हे मरण जगताना मला फार पोरके वाटते

0
20

– शिरीष गोपाळ देशपांडे

 मुंबईत घडलेल्‍या बॉम्‍बस्‍फोटांनंतर सत्ताधीशांनी दिलेल्‍या प्रतिक्रिया वाचून मनात संतापाची भावना प्रचंड निर्माण झाली आहे. मानवी अधिकाराच्‍या नावाखाली सारा बट्ट्याबोळ चालवला आहे. शंभर कोटी लोकसंख्‍या असलेल्‍या या भारत देशात कोणतेही नेतृत्‍व नाही. कंदहारसारख्‍या घटना घडल्‍यानंतर तुमचे सरकार उलथून पडल्‍याशिवाय राहत नाही. बॉम्‍बस्‍फोटाच्‍या घटनेनंतर हेही सरकार कायम राहील याची शाश्‍वती नाही. यानंतर येणारे अ-सरकारही असेच असेल!


– शिरीष गोपाळ देशपांडे

   मुंबईत घडलेल्‍या बॉम्‍बस्‍फोटांनंतर सत्ताधीशांनी दिलेल्‍या प्रतिक्रिया वाचून मनात संतापाची भावना प्रचंड निर्माण झाली आहे. मानवी अधिकाराच्‍या नावाखाली सारा बट्ट्याबोळ चालवला आहे. शंभर कोटी लोकसंख्‍या असलेल्‍या या भारत देशात कोणतेही नेतृत्‍व नाही. कंदहारसारख्‍या घटना घडल्‍यानंतर तुमचे सरकार उलथून पडल्‍याशिवाय राहत नाही. बॉम्‍बस्‍फोटाच्‍या घटनेनंतर हेही सरकार कायम राहील याची शाश्‍वती नाही. यानंतर येणारे अ-सरकारही असेच असेल! जयप्रकाश नारायण यांनी म्‍हटले, ‘नाग गेला आणि साप आला’. हे वाक्‍य येथे तंतोतंत लागू पडते. हे सरकार प्रचंड कुचकामी आणि षंढ आहे. सर्वसामान्‍य माणसाने सिग्‍नल तोडल्‍यावर पोलिस हप्‍ते वसूल करतात आणि अतिरेक्‍यांना फाईव्‍ह स्‍टार ट्रीटमेण्ट दिली जाते.

   आता हे मरण जगताना मला फार पोरके वाटते. पुढील जन्‍मी या देशात जन्‍म घेण्‍यापेक्षा रवांडाच्‍या भूमीवर कुत्रा म्‍हणून जन्‍माला यावे. तेथे अमेरिकेच्‍या सैनिकांच्‍या लाथा खात आनंदाने केकाटत राहू, पण पुढील जन्‍म अशा पागलखान्‍यात नको. अतिरेक्‍यांना नष्‍ट करणाच्‍या कोणत्‍याही कठोर उपाययोजना सरकार करणार नसेल तर हा देश हाकण्‍यास कुणीच लायक नाही असे म्‍हणावे लागेल. संभाव्य पंतप्रधान राहुल गांधी, दिग्विजय सिंग, चिदंबरम, यांच्‍याकडून देण्‍यात आलेल्‍या प्रतिक्रिया ‘असे होतच असते’ अशा स्‍वरूपाच्‍या आहेत. जर तुम्‍हाला जमत नसेल तर तुम्‍ही पदावरून खाली उतरावे!

शिरीष गोपाळ देशपांडे, पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख, S. N. D. T. विद्यापीठ, भ्रमणध्वनी – 9820236843

{jcomments on}

About Post Author

Previous articleमनोरंजनाच्या’ हव्यासापायी माणसांची अपमानजनक थट्टा
Next articleकलेक्टरची मुलगी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.