतीने हरवून गेली आहेत...

माझी मुंबई (My Mumbai)

0
मुंबई शहराच्या पोटात अनेक मुंबई आहेत. संध्याकाळच्या समुद्रावर दिव्याच्या लखलखटाने उजळलेली मुंबई, उदास काळोखात तेवणारी मुंबई आणि अंधारात बुडून गेलेली भयावह मंबई यांची प्रतिबिंबे तरंगत असतात. त्यांची आपापसात सरमिसळ होत असते. अशी ही मायारूपिणी मुंबई हेच अनेकांचे ‘गाव’ असते. त्याचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान प्रत्येकाला आपापल्या नजरेतून दिसतो. अशा या ‘गावाची’ विविध रूपे एकत्र करून एक कोलाज तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी मानस आहे...

वैभवशाली वसई आणि घाटी लोकसंस्कृती (How Western Maharashtra’s ‘ghati’ people influenced Vasai’s mainly Christian...

वसईच्या एकूण लोकसमुदायामध्ये घाटी म्हणजे देशावरील माणसे बहुत आहेत. तशी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कुटुंबे त्या भागात असावीत असा अंदाज आहे. ते लोक मुख्यत: सातारा जिल्ह्याच्या माणदेशातील आहेत. ते गेल्या दोन-तीन शतकांपासून तेथे वास्तव्यास येत गेलेले आहेत. ते लोक मेंढपाळ म्हणून भटकंती करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आले व पुढे येऊन वसईत स्थिरावले. वसई ही त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमध्ये वत्सापूर, बांदुपुरा, बहादुरपुरा, गुलछनाबाद आणि बाजीपूर अशा नावांनी आलेली दिसते...

फुलपाखरांच्या गावात…

श्रीकृष्णांचे गुरू सांदिपनी यांचा आश्रम पालघर जिल्ह्यातील चांदिप गावात होता असे म्हटले जाते. सांदिपनी ऋषींचे गुरुकुल मध्यप्रदेशात आहे. महाराष्ट्रातील चांदिप हे ठिकाण मात्र ‘नाही...

स्वप्नसोपान बारोंडागड

‘बारोंडागड’ हे नाव खडबडीत आहे. ते ठिकाण पालघर जिल्ह्यातील विरारपासून हाकेच्या अंतरावर असूनही लोकांच्या नजरांपासून मात्र दूर राहिले आहे. ते झाकले माणिक आहे असेही म्हणता येईल. सूर्योदय, सूर्यास्त, पावसाळा, हिवाळा या सगळ्याची उत्कंठा अनुभवावी ती निसर्गरम्य बारोंडागडावर !

नयन बारहाते यांची कला आणि त्यांचे जगणे (The Tragedy of an Artist (Nayan Barhate))

नयन बारहाते यांचे व्यक्तिमत्त्व एकच एक उपाधी लावून वर्णन करणे कठीण आहे. नयन हे कमर्शियल आर्ट व पत्रकारिता या दोन्ही विषयांतील पदवीधर. त्यांचा संचार त्यांच्यात दडलेला चित्रकार, पत्रकार, मुखपृष्ठकार, कवी, संपादक आणि ‘फिलॉसॉफर’ अशा सर्व पातळ्यांवर लीलया होत असतो.

पखवाजपटू गार्गी शेजवळ (Pakhwaj Player Gargi Shejwal)

भारतातील पखवाजवादकांचे पहिलेच पखवाजपर्व भोपाळमध्ये 2013 साली आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात पखवाजवादन करणारी गार्गी ही पहिली महिला कलाकार होती. पखवाजपर्व धृपद संस्थान भोपाळ न्यास आणि डीडी भारती यांच्या वतीने भरले होते. गार्गी देवदास शेजवळ ही महाराष्ट्राची. गार्गी मुंबई, पुणे; तसेच, भारतातील विविध ठिकाणी तिच्या गुरूंसोबत पखवाजवादन करत असते.

चौल, शूर्पारक आणि ‘मडफ्लॅट्स’ (Chaul, Shurparak and Mudflats)

चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिप्राचीन बंदर. त्याचा उल्लेख चिम्युला, टिम्युला, साइभोर, चेऊल अशा विविध नावांनी इतिहासात आढळतो. चौलचा उल्लेख घारापुरीच्या लेण्यातील शिलालेखातदेखील आढळतो. चौल बंदरात 1470 साली आलेल्या रशियन दर्यावर्दीचे नाव – अफनासी निकीतीन.

वसईचा टेहळणी बुरूज : हिरा डोंगरी (Vasai’s Hira Hill)

हिरा डोंगरी हा दक्षिण आणि उत्तर वसई यांना जोडणारा दुवा होय. ती शंभर-दीडशे फूट उंचीची टेकडी वसई तालुक्याच्या गिरीज आणि भुईगाव या दोन गावांच्यामध्ये उभी आहे. ते ठिकाण चिमाजी आप्पा यांनी सार्‍या वसईवर नजर ठेवण्यासाठी निवडले होते.

बाबू मोरे : शाळेकडून गाव समृद्धीकडे (Babu More – School teacher aspires for Village...

बाबू चांगदेव मोरे हे पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. बाबू मोरे यांनी ऑर्गेनिक शेतीचा प्रयोग उन्हाळ्याच्या दिवसांत ठिबक सिंचनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेच्या प्रांगणात यशस्वी करून दाखवला.