Home Search

गांधी - search results

If you're not happy with the results, please do another search

राहुल गांधी यांचे महत्त्व सद्यस्थितीत आहे काय?

राहुल गांधी यांनी त्यांच्या आयुष्याशी जोडलेले सारे गौरवास्पद संदर्भ त्यांच्या समर्थनासाठी किंवा प्रचारासाठी वापरण्यास कायम नकार दिला. ही एकच गोष्ट आत्ताच्या सत्तेसाठी भिंत बनून उभी आहे. हिंदुत्वाला उत्तरेत उधाण आलेले असताना दक्षिणेने सातत्याने प्रागतिक भारतीयत्वाला स्वीकारलेले दिसून येते...

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...

टिळक-गांधी आणि त्यांचा निर्भयतेचा वारसा

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा वारसा महत्त्वाचा आहे. लोकमान्यांनी स्वतंत्र देशात जगण्याचा लोकांना अधिकार आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवून देशाचे स्वातंत्र्य हे महत्त्वाचे मूल्य प्रस्थापित केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांचा आग्रह हा देशाच्या भावी घटनात्मक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग ठरला. गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यासाठी स्वावलंबन यांचा पुरस्कार केला. गांधीजींचा दुसरा मूल्यसंस्कार हा समतेचा आहे. गांधीजींचा आग्रह धर्म हा लोकांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक व्यवहारातून बाजूला ठेवावा हा होता...

फ्रेनर ब्रॉकवे आणि सोलापूरची गांधी टोपी

‘सत्याग्रहा’ची विलक्षण देणगी महात्माजींनी जगाला दिली ! त्यामुळे हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळीचे पाठीराखे जगभर निर्माण झाले. साम्राज्यशाहीने अमानुष जुलुमाच्या जोरावर हिंदुस्थानाला पारतंत्र्यात जखडून ठेवले होते...

कोबाड गांधी यांची स्वातंत्र्य गाथा

‘डून स्कूलमधून शिक्षण घेतलेला, लंडनमध्ये राहून आलेला मोठा नक्षलवादी नेता’ अशी प्रतिमा असलेल्या कोबाड गांधी यांचे 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे आत्मकथन म्हणजे एका हुशार व प्रामाणिक माणसाची ध्येयवादी वास्तवदर्शी कहाणी आहे !

पापक्षालनासाठी गांधीजींना करावे लागले गोदास्नान! (Gandhiji had bath in Nasik river Godavari as mark...

0
महात्मा गांधी अन् नाशिक यांच्यातील नातं अनोखं आहे. बॅरिस्टर झाल्यानंतर त्या महात्म्याला जातीत घ्यायचं की नाही, यावर त्यांच्या गावी पोरबंदरला जातपंचायतीत झगडा सुरू होता. कुटुंबाचा आग्रह जातीत पुन्हा प्रवेश मिळावा असा होता. म्हणून त्या महात्म्याला 1891 मध्ये गोदावरीत स्नान करावं लागलं होतं. मोहनदास हे महात्मा होण्याच्या प्रवासातील बंडाची ती पहिली ठिणगी नाशिकच्या गोदाकाठावर त्यांच्या मनात भडकली होती...

कथा कोल्हापूरातील पोलिश आश्रितांची – गांधी नगरची (Polish migrants during II world war in...

हिटलरचा प्रभाव पोलंड, हंगेरी, झेकोस्लाव्हाकिया वगैरे देशांत वाढू लागला तसतसे तेथील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने स्थलांतरित झाले व दोस्त राष्ट्रांच्या आश्रयाला आले. इंग्लंडच्या आश्रयास आलेल्या पोलिश लोकांना भारतात आणून त्यांची व्यवस्था कोल्हापूरजवळ वळिवडे कँपात केली गेली. जो परिसर आता गांधीनगर म्हणून ओळखला जातो...

महात्मा गांधीजी आणि व्यंगचित्रे (Gandhi in World Cartoons)

भारतीय गूढ तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला नेहमीच भारून टाकले आहे; तसेच, कुतूहल भारतीय जादूटोणा, तांत्रिक-मांत्रिक, साधू-फकीर यांनी तेथे निर्माण केले आहे. अखिल आधुनिक पाश्चिमात्य जगावर मोहिनी घालणारा खराखुरा ‘नंगा फकीर’ म्हणजे मोहनदास करमचंद गांधी! महात्माजींना ‘नंगा फकीर’ ही पदवी दिली, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे अशा इंग्लंडच्या अत्यंत प्रभावी पंतप्रधानांनी, म्हणजे चर्चिल यांनी...
_Lala_Lajpat_Rai_Gandhi_1.jpg

लाला लजपत राय महात्मा गांधींबद्दल लिहिताना…

महात्मा गांधी आणि त्यांनी सुरू केलेली असहकराची चळवळ यांबद्दल भलभलती विधाने आणि वस्तुविपर्यास करून विलायतेतील पत्रांनी त्या दोहोंवर इतके तोंडसुख घेतले आहे, की त्यातील...
_GandhiNavacheGugha_1.jpg

गांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील

महात्मा गांधींच्या मृत्यूला सत्तर वर्षें झाली. म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या दोन पिढ्या होऊन गेल्या. गांधी नावाचे गूढ किंवा गांधी नावाचे गारुड अजून कायम...