Home Search

ग्रंथ - search results

If you're not happy with the results, please do another search

ग्रंथालये नव्हे, सांस्कृतिक केंद्रे ! (Book Libraries will be cultural Centers)

पुस्तकांचा संग्रह आणि त्यांची देवघेव करण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय, एवढाच विचार लोकमानसात असतो. परंतु बदलत्या काळ-परिस्थितीत ग्रंथालयांना तेवढेच कार्य करून पुरेसे ठरणार नाही. त्यांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागेल. तेथे केवळ वाङ्मय नव्हे तर विविध विद्याशाखांचा पाठपुरावा करावा लागेल- वेगवेगळी माध्यमे वापरावी लागतील- ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे त्यांचे मुख्य कार्य राहील असा अभिप्राय चिपळूण येथे ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ आणि ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांनी आयोजित केलेल्या ‘ग्रंथालय मित्र मंडळ’ मेळाव्यात व्यक्त झाला...

अर्थशास्त्राचे आद्य चार ग्रंथ (The first four books of Economics In Marathi)

मराठीतील अर्थशास्त्राविषयीचे पहिले चार ग्रंथ 1843 ते 1855 या दरम्यान, म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धापूर्वी आणि कंपनी सरकारचा अंमल जाऊन ब्रिटिश पार्लमेंटचा भारतावर अंमल येण्याआधी लिहिली गेली आहेत. मुंबई विद्यापीठ 1857 साली स्थापन झाले. त्यापूर्वी मराठीतून ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी निसर्गविज्ञानाची व मानवविज्ञानाची पुस्तके लिहिणारे लेखक त्यांच्या काळातील ज्ञान मराठीतून लोकांना देत होते ! या चार ग्रंथांमध्ये अर्थशास्त्राविषयी मांडलेले विचार, त्या काळात मराठी वाचकांना फार नवे होते...

शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ

शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे...

दादांच्या स्मृतिग्रंथात शालिनीताई अनुपस्थित !

वसंतदादा हे असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतेच, पण शालिनीताई यांचेही कार्यकर्तृत्व स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागेल. त्या महाराष्ट्रातील एक माजी मंत्री, माजी खासदार व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकात असणे आवश्यकच होते...

गोष्ट फलटणमधील दीडशे गाव-ग्रंथालयांची (Rural School Libraries to Promote Reading)

गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिद्ध करू पाहत आहे, की लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली, की मुले वाचनाला, पर्यायाने पुस्तकाला चिकटून राहतात. त्यांच्या हातात येणारी पुस्तके सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषयांची असतील तर पुस्तकांशी जोडली जातात. अन त्यांना मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली, की ती कल्पनेत रमतात, व्यक्त होऊ लागतात आणि हीच किमया आहे, पुस्तकांच्या दीडशे गाव-ग्रंथालयांची…
-मासोलास

मानसोल्लास ग्रंथातील पाकशास्त्र

राजा सोमेश्वर हा पश्चिमी चालुक्य कुळातील राजा. त्याने इसवी सन 1127 मध्ये (बारावे शतक) राज्यकारभार स्वीकारला. राजा सोमेश्वर याला ‘भूलोकमल्ल’ आणि ‘सत्याश्रयकुलतिलक’ अशी दोन...
_Daya_Pawar_3.jpg

बलुतंची चाळिशी आणि ग्रंथालीची सार्थकता

एखाद्या साहित्यकृतीची पंचविशी-चाळिशी-पन्नाशी किंवा शतक महोत्सव साजरा होण्याचे भाग्य जगात फार कमी साहित्यकृतींच्या वाट्याला आले आहे. मराठीत तर ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे....
_Granthamudran_1.jpg

ग्रंथमुद्रण

भारतात पहिला छापखाना गोव्याला 1556 मध्ये आला. तेथून भारतात मुद्रणयुग अवतरले. भारतीय भाषांतील मजकूर रोमन लिपीत छापण्याचे काम सुरू झाले. फादर स्टीफन्स यांचा ‘ख्रिस्तपुराण’...
carasole

साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय – सोमवार ग्रंथप्रेमाचा!

ग्रंथालयांचे, वाचनालयांचे अस्तित्व हे शहरात सांस्कृतिकपणा जिवंत असल्याचे लक्षण असते. त्यात ते ग्रंथालय दुर्मीळ संदर्भग्रंथांनी समृद्ध असेल तर मौल्यवान पाचू, माणके, हिरेच त्या शहराने...
carasole

‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे

7
नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे विनायक रानडे. ते प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि वाचनालय समितीचे अध्यक्ष आहेत. रानडे हा माणूसच अवलिया आहे. त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’...