Home Search
कलाकृती - search results
If you're not happy with the results, please do another search
करवंटीपासून कलाकृती – सुनील मोरे यांचे कसब
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा येथील सुनील मोरे या उपक्रमशील शिक्षकाने त्याच्या हस्तकौशल्यातून नारळाच्या टाकाऊ भागातून एकापेक्षा एक असे सुंदर कलाविष्कार घडवले आहेत. मोरे यांनी तयार...
कुशल अभिनेत्री स्मिता पाटील
स्मिता पाटील या अभिनेत्रीने तिच्या केवळ एकतीस वर्षांच्या आयुष्यातील, दहा वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत पार फ्रान्स या देशाच्या नभांगणापर्यंत तिच्या उत्तुंग अभिनयाचे चांदणे नेले, हे लोकविलक्षण कर्तृत्व होय. तिची भूमिका समजून घेण्याची कुशाग्रता आणि भूमिकेची अभिनय कुशल बुद्धिवान मांडणी ही बलस्थाने होती...
सरोजिनी वैद्य : संशोधनाची नवी वाट
सरोजिनी वैद्य या लेखक व समीक्षक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. एकोणिसाव्या शतकात जेव्हा संशोधन सामग्री अपुरी होती, त्या काळात संशोधनाच्या नव्या वाटा धुंडाळून त्यांनी भोवती वलय नसलेल्या व्यक्तींवर लिहून त्यांचे कार्य प्रकाशात आणले. त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक विचारांची घुसळण आत्मीयतेने शब्दबद्ध केली. ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी सरोजिनी यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा या लेखात घेतला आहे...
भारतीय संस्कृती तलावांकाठी वाढली! (Water supply lakes and tanks is a special feature of...
स्थलांतर करावे लागू नये म्हणून भारतीय पूर्वजांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी उंचावर, पठारांवर तलावांची निर्मिती करून ठेवली. त्या ठिकाणी पाणी साठवून, त्या त्या ठिकाणच्या प्राणी जीवनाला, मानवी जीवनाला आधार दिला. भारत देशात पाच लाख खेडी होती, म्हणजे साधारणतः प्रत्येक गावाला कमीत कमी दोन तलाव होते! भारतीय जीवन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तलावांच्या काठी वाढलेले आहे...
सावंतवाडीतील लाकडी रंग-रेषा व बाजारपेठ (Wooden Toys of Sawantwadi – Worldwide Market)
सावंतवाडीची लाकडी खेळणी ही किमया तेथील संस्थानाची, तो सुमारे चारशे वर्षांचा इतिहास आहे. सावंतवाडी गाव लाकडी खेळणी, रंगकाम, गंजिफा इत्यादींसाठी प्रसिद्ध झाला. लाकडी भाज्या आणि फळे यांतील जिवंतपणा हे या खेळण्यांचे वैशिष्ट्य. राजाश्रय व लोकाश्रय यांमुळे ती कला वैभवाच्या शिखरावर पोचली…
माझा संगीत सत्संग
संगीत हे क्षेत्र व्यापक, विस्तीर्ण आहे, ते मानवनिर्मित आहे; त्यात साक्षात्कारी क्षण/अनुभव असले तरी ते माणसांनी अनुभवलेले असतात आणि त्यांनीच ते आत्मसात करून गळ्यातून/वाद्यांमधून प्रथमतः स्वतःच्या आनंदासाठी आणि परिणामस्वरूप म्हणून श्रोत्यांशी तो आनंद वाटून घेण्यासाठी साकारलेले असतात...
नटसम्राट – एक प्रतिक्रिया
- वि.वा.शिरवाडकर आणि त्यांनी लिहिलेले ‘नटसम्राट’ हे नाटक या दोहोंबद्दल अपार भक्तिभाव मराठी प्रेक्षकांच्या मनात दिसतो. पण बरेचदा नाटकाचीच मोजपट्टी लावून नटसम्राट चित्रपटाचे मूल्यमापन केले जाते आणि घोटाळा तेथेच होतो...
शालेय शिक्षणक्रमात नैतिक मूल्ये !
समाजात गुन्हेगारी वाढू नये याकरता मुलांना शालेय वयापासून नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे असे म्हणणे कोल्हापूर येथील कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांचे आहे. ते राष्ट्रपती पदकाने तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित अधिकारी आहेत...
व्यंकटेश स्तोत्र : एकशेआठ ओव्यांची विष्णुपूजा
व्यंकटेश स्तोत्र आहे अवघ्या एकशेआठ ओव्यांचे. ते देविदासाने रचले. देविदास स्वतः त्या रचनेला ‘प्रार्थनाशतक’ असे म्हणतो. त्यांतील पहिल्या पाच ओव्या या नमनाच्या आहेत. नमन आहे गणपती, सरस्वती, देविदासाचे गुरू, संत व मुनिजन आणि साक्षात श्रोते यांना. तसेच, अखेरच्या सात ओव्या या स्तोत्राची महत्ता सांगणाऱ्या आहेत...
आदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)
विजापूरची एक राजकन्या आयेशाबिबी (तिला माँ साहेब असेही म्हणत) मक्केला जाण्यासाठी तिच्या लवाजम्यासह (तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार होते) दाभोळ बंदरात येऊन पोचली. त्यावेळी मुहम्मद आदिलशहाची कारकीर्द तेथे चालू होती. एवढ्या लोकांसह एवढा लांब प्रवास करण्यासाठी लागणारी मोठी रक्कम - लाखो रूपयांची संपत्ती तिच्याकडे होती. परंतु तिने तिचा पुढील प्रवास रद्द केला. त्या रकमेचा सदुपयोग करण्यासाठी मौलवी आणि काझी यांच्या सल्ल्याप्रमाणे दाभोळातच एक छान मशीद उभी करावी असे ठरले. त्या मशिदीचा स्थपती होता कामिलखान...