Home Search

%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4 - search results

If you're not happy with the results, please do another search

गंधर्वतुल्य गायन करणारे नट – भाऊराव कोल्हटकर

मराठी रंगभूमीवरील गायक नट म्हणून भाऊराव कोल्हटकर हे त्यांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या त्यांनी साकारलेल्या स्त्रीभूमिकांमुळे विशेष गाजले. परंतु पुढे, त्यांनी ‘सुभद्रे’चा अपवाद वगळता 1889 सालानंतर मुख्यत्वे पुरुष भूमिका साकारल्या त्या अखेरपर्यंत. भाऊराव त्यांचा मधुर गळा, त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा उत्तम अभिनय यांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचले…

गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)

भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत व नामवंत साहित्यिक कृ.पां. कुलकर्णी हे ओंड या गावचे सुपुत्र. या गावाची पदवीधरांचे गाव म्हणून ओळख आहे...

विधवा सन्मान ही मलमपट्टी !

0
महिलेला पतीच्या निधनानंतर भेडसावणारी खरी समस्या आर्थिक बाबतीतील असते. तिला अलंकार घालण्याची मुभा देणे ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. एखाद्या सरकारी परिपत्रकामुळे तिच्यावरील अन्यायाची चौकट खिळखिळी होणार नाही. विधवांना आर्थिक स्थैर्य व त्यांचे सांपत्तीक हक्क मिळवून देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष संवाद, प्रसारमाध्यमे, वैयक्तिक वागणुकीची उदाहरणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी समाज परिवर्तनाचे प्रयत्न करावे लागतील...

कालगणनेसाठी पंचांगांचा विकास (Astronomy, Astrology and Religion)

पंचांग ही भारताची संस्कृती आहे. भारतीय पूर्वज आकाश निरीक्षण करणारे, खगोल गणित जाणणारे होते. त्यांनी त्या ज्ञानाचा वापर करून त्यांचे आयुष्य निसर्ग नियमात अधिकाधिक बसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांचे धार्मिक आचरण निसर्गाच्या नियमांधारे आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने जोडले गेले. परंतु धर्मशास्त्रात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. पंचांगकर्ते, धर्मशास्त्र जाणकार, आयुर्वेद तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे येऊन ते बदल केले व तसे सर्वांना समजावून सांगितले तर लोक त्यांचा नक्की स्वीकार करतील...

नर्मदा खोऱ्यातील जीवनशाळा

मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन हे केवळ धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणे, या एका मुद्द्यापुरते सीमित नाही. या आंदोलनातील महत्त्वाची फलश्रुती म्हणजे मेधा पाटकर यांच्या व्यापक शिक्षणविषयक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या जीवनशाळा. ‘लढाई और पढाई, साथ साथ’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या जीवनशाळा आंदोलनाचा प्राणवायू आहेत...

छत्तीसावे साहित्य संमेलन (Thirty Sixth Marathi Literary Meet-1953)

वि.द. घाटे यांचे पुष्कळसे लेखन स्वान्त सुखाय झालेले आहे. त्यांच्या लेखनात त्यांचे उत्कट, पण दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ आणि अभिजात रसिकता यांचा मिलाफ झालेला दिसतो. घाटे यांच्या सुटसुटीत, रसपूर्ण आणि लयदार लेखनशैलीच्या साहित्याने स्वतःचा वेगळा ठसा मराठी साहित्यात उमटवला…

पूर्व आशियातील हिंदू राज्ये व हिंदू संस्कृती (How Hindu empires got spread in Far...

भारतीय लोक विविध कारणांनी फार मोठ्या संख्येने पूर्व आशियात स्थलांतरित होत होते. त्या भागांत गेलेले असे अनेक लोक तेथील स्त्रियांशी लग्ने करून, वसाहत तेथे निर्माण करून राहत. भारतीयांजवळ प्रभावशाली सांस्कृतिक ऐवज होता. त्यामुळे भारतीयांचा बौद्धिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय वरचष्मा सहजगत्या निर्माण होई. कालांतराने पूर्व आशियात हिंदू राज्ये आणि संस्कृती उदयाला त्या वसाहतींमधून आली…

मराठी प्रमाण भाषा व बोली यांची परस्पर परावलंबिता (Spoken languages make language perfect)

प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांतील फरक काय? सर्वसामान्यपणे असे बोलले जाते की प्रमाण भाषा ती असते जी लिहिली आणि बोललीदेखील जाते. बोलीभाषा ही फक्त बोलली जाते.

कोविड -19 च्या संदर्भाने शरद पवार (Sharad Pawar And Disaster Management)

कोविड-19 च्या प्रभावाने सारी जीवनाची गती मार्च 2020 पासून थांबली आहे. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, प्रशासन आणि त्यामुळे नागरिकांची जगण्याची गती मंदावली आहे. कोविड-19 ही आपत्ती नैसर्गिक वा अनैसर्गिक असे रूढ अर्थाने सांगता येणार नाही.

तोरणमाळ: खानदेशचे सौंदर्य! (Toranmal : Hill Station From Khandesh)

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ. महाबळेश्वर हे पहिले. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्याच्या शहाद्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतात आहे. ते धडगाव तालुक्यात येते. ते नंदुरबारपासूनपंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे.