Home Search

बदनापूर - search results

If you're not happy with the results, please do another search

बदनापूर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचे ध्येय…! (Devesh Pathrikar aims to have Badnapur cataract free)

0
देवेश पाथ्रीकर हे आहेत बदनापूर येथे मानसशास्त्राचे प्राध्यापक, पण त्यांनी वसा घेतला आहे तालुका मोतिबिंदू मुक्त करण्याचा. ते तालुक्यातील गावोगावी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून राहिले आहेत. डोळ्यांचा रोगी सापडला, की ते त्याला जरुरीप्रमाणे ‘औषधी-ड्रॉप्स’चे विनामूल्य वाटप करतात अथवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलात नेतात. त्यांचा प्रत्येक आठवड्याचा कार्यक्रम लागलेला असतो. त्यात मोतिबिंदूचे निदान असलेल्या रूग्णांवर थेट मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना घरपोच सोडले जाते...

दावलवाडी : जालना-बदनापूर जवळची संपन्नता

दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे...

बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्राची वाटचाल

बदनापूर संशोधन केंद्र हे अखिल भारतीय कडधान्य सुधार प्रकल्पातील एक प्रमुख केंद्र आहे. हे केंद्र जालना जिल्ह्यात येते. त्याचा कारभार मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालतो. तेथे महाराष्ट्रातील महत्त्वाची कडधान्ये, विशेषत: तूर, मूग, उडीद आणि हरभरा या पिकांवर संशोधन केले जाते...

कडधान्य संशोधन : बदनापूर कृषी संशोधन केंद्रातील कामगिरी

0
कडधान्य पिकांचे मानवी आहारात महत्त्वाचे स्थान आहे. कडधान्य हा प्रथिने पुरवणारा मुख्य व स्वस्त स्रोत आहे. कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वीस ते पंचवीस टक्के आहे. शरीराची होणारी झिज भरून काढण्यासाठी प्रथिनांची नितांत आवश्यकता असते. कडधान्य पिकांमध्ये खनिजे व जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असल्याने समतोल आणि पौष्टिक आहार म्हणून उपयोग होतो...

बदनापूर तालुका: महाराष्ट्राचा मध्य

बदनापूर हा जालना जिल्ह्यातील एक तालुका. बदनापूर हे जालन्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. जालना जिल्हा मोसंबी फळासाठी राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात कडधान्याच्या वेगवेगळ्या जातींची बियाणी यांबाबत संशोधन चालते. त्या संशोधन केंद्राचे नाव कृषी क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते...

भरडधान्य वर्ष : काय साधणार ?

संयुक्त राष्ट्र संघातर्फे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून 2023 हे साल पाळले जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हा निर्णय भारत सरकारच्या सांगण्यावरून घेतला आहे. भारत सरकारने त्या पूर्वी, 2018 हे साल भरडधान्य वर्ष म्हणून पाळले होते. ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या डाळीच्या प्रकारातील धान्यांचा समावेश भरडधान्यात होतो...

अचलपूरचे कृषिधन – कपाशी ते केळी-संत्री

अचलपूर तालुक्याच्या शेतीतील गेल्या साठ वर्षांतील बदल शेतीशास्त्राप्रमाणेच समाजशास्त्रीय दृष्ट्यादेखील अभ्यासण्यासारखे आहेत. अचलपूरला कपास हे तसे पारंपरिक रोकड उत्पादन होतेच. अचलपूरचा कापूस उत्तम प्रतीच्या वस्त्रप्रावरणांसाठी जगभर प्रसिद्ध होता. साठ वर्षांतील ठळक बदल म्हणजे त्या कपाशीबरोबर केळी, मिरची व संत्री या पिकांनीही अचलपूरला नवी ओळख दिली आहे. त्यातून तालुका समृद्ध होत आहे व तरुण पिढी शेतीकडे पुन्हा वळत आहे...

दुर्लक्षित तीर्थक्षेत्र – देवदरी

0
नांदखेडा हे गाव बदनापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आहे. तेथील देवदरी हे बदनापूर, फुलंब्री व औरंगाबाद या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेले चौदाव्या शतकातील महादेव मंदिर आहे. ते निसर्गाच्या कुशीत व डोंगरांच्या रांगेत वसलेले आहे. मात्र मंदिर दुर्लक्षित आहे, कारण ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्याचा विकास झालेला नाही...

किन्होळा : जालन्यातील शिक्षकांचे गाव

किन्होळा हे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावामध्ये जवळजवळ पस्तीस व्यक्ती शिक्षक या पदावर असून ‘शिक्षकांचे गाव’ अशी या गावाची ख्याती पंचक्रोशीत आहे. मात्र असे शैक्षणिक वातावरण गावात कशामुळे निर्माण झाले हे सांगता येत नाही. पण यांतील बरीच घरे दोन पिढ्या तरी शिक्षकी पेशात आहेत. गावाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे...

किन्होळा गावचा स्वामी विवेकानंद आश्रम

चाळीस वर्षांचे जालन्याचे शिक्षक नारायण कौतिकराव भुजंग हे विवेकानंदांचे वाङ्मय वाचून प्रेरित झाले आणि त्यांनी त्यांच्या किन्होळा या गावी स्वामी विवेकानंद आश्रम काढला. त्यासाठी स्वत:ची तीन एकर जमीन दिली आणि केंद्र चालवण्यासाठी ते दरवर्षी पस्तीस-चाळीस हजार रुपये खर्च करतात. किन्होळा हे गाव बदनापूर तालुक्यात आहे...