Home Search
- search results
If you're not happy with the results, please do another search
परतवाड्याचे सार्वजनिक वाचनालय
शंकर वामन गुरूजी यांनी परतवाड्यात वाचनप्रेमींना एकत्र आणून वाचनालयाची मुहूर्तमेढ 6 सप्टेंबर 1866 रोजी रोवली. त्या दिवशी गणेश चतुर्थी होती. त्याला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. वाचनालयाच्या स्थापनेत इंग्रज अधिकारी मेजर मॅकेन्झी यांचा पुढाकार होता. परतवाड्यात इंग्रज सैन्याची छावणी होती. तेथे इंग्रज अधिकारी असत. परतवाडा हे अचलपूरचे उपनगर म्हणावे असे गाव आहे. परंतु तेथील इंग्रज सैन्याच्या छावणीमुळे त्यास काही काळ महत्त्व अधिक लाभले. खुद्द अचलपूरचे वाचनालयही स्थानिक प्रयत्नांतून 1893 मध्ये सुरू झाले...
कोकण किनाऱ्यावरील कासवे – वाळूवरल्या खुणा (Turtles on the Konkan Coast – Marks on...
परिसंस्थेमध्ये जमिनीवरची झाडे आणि प्राणी जितके महत्त्वाचे, तितकेच पाण्याखालील वनस्पती आणि प्राणी यांचेही महत्त्व आहे. ती सृष्टी टिकवणे, त्यांतील घटकांचे संरक्षण करणे हे नैतिक कर्तव्य आहे. अशा घटकांना महत्त्व देणारे लोक दुर्लभ. मात्र, काही लोक आत्मीयतेने भवतालातील तशा घटकांचा सांभाळ करतात, त्यांची काळजी घेतात. कासवांच्या सात प्रजातींपैकी ऑलिव्ह रिडले नावाच्या कासवांचे संवर्धन करणारे कोकणातील वेळास नावाचे गाव आहे...
अप्रसिद्ध रामगड (रामदुर्ग)
‘रामगड’ हा किल्ला दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर आहे. तो खेडपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. तो साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस आहे. तो किल्ला ‘रामदुर्ग’ या नावानेही ओळखला जातो. तो समुद्रसपाटीपासून साधारण चारशेआठ मीटर उंचीवर आहे. किल्ला अदमासे एक एकर जागेवर उभा आहे. तो पालगडचा जोडकिल्ला मानला जातो. त्यामुळे तो अज्ञात व म्हणून अप्रसिद्ध होता. त्या किल्ल्याची स्थाननिश्चिती कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुत लेखकाने केली आहे...
महेश लाडणे : नाणीसंग्रह; अभ्यास अभी बाकी है !
शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावच्या महेश लाडणे याच्या नाणीसंग्रहाची सुरुवात कुतूहलातून झाली. तो इयत्ता नववीत शिकत असताना घरात जुनी पितळी तांब्याची भांडी, वजनमापे अशा काही वस्तू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यात वजनमापे वाटतील अशा गोलाकार आणि जाडजूड तांबे धातूच्या काही गोष्टी होत्या. तो ते साहित्य जमवत गेला. त्यातून त्याचा नाणेसंग्रह आकारास आला. त्याच्या संग्रहात आठशे नाणी आहेत. ती विविध धातूंची, विविध आकारांची, विविध किंमतीची, विविध लिपींतील आहेत...
हायकूकार मनोहर तोडणकर
दाभोळचे कवी मनोहर रामचंद्र तोडणकर हे आयुष्याच्या शेवटपर्यंत रसिकांच्या शोधात असत. शिरीष पै यांनी ‘हायकू’ मराठीत आणला; तोडणकर शिरीष पै यांना गुरुभगिनी मानत. तोडणकर यांनी ‘हायकू’ या जपानी काव्यप्रकारावर नंतरच्या आयुष्यात बराच भर दिला. त्यांच्या नावावर ‘हायकूंची हाक’ आणि ‘समाधीचे क्षण’ हे दोन हायकूसंग्रह आहेत. त्यांपैकी ‘समाधीचे क्षण’ हा संग्रह त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी आमच्यापर्यंत आला ! तोडणकर यांच्या अंगणात हायकू जणू फुलांसारखे आपले आपण उमलत गेले...
रिलेशानी (Beautiful Relationship)
मोहन देस यांच्या ‘आरोग्यभान’ या प्रकल्पातून जन्माला आलेला ‘रिलेशानी’ हा प्रकल्प म्हणजे छान नातेसंबंध. वाढीच्या वयात, तरुणपणी मनात अनेक प्रश्न धुमाकूळ घालत असतात. त्यांचे निरसन करण्यासाठी विश्वासू व्यक्ती आयुष्यात नसेल तर नात्यात दरी पडते आणि ती वाढत जाते. लैंगिकतेकडे बघण्याचा सकस दृष्टिकोन, प्रेम-भावनेचे अनेक पदर, नात्यातून निर्माण होणारा विश्वास अशा अनेक विषयांवर मनमोकळा संवाद ‘रिलेशानी’ शिबिरात होतो. म्हणून त्याला संवाद शिबिर असेही म्हटले आहे...
परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक
चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...
आरोग्य भानची गोष्ट (The Story of Awareness of Health)
आरोग्य म्हणजे शरीर तर आहेच; पण अन्न, पाणी, मानवी मन, भवताल, भावभावना, नातेसंबंध या विशाल परीघामध्ये येणाऱ्या असंख्य गोष्टी या आरोग्य राखण्यासाठी असतात. या परिस्थितीबाबत काय करता येईल याविषयी संवाद घडवणे आणि त्यातून माणसांनी सक्षम होणे शक्य आहे असा विचार करून निर्माण केलेली संस्था म्हणजे ‘आभा’- आरोग्य भान ! लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यात बदल घडवण्याची क्षमता डॉ. मोहन देस यांच्या संस्थेच्या कामात आहे...
सामाजिक दायित्व जपणारी दापोली अर्बन बँक (Dapoli Bank – An institute that belongs to...
दापोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना 29 फेबुवारी 1960 रोजी झाली. बँक स्थापनेमागे उद्देश दापोली शहराच्या व्यापाराची व सर्वसामान्य माणसाची आर्थिक गरज भागवावी आणि शहराचा विकास साधावा हा होता. दापोली तालुक्याेत कोकण कृषी विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सायन्स-आर्टस् कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधा बनत गेल्या. मात्र तरी दापोलीच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुणे-मुंबई यांसारख्या शहरांकडे जावे लागे. ती उणीव बँकेने हेरली व सदतीस लाख रुपये एवढी देणगी देऊन दापोली अर्बन सिनिअर सायन्स कॉलेजची स्थापना केली !
आनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास ! (Appropriate Technology Man – Anand Karve)
आनंद दिनकर कर्वे हे भारतीय बहुआयामी संशोधक आहेत. त्यांनी आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे ‘ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी’ या विषयावर काम केले. ते पुण्यातील ‘अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ (आरती) या संस्थेचे प्रवर्तक. त्या संस्थेला ब्रिटनमधून ‘ग्रीन ऑस्कर’ समजला जाणारा ‘अॅश्डेन पुरस्कार’ 2002 आणि 2006 साली, असा दोन वेळा मिळाला आहे. तो पुरस्कार चिरंतन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील नावीन्यपूर्ण व लोकोपयोगी प्रकल्पांना दिला जातो...