Home Search

जयपूर - search results

If you're not happy with the results, please do another search

अचलपुरात जयपूरच्या राजा मानसिंग यांची समाधी

माणसाचे आयुष्य त्याला कोठे घेऊन जाईल, काहीच सांगता येत नाही. सम्राट अकबराच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यात ज्या राजा मानसिंग यांचा सिंहाचा वाटा होता, त्या मानसिंग यांच्या आयुष्याची अखेर विदर्भातील अचलपूर या एका छोट्या शहरात झाली. मानसिंग अकबराच्या नवरत्नांपैकी एक मानले जात...

गौडमल्हार म्हणजे प्रेमाचा पाऊस ! (Classical Gaud Malhar Is Full of Love !)

गौडमल्हारचा परिचय तसा उशिराच झाला ; पण पहिल्या श्रवणापासून जिवाभावाचा बनलेला तो खास आवडता राग ! किशोरी यांची स्वरचित ‘बरखा बैरी भयो’ ही रचना माझ्या सर्वाधिक प्रिय रचनांपैकी एक ! त्यातील ‘जाने ना देत मोहे पी की नगरिया’ या ओळीतील भाव थेट हृदयाला भिडणारा आहे. त्यामधून प्रत्येकाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यातील असा क्षण आठवेल, की प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकली नाही याची हुरहूर मनाला लागून राहील. भावनांचे किती असे नाजूक पदर ...

बहुरंगी, बहुढंगी तोडी

आमच्या शाळेतील काळाची गोष्ट. सोऽहम हर डमरू बाजे | उसके सुर तालोंके | सुखकारक झूले पर | झूम रहे सरिता सर | भुवनत्रय गाजे... चौथीचा वर्ग आणि आमच्या वर्गातील नेहा गुरव हे नाट्यगीत म्हणत होती. मुले भान हरपून ऐकत होती. त्या सुरांची जादूच अशी होती, म्हणा ! नंतर तिने सांगितले की या रागाचे नाव तोडी ! तोडीशी पहिली ओळख झाली ती अशी ! नेहा ही एक व्यावसायिक आणि उदयोन्मुख शास्त्रीय गायिका झाली आहे. तोडीने तेव्हा मनात जागे केलेले कुतूहल आणि आकर्षण माझ्या मनात तसेच आहे; किंबहुना वाढतच चालले आहे ! जसे आकर्षण आहे, तशी थोडी भीतीदेखील ! त्याचे कारण असे की मी तोडीचे सूर जेव्हा पहिल्यांदा लावण्याची वेळ आली तेव्हा ते काही केल्या जमेचना...

भैरवाचे विस्तीर्ण अंगण !

महादेवाचे नाव असलेला भैरव हा राग महादेवासारखाच अनादी अनंत आहे. त्याला आदिरागही म्हटले जाते; कारण मूळ सहा रागांपैकी सर्वात आधी भैरव निर्माण झाला, असेही म्हणतात. त्यामुळेच की काय, गाणे शिकणाऱ्यांकडून सुरुवातीला गळ्याच्या तयारीचा रियाज हा भैरव रागाचे तान, पलटे व अलंकार घोटून घेऊन करवला जातो. अनेक गुरु-शिष्य परंपरांमध्ये पहिला राग किंवा पहिली शिकवलेली बंदिश ही भैरव रागात असते. इतका प्रचलित, सर्वश्रुत राग असूनदेखील मैफलीतील सादरीकरणात भैरवाचे प्रमाण इतर रागांच्या मानाने कमी आढळते...

नादसागर मालकंस (Melodic Malkansa)

शास्त्रीय संगीतातील रागांचा परिचय करून देणाऱ्या लेखमालेत डॉ. सौमित्र कुलकर्णी ‘मालकंस’ या लोकप्रिय आणि कलाकारप्रिय रागाविषयी माहिती देत आहेत. हा राग गाण्याची वेळ मध्यरात्र ही आहे. मध्यरात्रीच्या महासागरासारखा, प्रशांत आणि धीरगंभीर असलेला हा राग माहीत नसतानाही त्यावर आधारित संगीतरचना मनाला मोहिनी घालतात. थोडासा परिचय झाला तर त्या आनंदात भरच पडेल. दिग्गज कलाकारांनी गायलेल्या या रागातल्या बंदिशींच्या यू-ट्युब लिंक सोबत दिल्या आहेत, रागाचा परिचय होण्यासाठी त्यांची मदत होईल...

अनाहत शंकरा (Raga Shankara)

अनाहत या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे, स्वयंभू, ज्याच्यावर कसलाही आघात झालेला नाही असा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला शंकरा हा राग हा असाच एखाद्या स्वयंभू, बलदंड खडकाप्रमाणे आहे. या रागाची माहिती करून देत आहेत डॉ. सौमित्र कुलकर्णी. शास्त्रीय संगीताविषयीच्या त्यांच्या लेखमालिकेतला हा चौथा लेख...

मधुवंतीची मोहिनी (Raga Madhuvanti)

डॉ. सौमित्र कुलकर्णी यांची शास्त्रीय संगीताविषयीची मालिका सुरु करण्यामागचा उद्देश शास्त्रीय संगीतातले बारकावे विशद करून सर्वसामान्य रसिकांना त्याचा  आस्वाद घ्यायला मदत करावी, हा होता....

सचिन भगत – शेतकऱ्याचे चित्त नाण्यांच्या नवीनतेत ! (A farmer with a heart for...

फलटणच्या शिंदेवाडीचे सचिन भगत कसतात शेती. पण त्यांची एक बारीक नजर असते ती त्यांच्या नाणेसंग्रहावर ! मगध-देवगिरी-यादव-मोगल अशी, विविध साम्राज्यांची आणि विविध काळांची नाणी त्यांच्या संग्रही आहेत. त्यातील एक विभाग अर्थातच शिवराई नाण्यांचा - त्याबद्दल बोलताना सचिन भावुक होतात आणि क्षणात त्यांचे बोलणे मराठेशाहीबद्दलच्या अभिमानाने भरले जाते...

शेवगाव पक्षी निरीक्षणातील कॅमेऱ्यात मगरीचे शेपूट

पैठणचे जायकवाडी धरण शेवगावपासून (नगर जिल्हा) अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथे हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी येत असतात. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आवश्यक ती भौगोलिक परिस्थिती शेवगावापासून हाकेच्या अंतरावर तयार झाली आहे. तिचा लाभ सभोवतालच्या खेड्या-शहरांतील लोक आनंदाने घेत असतात. खरे तर, नाथसागर जलाशयाचा सर्व भाग हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे...

अचलपूर नगरी- ऐतिहासिक वास्तू

अचलपूर म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली आणि एकेकाळी विदर्भाची म्हणजेच वऱ्हाडची राजधानी हे बिरुद मिळवणारी नगरी ! त्यामुळे त्या नगरीत विविध वंशांच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात अनेक वास्तू बांधल्या. त्या शिल्प-स्थापत्यांमध्ये मंदिर स्थापत्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा अशी काही मंदिरे आहेत. त्यामध्ये केशव नारायण मंदिर, कार्तिकेय मंदिर, देवी मंदिर यांचा उल्लेख करता येईल...