Home Search

%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3 - search results

If you're not happy with the results, please do another search

श्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक

मराठी वाचकांच्या मनावर 1940 ते 1980 अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने ! त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया वैश्विक केल्या. कोकणातील निसर्ग, तेथील सर्वसामान्य माणसे, संस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नि मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला...

देविका घोरपडे फलटणची सुवर्णकन्या (Phaltan’s Boxer Devika Ghorpade)

देविका घोरपडे बॉक्सिंग स्पर्धेत अकरा सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. देविका इतिहासप्रसिद्ध संताजी घोरपडे यांची वंशज. वारसाहक्काने मिळालेले धाडस व मेहनती वृत्ती हे या सुवर्णकन्येच्या यशाचे गमक आहे...

बाबुराव भारस्कर यांचा निवडणूक चमत्कार!

बाबुराव भारस्कर यांच्यावर गांधीवादाचे संस्कार झाले. ते मातंग समाजातून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोचलेले साठच्या दशकातील पहिले नेते. बाबुराव यांनी वंचित घटकांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले...

राहुल गांधी यांचे महत्त्व सद्यस्थितीत आहे काय?

राहुल गांधी यांनी त्यांच्या आयुष्याशी जोडलेले सारे गौरवास्पद संदर्भ त्यांच्या समर्थनासाठी किंवा प्रचारासाठी वापरण्यास कायम नकार दिला. ही एकच गोष्ट आत्ताच्या सत्तेसाठी भिंत बनून उभी आहे. हिंदुत्वाला उत्तरेत उधाण आलेले असताना दक्षिणेने सातत्याने प्रागतिक भारतीयत्वाला स्वीकारलेले दिसून येते...

वसंतदादा : हृदयस्पर्शी परंतु संदर्भात कच्चे ! (Vasantdada Patil Comemorative Volume – Sensitively Compiled...

‘वसंतदादा’ या स्मृतिग्रंथातील एकतीस लेख राजकारणी दादांमधील ‘माणूसपण’ दाखवणारे आहेत. त्यांच्यातील ‘जिंदादिल माणूस’ टिपणाऱ्या लेखांमधील अनेक प्रसंग वाचताना डोळे पाणावतात. महाराष्ट्रातील 2020 च्या दशकातील राजकारण आणि राजकारणी पाहता त्यांतील...

दादांच्या स्मृतिग्रंथात शालिनीताई अनुपस्थित !

वसंतदादा हे असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतेच, पण शालिनीताई यांचेही कार्यकर्तृत्व स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागेल. त्या महाराष्ट्रातील एक माजी मंत्री, माजी खासदार व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकात असणे आवश्यकच होते...

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...

जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म आवश्यक (Spiritual Rebirth of the World – Need of the Hour)

अन्यायाविरूद्ध न्याय मिळवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. माणुसकी किंवा मानवतावाद आणि राजकारण यांचा पराजय म्हणजे युद्ध. या जगात प्रत्येकाच्या जीवनाला एक अर्थ आहे. तो परस्पर प्रेम, मैत्री व समंजसपणा यांमुळे प्राप्त होतो. अशी नैतिक मूल्ये रुजवण्यास जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म आवश्यक आहे…

‘मर्मभेद’ पुस्तक कोणाचे? .(Who is the author of the book, ‘Marmbhed’?)

‘मर्मभेद’ ही राजकारणाची कटकारस्थाने अशी कथा असलेली कादंबरी. ती मानवी प्रवृत्ती-विकृती, रूपकात्मक-प्रतीकात्मक अशा मांडणीतून उलघडत जाते. कथेची भाषाशैली संस्कृतप्रचुर, जड असली तरी तिच्या भावनानुसारी प्रवाहीपणामुळे वाचकाला संमोहित करत गुंतवून ठेवते...

मुस्लिम लोकसंख्यावाढीची समीकरणे

लेखकाने इस्लाम हा कुटुंबनियोजनाचे केवळ समर्थन करत नाही, तर इस्लामनेच मर्यादित कुटुंबाचा आदर्श सर्वप्रथम दाखवून दिला आणि इस्लाम हाच त्या संकल्पनेचा आरंभकर्ता आहे असे म्हटले आहे व त्याचा तपशील दिला आहे...