Home Search

%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87 - search results

If you're not happy with the results, please do another search

मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत

0
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...

प्रमोद झिंजाडे – विधवा प्रथा निर्मूलनाचे प्रवर्तक (Pramod Zinjade – Modern day social reformer)

प्रमोद झिंजाडे ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती. ते परिवर्तनवादी आहेत. त्यांनी समाजातील अनिष्टतेवर दंड उगारला आणि न्याय्य गोष्टी घडवून आणल्या. त्यांच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या संकल्पनेने विधवा महिलांना आनंदी जीवनासाठी आशेचा किरण दाखवला आहे...

झिंजाडे यांनी जे घडवले ते सर्वत्र पसरले! (Pramod Zinjade-The man who initiated the campaign...

प्रमोद झिंजाडे यांनी विधवा प्रथेतून होणारी स्त्रीत्वाची विटंबना नष्ट व्हावी यासाठी विधवा प्रथा निर्मूलनाची संकल्पना मांडली. नुसती मांडली नाही तर आचरणातही आणली. त्यासाठी त्यांनी करमाळा तहसील कार्यालय येथे जाऊन, त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या पत्नीची सौभाग्यलेणी न उतरता तिला मानसिक आधार द्यावा असे प्रतिज्ञापत्र तयार केले. त्याचेच पर्यवसान हेरवाड ग्रामपंचायतीच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या ठरावात झाले...

विधवा स्त्रियांची उपेक्षा – दोनशे वर्षांचा प्रतिकार! (History of social reforms against ill treatment...

विधवा स्त्रीला समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. त्या या विधवा प्रथेला बळी पडल्या आहेत. त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केले, चळवळीही उभारल्या. परंतु एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी व प्रगतशील समाजात विधवा प्रथेसारख्या जोखडात स्त्री भरडली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे...

ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेचा जाहीरनामा! (What Dnyaneshwar wants to say about Marathi language and it’s...

ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतील सौंदर्यभाव जसा खुलवून सांगितला, तितक्याच महात्म्याने साहित्यातील विवेकमूल्याची निकड प्रतिपादन केली. त्यांच्यानंतरच्या संतपरंपरेने मराठी साहित्याला व विचारविश्वाला विवेकाचा पाया घालून दिला. म्हणूनच सदानंद मोरे त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून ज्ञानेश्वरीमधील बाराव्या अध्यायातील नमनाच्या काव्यपंक्तींना ‘मराठी भाषेचा जाहीरनामा’ म्हणत आहेत…

रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर

न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...

महादू गेणू आढाव… मानवी हक्कांचा आवाज!

महादू गेणू आढाव या संघर्षवादी नेत्याने मानवी हक्कांसाठी लढा देऊन अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा समाजाचे भले करण्याचा इरादा व जातीयवाद्यांशी लढा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. वादी असला तरी, त्याच्या आयुष्याचे नंदनवन करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्यातील सद्हृदयतेचे दर्शन घडवतो...

लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)

वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...

जातीच्या आधारावर आरक्षण हे देशहिताचेच! (Reservation to Benefit Nation)

चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र असे वर्ग आहेत. शूद्रांचे वर्णन शुद्रातिशूद्र असेही केले जाते. कारण त्यांची दयनीय अवस्था. त्यांच्यावर काम सोपवले ते त्रिवर्णाची सेवा करण्याचे. म्हणून ते  गुलाम, दास, अस्पृश्य, वेशीबाहेरचे अस्पर्श्य ठरले.

हरीश सदानी – स्त्रीवादी पुरुष!

मी आकाशवाणीतील  कामाचा भाग म्हणून निराळे काही काम करणारी माणसे शोधायची आणि त्यांच्या कामांना लोकांपर्यंत पोचवायचे असे करत असे. त्या क्रमात हरीश भेटला. हरीश...