Home Search

%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95 - search results

If you're not happy with the results, please do another search

मुर्डी : दापोली तालुक्यातील उद्यमनगरी

दापोली तालुक्यातील मुर्डी हे परंपरा आणि नवता एकत्र असलेले गाव. ते स्वतःचे असे खास अस्तित्व जपत असते. गाव त्याच्याच तोऱ्यात आणि मिजाशीत असते असे म्हटले तरी चालेल. ते छोटेसे टुमदार गाव; डोंगराच्या कुशीत वसले आहे. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या वेळेस मुर्डीत कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. तो खाजगी असला तरी तो सर्व गावाचा वाटावा असे त्याचे स्वरूप सार्वजनिक होते. गावचे खोत, पेंडसे यांची आठ-नऊ घरे गावात राहती होती. खोती प्रतिवर्षी प्रत्येक घरी बदलती असे...

भाषादूत मॅक्सिन बर्नसन

2
मॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे...

श्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक

मराठी वाचकांच्या मनावर 1940 ते 1980 अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने ! त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया वैश्विक केल्या. कोकणातील निसर्ग, तेथील सर्वसामान्य माणसे, संस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नि मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला...

ज्योतिष इतिहासकार शं.बा. दीक्षित

0
दापोलीचे शंकर बाळकृष्ण दीक्षित हे ज्योतिष शास्त्रातील विद्वान गणले जात. त्यांनी कालगणना व कालनिर्णय ह्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. . दीक्षित यांनी रॉबर्ट सेवेल यांच्याबरोबर संयुक्तपणे लिहिलेला इंडियन कॅलेंडर हा इंग्रजी निबंध प्रसिद्ध झाला.पां.वा.काणे यांनीदेखील त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या कामाचा धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याच्या कामी उपयोग झाल्याचे नमूद केले होते...

पंचांग – टिळक की दाते (Lokmanya Tilak Reforms Indian Traditional Almanac)

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे...

निबंधमालेतील भविष्यवेध !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ सुरू केली ती बहुश्रुतता व योग्य पुस्तकांची लोकांना माहिती देऊन मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने. त्यांनी ‘निबंधमाले’तून सकस, वैचारिक आणि दर्जेदार लेखांचे सलग आठ वर्षे लेखन करून 1881 पर्यंत विविध छापखान्यांतून चौऱ्याऐंशी अंक छापून प्रसिद्ध केले. विष्णुशास्त्री यांनी ‘निबंधमाले’तून मनोरंजन न करता लोकजागृती, विचारक्रांती आणि मराठी भाषेची अभिव्यक्ती याची कास धरली...

‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर : व्यक्तिवेध

विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथकार होत. त्यांना ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ ही उपमा दिली गेली. त्यांचे ‘निबंधमाला’ हे नियतकालिक फार गाजले. त्यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले होते. तेवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अजोड आहे...

सविनय कायदेभंग आणि पंढरपूरातील अनुष्ठान

महात्माजींनी चालू केलेली कायदेभंगाची चळवळ, त्यांचा सत्याग्रह यशस्वी व्हावा म्हणून पंढरपूरातील ब्रह्मवृंदाने जाहीर अनुष्ठानास सुरुवात केली! ते अनुष्ठान साम्राज्यशाहीच्या रोषाची पर्वा न करता पंढरपूरमधील दत्तघाटावर पार पडले. गांधीजींची ती चळवळ सर्वसामान्य माणसाला किती त्याची स्वत:ची वाटत होती, याचे हे उत्तम उदाहरण! हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशी घटना तो पावेतो घडली नसावी...

एकोणचाळिसावे साहित्य संमेलन (Thirty Nineth Marathi Literary Meet 1957)

आधुनिक मराठी कवी व चतुरस्त्र लेखक अशी अनंत काणेकर यांची ओळख आहे. विषयाची ओटोपशीर, आकर्षक, ठसठशीत मांडणी व परखड विचारसरणी हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य. काणेकर यांचे व्यक्तिमत्त्व लौकिक जीवनाशी समन्वय साधणारे होते. ते ‘चांदरात’ या संग्रहामुळे मराठी काव्याच्या इतिहासात अजरामर झाले…

अडतिसावे साहित्य संमेलन

अडतिसावे साहित्य संमेलन पंढरपूरला 1955 साली प्रा. शंकर दामोदर पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. पेंडसे संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, तत्त्वज्ञानाचे चिंतनशील पंडित, संतसाहित्याचे निर्माते लेखक, वेदांततीर्थ म्हणून ख्यातकीर्त होते...