Home Search

मंगेश पाडगावकर - search results

If you're not happy with the results, please do another search

विलास शिंदे यांची हाक, निसर्गासाठी ! (Vilas Shinde’s Efforts for Environment)

5
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास शिंदे हे शैक्षणिक पात्रतेनुसार व्हायचे मातब्बर प्राध्यापक; परंतु वास्तवात ते शिरले विद्यापीठ प्रशासनात आणि झाले कुलसचिव. अर्थात, त्याआधी उप, प्रभारी अशी कुलसचिवपदे त्यांना निभावावी लागलीच. एका अर्थाने तेही बरे झाले. त्यामुळे शिवाजी विद्यापीठास उत्तम, अनुभवी प्रशासक लाभला, विद्यापीठाच्या टेकडीवर निसर्गसृष्टी बहरली, विद्यापीठ हे पाण्याने मालेमाल झाले; तेवढेच नव्हे तर संकटसमयी विद्यापीठ साऱ्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवू लागले ! विलास शिंदे यांच्यात एकाच वेळी शिक्षणप्रेमी प्राध्यापक, कुशल व्यवस्थापक, हाडाचा निसर्गवेडा आणि लेखनकुशल विज्ञानप्रसारक अशी चार व्यक्तिमत्त्वे लपली आहेत. मात्र लोकांच्या लेखी ते ‘पाणीवाला बाबा’ किंवा इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या कविमनाच्या व्यक्तीस ‘झाड कवेत घेणारा माणूस’ असतात...

महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी पितापुत्र

प्रसिद्ध निरूपणकार आप्पा धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. देशपातळीवर जसा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसाच राज्य पातळीवर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे. धर्माधिकारी कुटुंबीयांचे प्रेरक आणि समाजोपयोगी कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्याच कुटुंबासाठी पित्यापाठी पुत्राला असा हा दुसऱ्यांदा पुरस्कार दिला आहे...

शिवसंदेशकार हरिभाऊ निंबाळकर

कॉ.हरिभाऊ निंबाळकर हे फलटण नगरपालिकेपासून राज्याच्या विधानसभेपर्यंत, कामगारांच्या विविध प्रश्नांपासून अनेक क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी लढणारे झुंजार व्यक्तिमत्त्व होते. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा आमदार होते...

असोशीने जगणारी व लिहिणारी लेखिका : वासंती मुझुमदार

वासंती मुझुमदारम्हणजे लेखणी व कुंचला याचा दुर्मिळ संगम असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कवितेचा उत्कट प्रतिमासृष्टी, चपखल शब्दकळा हा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यात मानवी नाती व त्याचा परस्पर संबंध याचे मनोज्ञ दर्शन घडते. वासंती यांच्या कुंचल्याची कधी लेखणी होते, तर कधी लेखणीचा कुंचला होतो ते कळत नाही...

आचार्य भागवत – लोकांतातील एकांत (Acharya Bhagwat – Gandhi Thinker)

आचार्य भागवत हे त्यांचा एकांत सत्य, निर्भय वृत्ती, सेवाभाव, सत्याग्रही समाजवाद, अहिंसा, नैतिकता या जीवनमूल्यांवर दृढ निष्ठा ठेवून लोकांतात जपत ! ते मानवतेवर प्रेम करत अलिप्तपणे जगले. त्यांनी साहित्याभिरुची जपली. ते मित्र-नातेवाईक-परिवार यांच्याशी जोडलेले राहिले, पण कशातही गुंतून पडले नाहीत...

डबीर यांची गझलगाथा (Dabir – Marathi Gazal Writer)

सदानंद डबीर हे आजच्या काळातले मराठीतील महत्त्वाचे गझलकार मानले जातात. माझा-त्यांचा त्यांच्या पहिल्या 'लहेरा' संग्रहापासूनचा परिचय. ते त्यावेळी रेल्वेत इंजिनीयर म्हणून नोकरी करत होते. परंतु कविता, विशेषत: गझल हे त्यांचे वेड वाढत गेले.

जन्मशताब्दी साजरी होत असलेल्या व्यक्ती (Janmashatabdiveer)

मी, माझा सहकारी राजेंद्र शिंदे आणि विनय नेवाळकर, आम्ही त्या तिघांच्या जन्मशताब्दीचा विचार करताना वेगळीच कल्पना लढवली. गेल्या शतकातील व या शतकाच्या पहिल्या काही दशकांत सामाजिक-सांस्कृतिक जीवन घडले गेले ते ढोबळपणे 1900 ते 1930 या काळात जन्मलेल्या महनीय व्यक्तींच्या संस्कारांतून. त्यांच्याच जन्माची शंभर वर्षे विद्यमान ज्येष्ठ जनांना महत्त्वाची वाटत आहेत व तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जावा असेही वाटत आहे.
-bebitai-

वाचन व विकासाच्या प्रसारक!

अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’! त्या गावातील साध्या,...
gazal

गझल विधेची उपेक्षा मराठी वाङ्मयात का?

सुरेश भट यांच्यानंतरच्या पहिल्या फळीतील समग्र रचनाकारांनी भट यांच्या शैली व भाषा यांचे अनुकरण केले. त्यांतील काहींच्या गाजलेल्या गझला सुरेश भट यांच्याच वाटतात... गझल हा...
_Kusumakar_2.jpg

कवितेचे कुसुमाकर (Kusumakar)

1
मराठीत नियतकालिके अनेक प्रकाशित होत असतात. काही नियतकालिके काळाच्या ओघात बंद पडली; काही नवी सुरू होतात, तरी हाताच्या बोटांवर मोजता येणारी ठरावीक नियतकालिके संपादक-मालक...