Home Search

पूजा - search results

If you're not happy with the results, please do another search

व्यंकटेश स्तोत्र : एकशेआठ ओव्यांची विष्णुपूजा

0
व्यंकटेश स्तोत्र आहे अवघ्या एकशेआठ ओव्यांचे. ते देविदासाने रचले. देविदास स्वतः त्या रचनेला ‘प्रार्थनाशतक’ असे म्हणतो. त्यांतील पहिल्या पाच ओव्या या नमनाच्या आहेत. नमन आहे गणपती, सरस्वती, देविदासाचे गुरू, संत व मुनिजन आणि साक्षात श्रोते यांना. तसेच, अखेरच्या सात ओव्या या स्तोत्राची महत्ता सांगणाऱ्या आहेत...

शिवाची रूपे, त्याची मंदिरे आणि त्याची पूजा (Sect of Shaiva and it’s Traditions)

0
सृष्टी शिवाने निर्माण केली. शिवाचे स्वरूप मानवासारखे नाही. शिवाची दोन रूपे स्वरूप व तटस्थ अशी आहेत. शिवहा पती असून त्याला हर, ईश, नाथ, नंदी इत्यादी नावाने ओळखले जाते. कुंभार घटनिर्मितीसाठी काठीद्वारे चाक फिरवून निर्माण झालेल्या गतीचा, शक्तीचा साधन म्हणून उपयोग करतो, तशी सृष्टीसाठी माया व प्रकृती असते.

इंद्र – प्रतिमा आणि पूजा (Worshipping Indra)

उच्चस्थान गाठणे सोपे – राखणे अवघड! इंद्रपूजा हा प्रकार एकेकाळी नित्य होता; तो दुर्मीळ झाला आहे. इंद्रदेवाचे वर्णन तो स्वर्गाचा अधिपती आहे; त्याची ती इंद्रसभा... तीत तो मेनका-रंभा-उर्वशी आदी अप्सरांच्या गायन-नृत्याच्या मैफलीत रमणारा, मद्यपान करणारा, विलासी स्वभावाचा,
_Ravan_1.jpg

रावणाची पूजा की त्याचे दहन?

0
रावणाच्या पुतळ्याचे दहन दसऱ्याला करावे की नाही याबाबत, रावणचरित्रावर आधारित गाजत असलेली ‘रावण - राजा राक्षसांचा’ ही कादंबरी लिहिणारे शरद तांदळे यांचे म्हणणे असे...
_devi_9_Avatar_1.jpg

नवरात्र : देवीच्या नऊ अवतारांची पूजा

हिंदू धर्मात सणवार आणि व्रतवैकल्ये यांची योजना ऋतुमानानुसार केली गेली आहे. त्याचप्रमाणे कुळधर्म-कुळाचारांचीही आखणी निसर्ग, ऋतू, ग्रह-नक्षत्रे यांच्या स्थितीनुसार आणि प्राचीन पौराणिक संदर्भांनुसार करण्यात...
_Satyanarayanachi_Puja_1.jpg

सत्यनारायणाची पूजा बंद!

सत्यनारायणाच्या पूजा श्रावण महिन्यात सगळीकडे आयोजल्या जातात. तशीच ती पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात झाली. त्यास विरोध झाला. त्यामुळे पूजा चर्चेत आली. कोणी घरगुती पूजा करत...

श्रीदेव केदारलिंग : पाचलचे ग्रामदैवत

केदारलिंग हे पाचलचे ग्रामदैवत. पाचल हे कोकणच्या राजापूर तालुक्यातील गाव. केदारलिंग मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. पाचल गाव कोंड-दिवाळवाडी रस्त्यावर येते. मंदिर रस्त्यालगत दाट वनराईत वसलेले असे आहे -लाकडी, कौलारू आणि टुमदार. मंदिराच्या डाव्या बाजूला ‘ब्राह्मण देवराई’ आणि मागील बाजूला ‘रामेश्वर देवराई’ आहेत. केदारलिंग हे शंकराचे देवस्थान. पण त्या देवळात गाभारा किंवा पिंडी नाही. देवळाला कळस नाही. देवळात पुरातन पाषाणमूर्ती विराजमान आहे. आसनस्थ पाषाण मध्यभागी; केदारलिंग देवाच्या उजव्या बाजूला धनीणबाय, रामेश्वर, कालकादेवी, पावणादेवी, देवाच्या डाव्या बाजूला नवशादेव, ब्राह्मणदेव, ईठलादेवी, नवलादेवी आणि समोर खाली गणपती...

गुडघे गावचा ग्रामोदय

दाभोळच्या खाडीजवळ डोंगरावर वसलेल्या ‘गुडघे’ गावाची कुळकथा इतिहासाशी जोडलेली आहे. दांडेकर हे घराणे मूळ रत्नागिरीजवळील दांडेआडोमचे. त्यांचे मूळ आडनाव पोंक्षे होते. जेथे गूळ तयार होतो ते गुडग्राम, त्याचा अपभ्रंश होऊन गुडघे हे नाव पडले असावे. भूगोलाच्या नकाशावर किंवा इतिहासाच्या पानांवर या गावची नोंद काळाने केली नाही. दांडेकर कुलभूषण दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) यांनी ‘पडघवली’ या नावाने मराठी माणसाला तो गाव परिचित करून दिला. त्यांच्या ‘पडघवली’, ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘काका माणसात येतो’, ‘तांबडफुटी’ या साहित्यकृती त्याच गावातील होत...

वाटूळ ! (Watul Village)

विराज चव्हाण यांनी सध्याच्या वाटूळ या गावाची माहिती दिली आहे. त्यासोबत प्राची तावडे यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले गाव, त्या गावच्या रम्य आठवणी असा लेख लिहिला आहे. त्या लेखाची लिंक सोबत जोडली आहे. तुम्हीही तुमच्या गावाची ललित पण वस्तुनिष्ठ माहिती ‘गावगाथा’ दालनाद्वारे जगभर पोचवू शकता. वाटूळ हे नाव वाचताना जरा वेगळे वाटते ना? वाटूळ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सुंदर गाव आहे. ते मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचा आकार भौगोलिक दृष्ट्या गोलाकार आहे, म्हणून ते वाटूळ ! त्या बाबत दंतकथाही आहेच...

मनुष्यजीवनाला आकार देणारा संस्कार – मौंजिबंधन

2
पुण्याचे पाटणकर यांच्या कंपनीने मुंजीचा ‘इव्हेंट’ साजरा करण्याची योजना आखून तसे समारंभ घडवण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक देशीविदेशी पालक त्या योजनेचा लाभ घेत आहेत. पुण्याच्या सकाळ वृत्तपत्र समूहानेदेखील सर्व जातिधर्मांसाठी मुंजविधी करण्याची चळवळ जाहीर केली आहे. पाटणकर कंपनीने ‘व्रतबंध- एक विद्याव्रत’ या नावाचे प्रदर्शन पुण्यात दोन वर्षांपूर्वी योजले होते. त्याचे उद्‍घाटन अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात ठासून हेच सांगितले, की मुंज हा विधी धार्मिक व काही जातींपुरता मर्यादित नाही. तो सर्व मुलांसाठी संस्कार म्हणून आवश्यक आहे. शिवाजीराजांचा मुंजविधी काय परिस्थितीत केला गेला त्याचेही वर्णन लेखात आहे...