Home Search

%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0 - search results

If you're not happy with the results, please do another search

गंधगान (Whispers on the Wind !)

‘मोगरा फुलला’ हे सदर सुरू करून दोन महिने झाले आहेत. दालन सुरू करताना संवेदना उजागर करणे आणि जाणीवसमृद्धी असे दोन उद्देश समोर ठेवले होते. पंचेंद्रियांना जे जाणवते ते शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आजचा डॉ. मंजुषा देशपांडे यांचा ‘गंधगान’ हा लेख पंचेंद्रियांना जे जाणवते त्यापलिकडे जाऊन अबोध नेणिवेत रुतून बसलेल्या जाणिवांविषयी सांगत आहे. एक ज्ञानेंद्रिय विकल असेल तर इतर ज्ञानेंद्रिये अधिक सजग होतात आणि विकल ज्ञानेंद्रियामुळे आलेले न्यून दूर करण्याचा प्रयत्न करतात...

नवरात्रीतील देवीचे महात्म्य

नवरात्रीतील देवीचे महात्म्य भक्तिभावाच्या अंगाने फारच वाढले असले तरी गावोगावची देवळे प्रसिद्ध आहेत, ती तेथील प्रथापरंपरांमुळे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर अशी सांस्कृतिक माहिती आपण संकलित करत असतो. यांपैकी कोणत्याही लेखाबाबत वाचकांकडे जादा माहिती असेल किंवा कोणत्या नव्या देवस्थानावर सांस्कृतिक महत्त्वाच्या अंगाने लेखन करण्याची इच्छा असेल; तर info@thinkmaharashtra.com या इमेल पत्त्यावर लिहावे वा ‘थिंक महाराष्ट्र’च्या नंबरवर फोन (9892611767) करावा...

नाशिकचे योग विद्या धाम

बाळासाहेब लावगनकर यांनी ‘योग विद्या धाम’ या संस्थेची स्थापना जगभर योगशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने 1960 साली केली. सध्या योगाचार्य विश्वास मंडलिक हे योगशास्त्राचा प्रचार करत आहेत. संस्थेचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. तेथे योग विद्यापीठ व ‘विश्वयोग दर्शन’ हा योग आश्रम बांधला आहे. त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने योगाचे निवासी वर्ग चालतात...

ब्राह्मण कोण ?

0
इंग्रजांनी ब्राह्मण वर्ग कर्मकांडामध्ये रुळलेला, तात्त्विक विवेचन करणारा व केवळ बौद्धिक गोष्टी करणारा असतो, असा गैरसमज पसरवला. पण वास्तवात स्वतः अग्रेसरत्व करणारा असा माणूस ब्राह्मण म्हणून ओळखला जातो. तो सर्व क्षेत्रांमध्ये आहे. प्रत्यक्ष त्या त्या जीवनाच्या अंगाचे धुरीणत्व करणे, त्या क्षेत्राला दिशा देणे, प्रत्यक्ष ते आचरून इतरांना मार्गदर्शन करणे ही ब्राह्मण वर्गाची वैशिष्ट्ये होती...

जगताप सरांचा भर प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर! (Educationist H.N. Jagtap Emphasizes on the Quality Training in...

ह.ना. जगताप हे शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांचा भर अध्यापक महाविद्यालये शिक्षक निर्मितीचे कारखाने न बनता, त्यातून धडपड्या विद्यार्थी हे दैवत मानणारे आणि अभ्यास व वाचन प्रचंड असणारे शिक्षक घडले पाहिजेत, त्यासाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व शिक्षणपद्धत यावर आहे. जगताप यांनी शिक्षक-प्रशिक्षणातील सूक्ष्म अध्यापन, मूल्यमापन पद्धत, मानसशास्त्र व संशोधन पद्धत यांकडे वेळोवेळी लक्ष वेधले आहे…

हेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले! (Herwad Village is charged with reforms for better treatment...

समाजाच्या चौकटी मोडणे सहजशक्य नसते परंतु संपूर्ण गाव एकत्र आले तर काय करू शकते, याचा आदर्श हेरवाडच्या ग्रामस्थांनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव संमत करून घालून दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे. ‘गाव करेल ते राव काय करील’ ही उक्ती हेरवाडकरांनी सार्थ ठरवली आहे...

झिंजाडे यांनी जे घडवले ते सर्वत्र पसरले! (Pramod Zinjade-The man who initiated the campaign...

प्रमोद झिंजाडे यांनी विधवा प्रथेतून होणारी स्त्रीत्वाची विटंबना नष्ट व्हावी यासाठी विधवा प्रथा निर्मूलनाची संकल्पना मांडली. नुसती मांडली नाही तर आचरणातही आणली. त्यासाठी त्यांनी करमाळा तहसील कार्यालय येथे जाऊन, त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या पत्नीची सौभाग्यलेणी न उतरता तिला मानसिक आधार द्यावा असे प्रतिज्ञापत्र तयार केले. त्याचेच पर्यवसान हेरवाड ग्रामपंचायतीच्या विधवा प्रथा निर्मूलनाच्या ठरावात झाले...

कोल्हापूरची शतमानपत्रे : शतकभराचा इतिहास

जी.पी. माळी यांचे ‘कोल्हापूरची शतपत्रे’ हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. गेल्या शतकभरातील 101 मानपत्रे ‘जशी होती तशी’ दिल्याने त्या त्या काळची शब्दकळ व मानपत्रांतील बदलत गेलेली भाषा लक्षात येते. ती मानपत्रे तो सगळा काळ वाचकापुढे उभा करतील. अभ्यासकांना तो फारच मोठा फायदा आहे...

लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)

वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...

कोल्हापूर-मिरज रेल्वेचा आरंभ !

छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्ताने कोल्हापुरात कृतज्ञता पर्व सुरू आहे. त्यानिमित्त अनेकानेक कार्यक्रम होत आहेत. शाहू महाराजांनी कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी करून तो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केला. त्यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आली. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !