Home Search

मंदिरे - search results

If you're not happy with the results, please do another search

इंदापूरातील खाजगी मालकीची मंदिरे (Private Temples in Indapur)

इंदापूरचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्याप्रमाणेच अनेक ब्राह्मण कुटुंबीयांची स्वतःची खाजगी मंदिरे तेथे आहेत.व्यंकटेशाचे मंदिर इंदापूरमधील सर्वात पुरातन आणि श्रीमंत मंदिर असावे...

भारतातील वैष्णव मंदिरे (Vaishnav Temples in India)

विष्णूचे मूर्तिरूपात पूजन आणि त्यासाठी मंदिरनिर्माण परंपरा भारतीय भूमीवर गेल्या बावीसशे वर्षांपूर्वीपासून दिसून येते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या लोकप्रिय त्रिमूर्तीपैकी विष्णू हा एक. विष्णूचे उल्लेख वैदिक वाङ्मयापासून मिळतात.

शिवाची रूपे, त्याची मंदिरे आणि त्याची पूजा (Sect of Shaiva and it’s Traditions)

0
सृष्टी शिवाने निर्माण केली. शिवाचे स्वरूप मानवासारखे नाही. शिवाची दोन रूपे स्वरूप व तटस्थ अशी आहेत. शिवहा पती असून त्याला हर, ईश, नाथ, नंदी इत्यादी नावाने ओळखले जाते. कुंभार घटनिर्मितीसाठी काठीद्वारे चाक फिरवून निर्माण झालेल्या गतीचा, शक्तीचा साधन म्हणून उपयोग करतो, तशी सृष्टीसाठी माया व प्रकृती असते.

हेमाडपंती मंदिरे : महाराष्ट्राची स्थापत्यकला (Maharashtra’s Architecture Hemadpanti Temples)

महाराष्ट्रातील ‘हेमाडपंती’ मंदिरे म्हणजे मध्ययुगीन भारताचे सांस्कृतिक संचित आहे. ती राज्यात विविध ठिकाणी आढळतात. इंग्रजी लेखक आल्डस हक्सले यांनी म्हटले आहे, की “त्या भव्य मंदिरांच्या पुढे जगातील महदाश्चर्य म्हणून गाजलेला ताजमहालही कलेच्या दृष्टीने सर्वसामान्य ठरेल!”
carasole

महाराष्‍ट्रातील आगळीवेगळी शिवमंदिरे

1
महाराष्‍ट्रातील शिवशंकराची मंदिरे गावोगावी आढळतात. शिवमंदिरांसोबत वास्‍तूकला आणि शिल्‍पकला यांचा झालेला संगम जागोजागी आढळतो. नाशिकचे त्र्यंबकेश्‍वराचे शिवमंदिर हे त्‍याचे प्रसिद्ध उदाहरण. महाराष्‍ट्राच्‍या गावागावांमध्‍ये तशी...

वाळुज गावची मंदिरे

मोहोळ तालुक्यातील वाळुज येथे महादेवाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. ते वाळकेश्वर या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारात महाकाय दगडी गणपती व नंदी आहे. मंदिराशेजारी...

त्सुनामी केळशीची (Tsunami of Kelshi)

कोकण किनाऱ्यावरील केळशीला पाचशे वर्षांपूर्वी, 1524 साली त्सुनामीने तडाखा दिला होता. त्यात सारे गाव उद्ध्वस्त झालेच, परंतु त्यातून केळशीच्या सागर किनाऱ्यावर वाळूचा बंधारा उभा ठाकला तो आजतागायत. वादळातील समुद्र लाटांचे तांडव शांत झाले. गावात आलेले समुद्राचे पाणी खाडीत वाहत जाऊन परत समुद्राला मिळाले. वाळूचा तो ढिगारा मात्र जमिनीवर राहिला – एक हजार मीटर लांब, अठरा मीटर उंच ! मात्र कालपरत्वे वारा, पावसामुळे त्याची झीज होऊन तो अठरा मीटर उंचीचा आठ मीटर झाला आहे. त्या आपत्तीची नोंद अधिकृत शाही वा नंतरच्या ब्रिटिश दफ्तरांत आढळत नाही. मात्र वास्को द गामा या खलाशाच्या नोंदीत त्या वादळाचे वर्णन व संदर्भ मिळाले आहेत...

वाटूळ ! (Watul Village)

विराज चव्हाण यांनी सध्याच्या वाटूळ या गावाची माहिती दिली आहे. त्यासोबत प्राची तावडे यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले गाव, त्या गावच्या रम्य आठवणी असा लेख लिहिला आहे. त्या लेखाची लिंक सोबत जोडली आहे. तुम्हीही तुमच्या गावाची ललित पण वस्तुनिष्ठ माहिती ‘गावगाथा’ दालनाद्वारे जगभर पोचवू शकता. वाटूळ हे नाव वाचताना जरा वेगळे वाटते ना? वाटूळ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सुंदर गाव आहे. ते मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचा आकार भौगोलिक दृष्ट्या गोलाकार आहे, म्हणून ते वाटूळ ! त्या बाबत दंतकथाही आहेच...

अलिबाग माझे गाव

अलिबाग हे पुण्यामुंबईजवळचे समुद्र किनाऱ्यावरील गाव. अलीकडच्या काळात ‘टुरिस्ट प्लेस’ म्हणून गाजलेले. ते दोन दिवसांच्या ट्रिपसाठी उत्तम मानले जाते. मुंबईहून तेथे ‘रोरो बोट सर्व्हिस’ने जाता येत असल्याने अलिबागचे पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व अधिकच वाढले आहे. पण अलिबागला मोठा इतिहास आहे. शिवाजीराजे व आंग्रे सरदार यांच्या कथाकहाण्या प्रसिद्ध आहेतच, पण ज्यू लोक दोन हजार वर्षांपूर्वीपासून येथे राहत आले आहेत. त्यांची जुनी घराणी आहेत आणि आता संबंध इस्त्रायलशी जोडलेले आहेत. बरेच लोक तिकडे स्थलांतरित झाले आहेत. अलिबागचा पांढरा कांदा हे तेथील वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे. अलिबागला ब्रिटिशकाळात हवामान केंद्र होते. ते तत्कालीन कुलाबा (आता रायगड) जिल्ह्याचे मुख्य शहर होय. तेथून जिल्ह्याचे सर्व व्यवहार होतात...

अलिबाग नावाचा शोध !

अलिबाग ह्या शहराच्या नावाची व्युत्पत्ती बायबलमध्ये सापडते ! पण इतिहासाचा प्रवास अनेकदा असा अनाकलनीय असतो. ‘उत्पत्ती’ नावाचे बायबलचे पहिले पुस्तक आहे. आदाम आणि एवा ह्यांची गोष्ट त्यात आहे. आदाम हा आदिपुरुष आणि एवा ही आदिमाता. त्यांचे दोन मुलगे म्हणजे काईन आणि आबेल. काइनने (थोरला) रागाच्या भरात आबेलचा खून केला ! बंधुप्रेम आदी मूल्ये अस्तित्वात येण्याआधीची ही गोष्ट आहे. तेव्हा राज्य द्वेषाचे होते. नंतर आदामाला अनेक अपत्ये झाली, त्यांतील सेथ हा ज्येष्ठ...