साथीचे रोग : धुळ्यातील तीन शतकांतील नोंदी (Dhulia History Record of Epidemics)

1
42

 

कोरोनाची साथ ही धुळे जिल्ह्यापुरती तरी इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे! यापूर्वी अठराव्या, एकोणिसाव्या आणि विसाव्या अशा तिन्ही शतकांत साधारण याच वर्षाच्या सुमारास धुळे जिल्ह्यात साथीच्या रोगांचा फैलाव झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. साथीच्या आजारांमुळे 1720 मध्ये तत्काली खानदेशात काय धुळधाण उडाली असेल यासंबंधीचा अधिकृत तपशील उपलब्ध नाही. तथापि 1820 आणि 1920 मधील माहिती वाचण्यास मिळू शकते. या तिन्ही शतकातमहामारीची साथ जणू योजनाबध्द पध्दतीनेआलेली भासते. प्रत्येक शतकातविषाणूंच्या संसर्गातून विविधदेशांमध्ये साथींचा फैलाव झालाआणि मोठ्या प्रमाणावरजीवितहानी झाली.तसे दाखले इतिहासातआहेत. त्या तडाख्यात धुळेजिल्हादेखील सापडला होताहे संदर्भ ग्रंथां आढळूनयेते.
          खानदेश परिसर 1818 मध्ये पेशवेहोळकरांच्या ताब्यातून इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. त्यामुळे विविध अहवालांच्या माध्यमातून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकते. खानदेशचा पहिला ब्रिटिश कलेक्टर कॅप्टन जॉन ब्रिग्ज याच्या कारकिर्दीवर आधारि JOHN BRIGGS IN MAHARASHTRA हे अरविंद देशपांडे यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात साथीच्या आजारांमुळे उद्भ्वलेल्या परिस्थितीचा धावता उल्लेख आहे. कॉलरा हा वारंवार उद्भवणारा आजार 1817 ते 1820 या कालावधीत होता. सामान्य नागरिकांप्रमाणे सैन्यदलातील जवानदेखील कॉलयाच्या तडाख्यात सापडले होते. पाचशे कॉलराबाधि सैनिकांपैकी चौऱ्याऐंशी जण मृत्युमुखी पडल्याचा उल्लेख ब्रिग्ज यांनी पाठवलेल्या 1818 च्या अहवालात आहे.

 

संपूर्ण धुळे शहर कॉलरा साथीच्या विळख्यात 1819 मध्ये सापडले होते. ती साथ लवकरच परिसरातील गावां पसरली आणि ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू झाले. खेडी ओस पडली. कॉलयामुळे अकरा हजार पाचशे एकवीस मृत्यू जुलै 1819 अखेर झाल्याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे. साथीचा उद्रेक रांजणगाव या गावात, पुन्हा मार्च 1820 मध्ये झाला आणि एका आठवड्यात सत्याऐंशी जण मृत्युमुखी पडले. एका छोट्या गावात असा हाहाकार माजल्याचे दुसरे उदाहरण नसावे. ते रांजणगाव नेमके कोणते यासंबंधीचा उल्लेख मात्र सापडत नाही. त्यावेळी धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव आणि बागलाण हा सारा परिसर मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. यापैकी धुळे जिल्ह्यात रांजणगाव नक्की नाही. ते चाळीसगावजवळ असल्याचे कळते.           
         
धुळेकरांना स्पॅनिश फ्लू या साथीच्या आजाराने मगरमिठीत आवळण्यास सुरुवात 1901मध्ये केल्याचे दिसते. धुळे नगरपालिकेस शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1962 मध्ये एक स्मरणिका प्रकाशित करण्यात ली. त्या स्मरणिकेमध्ये स्पॅनिश फ्लूचा उल्लेख साथीचा प्लेग असा आहे. त्या साथीचा शिरकाव धुळयात 1901मध्ये झाला. त्यावेळी तीनशेतेवीस जण मृत्युमुखी पडले. परंतु शहरातील लोकांनी गावाबाहेर स्थलांतर केल्यामुळे पुढील प्राणहानी टळली. मात्र 1902 आणि 1903 या वर्षी त्या साथीच्या आजाराने धुळे शहरास भयंकर तडाखा दिला आणि 20 सप्टेंबर 1902 पर्यंत एकशेसतरा जण मृत्युमुखी पडले. नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न 1903 मध्ये कसोशीने केला. परंतु त्याला पावसामुळे फारसे यश आले नाही. त्या साथीने दोन हजार सहाशेत्र्याऐंशी जणांचा बळी घेतला. विशेष म्हणजे त्यावेळी धुळे शहराची लोकसंख्या अवघी सत्तावीस हजार होती.
          त्या साथीचा मल 1905 पर्यंत होता. नगरपालिकेच्या दप्तरी असलेल्या माहितीमध्ये प्लेगमुळे झालेल्या मानवहानीचे आकडे देण्यात आले आहेत. लागण 1905 नंतर तुरळक होत असे. त्या साथीने पुन्हा 1916मध्ये डोके वर काढले. त्यावेळी सातशे जणांचा बळी त्या साथीच्या आजाराने घेतला.
          त्या साथीने बराच जोर 1919मध्ये धरला होता. खानदेशच्या उर्वरित भागासह नाशिक, नगर आणि पुणे येथे प्लेगची जोरदार लागण झाली होती. तथापि त्यावेळी नगरपालिकेने जबाबदारी व्यवस्थित सांभाळल्यामुळे साथीस कोणीही बळी पडले नाही.
          धुळे नगरपालिकेकडे प्लेगचा विषाणू पसरवण्यास कारणीभूत असलेले उंदीर पकडण्याचे पाचशे पिंजरे होते. त्या वर्षी एकूण एकोणीस हजार पाचशेदहा उंदीर पकडून त्यांचा नाश करण्यात आला. सिव्हील हॉस्पिटल, नगरपालिकेचा बापट दवाखाना, प्लेग हॉस्पिटल आणि शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी चांगली मेहनत घेतल्यामुळे साथीचा परिणाम शहरावर झाला नाही असा उल्लेख धुळे नगरपालिका शताब्दी महोत्सवी स्मरणिकेमध्ये करण्यात आलेला आहे.
          धुळे शहराची महानगरपालिका तसेच आरोग्यविभागाशी संबंधित सर्वच घटक शंभर वर्षांनंतरदेखील जबाबदारीने कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे एप्रिल 2020 च्या मध्यापर्यंत कोरोना विषाणूची बाधा झालेला आणि धुळे शहरातील रहिवासी असलेला एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. तथापि कोरोना हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव कनेक्शनमुळे धुळ्यातील तिरंगा चौकात प्रारंभी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. 13 मेपर्यंत शहरासह जिल्हयातील कोरोना बाधितांची संख्या चौसष्टपर्यंत पोचली आहे. तर मृतांची संख्या आठ होती.
संजय झेंडे, धुळे 9657717679 sanjayzende67@gmail.com
———————————————————————————————–

About Post Author

Previous articleकाळ मोठा कठीण आहे… (Corona Reports from Different Countries)
Next articleप्राजक्ता दांडेकर – विज्ञान संशोधनाची नवी दिशा (Prajakta Dandekar: Organ On Chips Technology)
संजय झेंडे हे धुळ्याचे. त्यांनी पुणे येथून M.Lib. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. ते दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे धुळे जिल्हा प्रतिनिधी 1993-2014 पर्यंत होते. त्यांनी पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. संजय झेंडे यांच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जलसंधारणविषयक प्रयोगांची माहिती देणारी कव्हर स्टोरी `जलसंवाद` मासिकाच्या माध्यमातून प्रसिध्द होत आहे. त्यांनी धुळे जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्नांवर, तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांविषयी लिखाण केले आहे. त्यांना तडवी भिल्लांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेण्यासाठी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई’ तर्फे आणि तापी खो-यातील जल वळण योजनांचा अभ्यासकरण्यासाठी ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’ तर्फे फेलोशिप मिळाली. संजय झेंडे यांचे खान्देश इतिहास खंड -1 व 2 मध्ये ‘तडवी भिल्लांसंबंधी लेख’ व ‘समर्थ धुळे जिल्हा 2020’ या पुस्तकामध्ये ‘धुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा वेध’ हे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी नदीजोड प्रकल्पावर आधारित `मंत्र जल व्यवस्थापनाचा` हे पुस्तक (2008) लिहिले आहे. झेंडे यांना पां.वा. गाडगीळ पुरस्कार (1992), अतुलभाई जोशी विकास पत्रकारिता पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार (2002) असे सन्मान प्राप्त झाले आहेत. ते तापी खोरे गॅझेटिअर सदृष्य ग्रंथ निर्मिती प्रकल्पाचे समन्वयक आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9657717679

1 COMMENT

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here